शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

६८,८२० हेक्टर शेतजमीन पडीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 21:38 IST

जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतीचा खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी खरीप हंगामात अद्यापही ६८ हजार ८२० हेक्टर शेतजमीन पडीत आहे.

ठळक मुद्देखरीप हंगामात अत्यल्प पर्जन्यमान : जिल्हा दुष्काळाच्या सावटात

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतीचा खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी खरीप हंगामात अद्यापही ६८ हजार ८२० हेक्टर शेतजमीन पडीत आहे. अत्यल्प पर्जन्यमानामुळे पºहे करपले, तर, रोवणी केलेल्या शेतीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी चक्रव्यूहात अडकला आहे.जिल्ह्यात दोन लाख ८ हजार ७५० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र खरीप पिकासाठी निर्धारीत करण्यात आले होते. आतापर्यंत केवळ ६०.०३ टक्के हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात १८ हजार २७६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १७ हजार १३६ हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली असून त्याची टक्केवारी ९३.७६ एवढी आहे. जुलै महिन्यात एकदा झालेल्या दमदार पावसामुळे शेतकºयांनी ५ हजार ३४५ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड केलेली आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतीवर अस्मानी संकट असून दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अपुºया पावसामुळे रोवणी खोळंबली तर पºह्यांचा कालावधी दोन महिन्यांपर्यंत पोहचला आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय होती त्यांनी काही प्रमाणात रोवणी केली. मात्र आता वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने त्यांनाही धानाला पाणी देणे शक्य होत नाही. सद्यस्थितीला शेतकºयांची अवस्था बिकट आहे. यंदा अनेक तालुक्यात पावसाअभावी शेतकºयांनी रोवणीच केली नसल्याने रासायनिक खत व कीटकनाशकाची मागणीही अत्यल्प प्रमाणात आहे. कुठेही खताचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी पावसाळा संपत असातानाही आलेल्या नाही.पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात धानाची शेती केली जाते. धान हे जिल्ह्याचे प्रमुख पीक आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ८२ हजार ७६२ हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाते. ३० आॅगस्ट २०१७ पर्यंत केवळ १ लाख १९ हजार २६७ हेक्टर क्षेत्रावरच धानाची रोवणी झालेली आहे. अर्धापेक्षा अधिक पावसाळा निघून गेला असून सप्टेंबर महिन्यात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रोवणी झालेले धानपीक करपायला लागले आहेत.९४ दिवसांत ६७ टक्के पाऊसभंडारा जिल्ह्यात सरासरी १३३०.२ मिमी पाऊस पडतो. गतवर्षी २०१६ मध्ये २ सप्टेंबरपर्यंत ७१२ मिमीच्या सरासरीने पाऊस झाला होता. यंदा २ सप्टेंबरपर्यंत ७१७ मिमी पाऊस झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यंदा मात्र पाऊस गतवर्षीपेक्षा ५ मिमीने अधिक असतानाही प्रशासन पावसाची आकडेवारी फुगवून दाखवित असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी एवढाच पाऊस पडला तर तलाव, बोडी कोरडीच कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने पावसाची आकडेवारी कोठून जमा केली, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.दुष्काळग्रस्त घोषित करायंदा अत्यल्प पाऊस झाला. ज्या शेतकºयांनी रोवणी केली, त्यांचे रोवणीही करपून गेली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा विविध पक्ष, संघटनांनी दिला आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आलेला आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस बरसला नाही. आॅगस्ट महिन्यात रोवणी केली तरीही शेतकºयांना हवे तसे उत्पन्न येण्याची शक्यता नाही.- प्रेमसागर गणविर,जिल्हाध्यक्ष, काँग्रेस,भंडारा