शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

फक्त एकच घर असलेले गाव 'खोडगाव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 15:34 IST

ऐकावे ते नवलचं : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात येणाऱ्या खोडगावात आहे फक्त एक घर

मोहाडी : एका घराचा गाव कधी बघितला आहे का, आश्चर्य आहे ना. होय, हे अगदी खरं आहे. पूर्वी झाडी-झुडपे जंगलाने आच्छादलेला तो गाव, मोहाडी तालुक्यात प्रसिद्ध असलेला खोडगाव हे नाव. खोडगावात एकच घर आहे. तो गाव शासनाच्या दरबारीसुध्दा बघायला मिळेल, पारडी गट ग्रामपंचायत गावाला जोडलेला तो आहे खोडगाव, पारडी गावापेक्षा खोडगाव याच गावाची चौफेर ओळख आहे, या गावात जागृत हनुमानाचे मंदिर आहे. इतर दिवशी भाविक त्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात. पण, मंगळवार व शनिवार रोजी या हनुमानाच्या मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांचे खोडगावकडे पाय वळतात. आता प्रश्न नक्की पडला असेल एका घराचा गाव कसा असू शकतो. याला पण इतिहास आहे. आता हल्ली खोडगाव येथे शारदा तिवारी यांचं घर आहे. खोडगाव येथील शारदा तिवारी व पारही येथील वयोवृद्ध  बळीराम झंझाड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, तीन पिढ्यांपूर्वी म्हणजे, स्वातंत्र्यपूर्व काळात खोडगावात ७० ७५ घरांची वस्ती होती. 

खोडगावात वाजपेयी नावाचे व्यक्ती होते. ते गावाचे पाटील (मालगुजार) होते, वाजपेयी त्या गावातील कर (वायदा) गोळा करण्याचे काम करीत होते. ज्यांनी कर दिला नाही. त्यांची शेतजमीन ताब्यात घेतली जात असे. कर भरू न शकल्याने खोडगावातून पडोळे, रामटेके, मेश्राम आदी परिवारातील व्यक्ती त्या गावातून पलायन करू लागले होते. खोडगावातील व्यक्तींनी पारडी, चिचखेडा, मांडेसर आदी आजूबाजूच्या गावात आसरा घेतला होता, एक वेळ अशी आली की, खोडगावात केवळ वाजपेयी यांचाच वाडा शिल्लक राहिला होता, कारण वेगळच आहे. खोडगावच्या मंदिरालगत सुरनदी आहे. पूर्वी या नदीला खूप पूर यायचा, काही घरे पाण्यात यायची, त्याही कारणांमुळे बरीच कुटुंब खोडगाव सोडून गेली. मात्र, वाजपेयी यांच्या वाड्यात पुराचे पाणी जात नव्हते. त्यामुळे शेवटपर्यंत वाजपेयी यांनी आपले मूळ गाव सोडून गेले नाहीत. चंद्रमोहन तिवारी यांनीही खोडगाव सोडला नाही. वाजपेयी यांना शामाबाई व किशोराबार्ड या दोन मुली होत्या. त्यांचा लग्नानंतर चंद्रमोहन तिवारी व पांडे नामक कुटुंब घरजावई म्हणून खोडगावात आले. चंद्रमोहन तिवारी परिवारात चार भाऊ मुक्कू तिवारी, गणेश तिवारी, सतीश तिवारी व बबलू तिवारी अशा चार भावांचे कुटुंब खोडगावात राहू लागले. कालांतराने बबलू तिवारी यांना सोडून तीन भाऊ शहरात व्यवसायासाठी बाहेर पडले

चार लोकसंख्येचे गावखोडगावात एकच घर असून, चार लोकसंख्येचे गाव आहे. बबलू तिवारी यांची पत्नी शारदा तिवारी. त्यांचा एक भाऊ व दोन मुली असा चार जणांचे कुटुंब खोहगावात वास्तव्यास आहे. आजघडीला शारदा तिवारी यांच्याकडे एक एकर शेतजमीन आहे. शारदा तिवारी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीकामाशिवाय मंदिरात पूजा साहित्याची विक्री करून करतात.

टॅग्स :bhandara-acभंडाराHomeसुंदर गृहनियोजनMaharashtraमहाराष्ट्र