६३ प्रकल्पात केवळ १८ टक्के जलसाठा
By Admin | Updated: March 3, 2016 00:41 IST2016-03-03T00:41:55+5:302016-03-03T00:41:55+5:30
उन्हाळ्याची दाहकता सुरू होताच जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ ...

६३ प्रकल्पात केवळ १८ टक्के जलसाठा
देवानंद नंदेश्वर भंडारा
उन्हाळ्याची दाहकता सुरू होताच जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ १८़३६ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात ४.५६ टक्क्यानी वाढ झालेली आहे.
लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ७़१६, बघेडा ८६़३६०, बेटेकर बोथली आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा निरंक आहे़
जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा १९़१७ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा २४.०४ टक्के आहे़ जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे. गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे़ असे असले तरी शहरातील नागरीकांना पाण्याची टंचाई भासत आहे. जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ २२़३५३ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी दि़ २ मार्च रोजी ६३ प्रकल्पात १६़७९५ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ त्याची टक्केवारी १३़८० एवढी होती. जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये पाण्याचा अल्प साठा आहे. त्यामुळे जनावरांसाठी तसेच वन्य प्राण्यांसाठी धोक्याची घंटा निर्माण झाली आहे.
पाणीटंचाई निवारणाची कामे कासवगतीने
प्रशासनाने संभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ जानेवारी ते जूनचा बृहत आराखड्यात २६३ गावांसाठी ४१६ उपाययोजना सुचविल्या आहेत. या उपाययोजनांसाठी २ कोटी ६३ लक्ष ८३ हजार रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. मात्र ही कामे कासवगतीने सुरु असल्यामुळे पाणी टंचाईची समस्या दूर होणार तरी कधी, असा सवाल आपसूकच निर्माण होतो.
पवनी तालुक्याला बसणार सर्वाधिक झळ
भंडारा जिल्ह्यात ७९६ गावे आहेत. त्यापैकी पवनी तालुक्यातील सर्वाधिक ६३ गावांमध्ये पाणीटंचाईची झळ बसणार आहे. भंडारा तालुक्यातील ४३ गावात पाणी टंचाई भासणार आहे. मोहाडी तालुक्यात २१, तुमसर तालुक्यात ३४, साकोली तालुक्यात ३७, लाखनी तालुक्यात २७, पवनी तालुक्यात ६३ तर लाखांदूर तालुक्यात ३८ गावांमधील महिला-पुरूषांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.
१५ प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट
जिल्ह्यातील पाटबंधारे विभागातंर्गत असलेल्या १५ प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे. बेटेकर बोथली, सोरणा, पवनारखारी, डोंगरला, हिवरा, आमगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, कुंभली, डोंगरगाव, एकलाझरी, जांभोरा, कोका, झरी प्रकल्पांचा समावेश आहे. उन्हाळ्याच्या सुरुवाती पासून अनेक गावात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाल.