शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

फक्त एकच घर असलेले गाव 'खोडगाव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 15:34 IST

ऐकावे ते नवलचं : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात येणाऱ्या खोडगावात आहे फक्त एक घर

मोहाडी : एका घराचा गाव कधी बघितला आहे का, आश्चर्य आहे ना. होय, हे अगदी खरं आहे. पूर्वी झाडी-झुडपे जंगलाने आच्छादलेला तो गाव, मोहाडी तालुक्यात प्रसिद्ध असलेला खोडगाव हे नाव. खोडगावात एकच घर आहे. तो गाव शासनाच्या दरबारीसुध्दा बघायला मिळेल, पारडी गट ग्रामपंचायत गावाला जोडलेला तो आहे खोडगाव, पारडी गावापेक्षा खोडगाव याच गावाची चौफेर ओळख आहे, या गावात जागृत हनुमानाचे मंदिर आहे. इतर दिवशी भाविक त्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात. पण, मंगळवार व शनिवार रोजी या हनुमानाच्या मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांचे खोडगावकडे पाय वळतात. आता प्रश्न नक्की पडला असेल एका घराचा गाव कसा असू शकतो. याला पण इतिहास आहे. आता हल्ली खोडगाव येथे शारदा तिवारी यांचं घर आहे. खोडगाव येथील शारदा तिवारी व पारही येथील वयोवृद्ध  बळीराम झंझाड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, तीन पिढ्यांपूर्वी म्हणजे, स्वातंत्र्यपूर्व काळात खोडगावात ७० ७५ घरांची वस्ती होती. 

खोडगावात वाजपेयी नावाचे व्यक्ती होते. ते गावाचे पाटील (मालगुजार) होते, वाजपेयी त्या गावातील कर (वायदा) गोळा करण्याचे काम करीत होते. ज्यांनी कर दिला नाही. त्यांची शेतजमीन ताब्यात घेतली जात असे. कर भरू न शकल्याने खोडगावातून पडोळे, रामटेके, मेश्राम आदी परिवारातील व्यक्ती त्या गावातून पलायन करू लागले होते. खोडगावातील व्यक्तींनी पारडी, चिचखेडा, मांडेसर आदी आजूबाजूच्या गावात आसरा घेतला होता, एक वेळ अशी आली की, खोडगावात केवळ वाजपेयी यांचाच वाडा शिल्लक राहिला होता, कारण वेगळच आहे. खोडगावच्या मंदिरालगत सुरनदी आहे. पूर्वी या नदीला खूप पूर यायचा, काही घरे पाण्यात यायची, त्याही कारणांमुळे बरीच कुटुंब खोडगाव सोडून गेली. मात्र, वाजपेयी यांच्या वाड्यात पुराचे पाणी जात नव्हते. त्यामुळे शेवटपर्यंत वाजपेयी यांनी आपले मूळ गाव सोडून गेले नाहीत. चंद्रमोहन तिवारी यांनीही खोडगाव सोडला नाही. वाजपेयी यांना शामाबाई व किशोराबार्ड या दोन मुली होत्या. त्यांचा लग्नानंतर चंद्रमोहन तिवारी व पांडे नामक कुटुंब घरजावई म्हणून खोडगावात आले. चंद्रमोहन तिवारी परिवारात चार भाऊ मुक्कू तिवारी, गणेश तिवारी, सतीश तिवारी व बबलू तिवारी अशा चार भावांचे कुटुंब खोडगावात राहू लागले. कालांतराने बबलू तिवारी यांना सोडून तीन भाऊ शहरात व्यवसायासाठी बाहेर पडले

चार लोकसंख्येचे गावखोडगावात एकच घर असून, चार लोकसंख्येचे गाव आहे. बबलू तिवारी यांची पत्नी शारदा तिवारी. त्यांचा एक भाऊ व दोन मुली असा चार जणांचे कुटुंब खोहगावात वास्तव्यास आहे. आजघडीला शारदा तिवारी यांच्याकडे एक एकर शेतजमीन आहे. शारदा तिवारी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीकामाशिवाय मंदिरात पूजा साहित्याची विक्री करून करतात.

टॅग्स :bhandara-acभंडाराHomeसुंदर गृहनियोजनMaharashtraमहाराष्ट्र