आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:00 IST2019-09-23T06:00:00+5:302019-09-23T06:00:35+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आदर्श आचार संहितेसंदर्भात सर्व नोडल अधिकाºयांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सर्व शासकीय कार्यालयातील शासकीय योजनांचे तसेच राजकीय व्यक्तींचे फोटो असलेले पोस्टर, बॅनर फ्लेक्स, कटआऊट्स २४ तासाच्या आत काढून टाकावेत.

Adherence to the Model Code of Conduct | आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : भंडारा येथे सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारत निवडणूक आयोगातर्फे विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा करण्यात आली असून आदर्श आचार संहिता शनिवारपासून लागू झालेली आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आदर्श आचार संहितेसंदर्भात सर्व नोडल अधिकाºयांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सर्व शासकीय कार्यालयातील शासकीय योजनांचे तसेच राजकीय व्यक्तींचे फोटो असलेले पोस्टर, बॅनर फ्लेक्स, कटआऊट्स २४ तासाच्या आत काढून टाकावेत. सार्वजनिक इमारतीवरील जसे रेल्वे स्टेशन, बसस्थानक, शासकीय बसेस, टेलिफोन खांब, विद्युत खांब, नगरपालिका, स्थानिक स्वराजय संस्थेच्या इमारतीवरील राजकीय जाहिराती ४८ तासाच्या आत काढण्याची कार्यवाही करावी. लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, नगर परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती इत्यादी लोकप्रतिनिधींना दिलेली शासकीय वाहने तात्काळ जमा करावी. आचारसंहितेच्या कालावधीत कोणतीही निविदा प्रक्रिया, निविदा उघडणे, कार्यरंभ आदेश, नवीन काम सुरु करता येणार नाही.
विद्युत बिल, टेलिफोन बिलावर राजकीय नेत्यांचे फोटो छापू नये. तसेच शासकीय कार्यालयाच्या संकेतस्थळावरील राजकीय नेत्यांचे फोटो काढून टाकावेत. भूमिपूजन, उद्घाटनाच्या जागेवरील मजकूर झाकून ठेवावा. आदर्श आचार संहितेच्या कालावधीत शासकीय कर्मचाºयांनी त्यांच्या मोबाईलवरुन किंवा सोशल मिडियावरुन कोणत्याही पक्षाचा उमेदवाराच्या प्रचाराच्या पोस्ट शेअर करु नये, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
आचार संहितेच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीचे काम करता येईल. पूर, दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित असलेल्या क्षेत्रातील जनतेसाठी मदत व पुनर्वसन कार्य सुरु करता व ठेवता येईल. आपत्तीमधील कोणतेही काम करता येईल. तसेच गंभीर आजारी असलेल्या व्यक्तीला उचित मान्यतेने रोख रक्कम किंवा वैद्यकीय सेवा देणे सुरु ठेवता येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, डॉ. सुभाष पवार, उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, उपवन संरक्षक विवेक होशिंग, निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी वंदना सौरंगपते तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Adherence to the Model Code of Conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.