शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

घरकुलाचे ८०६ लाभार्थी फौजदारीच्या टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:07 IST

घरकुलाचे पैसे उचलूनही बांधकाम न करणाऱ्या लाखांदूर तालुक्यातील ८०६ लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देलाखांदूर पंचायत समिती : पहिला हप्ता घेवूनही घरकुल बांधलेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : घरकुलाचे पैसे उचलूनही बांधकाम न करणाऱ्या लाखांदूर तालुक्यातील ८०६ लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांनी केली आहे. आठ दिवसात घरकुलाचे बांधकाम सुरू करा अन्यथा पैसे परत करा, असा अल्टिमेटमही देण्यात आला आहे. यामुळे घरकुल न बांधणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत २०१५-१६ ते २०१७-१८ या कालावधीत घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यात रमाई आवास योजना, इंदिरा आवास योजना, शबरी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. या सर्वांना प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ब यादीतील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले. अनेक लाभार्थ्यांनी घरकुल बांधून हक्काच्या घरात रहावयास गेले. पंरतु पहिला हप्ताच्या धनादेश उचलूनही बांधकाम न करणारे ८०६ लाभार्थी असल्याचे पंचायत समितीच्या चौकशीत पुढे आले. त्यात रमाई योजना ६४६, शबरी आवास योजना ०२, इंदिरा आवास योजना ०७, आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील १५१ लाभार्थ्यांचा समावेश आहे. या लाभार्थ्यांना घरकुल लाभार्थ्यांसाठी ३० ते ३७ हजार अनुदान देण्यात आले. विशेष म्हणजे सदर रक्कम देवून चार वर्षाचा कालावधी पुर्ण झाला तरी ८०६ लाभार्थ्यांनी घरकुल बांधले नसल्याचे दिसून आले. लाभार्थ्यांनी ही रक्कम बँकेतून काढून गैरवापर केल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे घरकुल बांधकामाची मुदत केवळ एक वर्षाची आहे.वर्षभरात घरकुल न बांधणाऱ्या लाभार्थ्यांना वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. तोंडी सुचनाही देण्यात आली पंरतु बांधकाम सुरुकेले नाही किंवा रक्कमही पंचायत समितीकडे जमा केली नाही. त्यामुळे आता या लाभार्थ्यांना अल्टीमेटम देण्यात आला आहे. आठ दिवसाच्या आत घरकुलाचे बांधकाम किंवा सदर रक्कम लाखांदूर पंचायत समितीत जमा करावी, असे आदेश देण्यात आले. यानंतरही कोणतीच उपाययोजना झाली नाही तर संबंधीत ८०६ लाभार्थ्यांवर शासकीय निधीचा दुरुपयोग केल्याची तक्रार देवून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे लाखांदूर पंचायत समितीचे गटविकास अधिकाºयांनी सांगितले.१०० टक्के उद्दिष्टपूर्तीत अडथळाप्रत्येकाला हक्काचे घर मिळावे, कुणीही बेघर राहू नये, यासाठी शासकीय स्तरावर विविध आवास योजना राबविल्या जात आहे. केंद्र शासनही यासाठी अनुदान देत आहे. मात्र लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत गत काही वर्षात घरकुलाचे उद्दिष्ट पुर्ण होत नसल्याचे दिसून आले. यातील महत्त्वाचा अडथळा म्हणजे लाभार्थ्यांनी पहिला हप्ता उचलूनही घरकुल न बांधणे होय. आता असे लाभार्थी पंचायत समितीच्या रडारवर आहे.