शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

तलावावर आंघोळीला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू, चार तासानंतर सापडला मृतदेह

By ज्ञानेश्वर मुंदे | Updated: September 11, 2022 18:00 IST

भंडारा जिल्ह्यात तलावावर आंघोळीला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. 

भंडारा: गावालगतचा माजी मालगुजारी तलावावर आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील चकारा येथे रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सकाळी तो आज्जीला बाहेर जात असल्याचे सांगून निघून गेला होता. त्यानंतर सकाळी १० वाजता त्याची सायकल व कपडे तलावाच्या काठावर आढळून आली असता एकच खळबळ उडाली. 

दरम्यान, भारत ओमप्रकाश पाठक (१५) रा.चकारा असे मृत मुलाचे नाव आहे. तो अड्याळ येथील विवेकानंद विद्याभवनचा नवव्या वर्गाचा विद्यार्थी होता. त्याची आई बाहेरगावी गेली होती. आजीने सकाळी त्याला जेवण करायला सांगितले. मात्र बाहेर जाऊन लवकर येतो असे म्हणून तो घरातून निघून गेला. त्यानंतर सकाळी १० वाजताच्या सुमारास गावालगतच्या मालगुजारी तलावावर सायकल, कपडे व चपला दिसून आल्या. ही माहिती गावात होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अड्याळचे ठाणेदार सुधीर बोरकुटे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. सौंदड येथील मासेमारांना शोधण्यासाठी पाचारण करण्यात आले. तब्बल चार तासाच्या प्रयत्नानंतर दुपारी २ वाजता त्याचा मृतदेह आढळून आला. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अड्याळ ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

वडिलांचाही तलावात बुडून झाला होता मृत्यूभारतचे वडील ओमप्रकाश यांचा चार वर्षापूर्वी तलावातच बुडून मृत्यू झाला होता. रविवारी मुलाचाही मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव हळहळत होते. शोधमोहीमेनंतर भारतचा मृतदेह हाती लागला. तेव्हा नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. अड्याळ ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. 

 

टॅग्स :bhandara-acभंडाराDeathमृत्यू