शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

नव्या संचमान्यतेचा धसका; शिक्षकांनी सुरू केली विद्यार्थ्यांची शोधमोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 13:10 IST

शिक्षकांचे वाढले 'टेन्शन' : मात्र, इंग्रजी शाळांकडे वाढला विद्यार्थ्यांचा कल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाच्या ५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संचमान्यतेचे नवीन निकष लागू करण्यात आले आहेत. हे निकष सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून अंमलात येणार आहेत. त्यामुळे बहुतांश शाळांमध्येशिक्षकांची संख्या कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयाने शिक्षकांचे टेन्शन वाढल्याचे दिसून येत आहे. संच टिकविण्यासाठी शिक्षकांची गावागावांत भटकंती सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

अलीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे विद्यार्थी व पालकांचा कल वाढला आहे. अशातच मराठी शाळांसाठी शासनाच्या संचमान्यतेच्या शासन निर्णयामधील बऱ्याच अटी शर्ती असून, त्या जाचक ठरत आहेत. या निकषांचा विचार केल्यास वर्ष २०२४-२५ पासून शिक्षक संख्या मान्यतेचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. ते प्रमाण टिकवणेदेखील अवघड असणार आहे. संचमान्यतेच्या निकषानुसार पटसंख्या वाढविण्यावर शिक्षकांकडून अधिक भर दिला जात आहे. जिल्हा परिषद शाळासह अन्य अनुदानीत शाळांतही पटसंख्या रोडावली आहे.

संचमान्यतेचे नवे निकष याप्रमाणेशासनाच्या संचमान्यतेची संदर्भ तारीख ३० सप्टेंबरपर्यंतची असणार आहे. द्विशिक्षकी शाळांमध्ये ६० पटासाठी किमान दोन शिक्षक असणार आहेत. मात्र, तिसरा शिक्षक पात्र होण्यासाठी किमान १६ मुलांची अधिकची आवश्यकता असणार आहे. 

तीन शिक्षक टिकविण्यासाठी किमान ७६ पटसंख्या असणे आवश्यक आहे. २० पटसंख्येच्या शाळेमध्ये दोन शिक्षक असणार. तथापि, एक नियमित शिक्षक आणि दुसरा सेवानिवृत्त शिक्षक, अशी दोन पदे असणार आहेत.

पटसंख्या दहापर्यंत किवा त्यापेक्षा कमी असल्यास फक्त एक शिक्षक मान्य होणार आणि तोही सेवानिवृत्त शिक्षकांमधून नेमला जाणार आहे. 

इयत्ता सहावी ते आठवीमध्ये एकच वर्ग असल्यास ३५ पर्यंत एक शिक्षक आणि त्यापुढे ५३ पटानंतर दुसरा शिक्षक मान्य होणार आहे. तर तिसऱ्या शिक्षकासाठी किमान ८८ पटसंख्या लागणार आहे.

आठवीपर्यंत १५० विद्यार्थी पटसंख्या हवीइयत्ता सहावी ते आठवीमध्ये दोन वर्ग असल्यास ७० पटसंख्येपर्यंत दोन शिक्षक आणि त्यापुढे ८८ पटसंख्येनंतर तिसरा शिक्षक मान्य होणार आहे. त्यानंतर शिक्षक मान्य करण्यासाठी प्रत्येकी ३५ विद्यार्थ्यांमागे शिक्षक मिळणार आहे. इयत्ता सहावी ते आठवीसाठी नवीन शिक्षक पात्र होण्यास किमान संख्येपेक्षा १८ विद्यार्थ्यांची पटसंख्या असणे आवश्यक आहे. मुख्याध्यापक पद पात्र होण्यासाठी इयत्ता पहिली ते पाचवी किंवा इयत्ता पहिली ते सातवी, आठवीची पटसंख्या किमान १५० असावी लागणार आहे.

नव्या संचमान्यतेच्या निकषाची पूर्तता नवीन शैक्षणिक वर्षापासून होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय कामकाज सुरू आहेत. पटसंख्येचे पाळले जातील.- वर्षा बेले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. भंडारा

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षक