शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाह सोहळ्यात ३४ जोडपी विवाहबद्ध

By admin | Updated: April 21, 2017 00:38 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना अनुसरून कुठल्याही प्रकारच्या खोट्या प्रतिष्ठेला बळी न पडता, कर्जबाजारी न होता,

मोहरणा व पळसगाव येथे आयोजन : स्वत:च्या मुलीचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात करण्याचा पटोले यांचा संकल्प लाखांदूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना अनुसरून कुठल्याही प्रकारच्या खोट्या प्रतिष्ठेला बळी न पडता, कर्जबाजारी न होता, सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या उपवर मुला-मुलींची लग्न लावून देणे काळाची गरज झाली आहे, असे आवाहन करीत आपल्या मुलीचेही लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात करणार असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. मोहरणा येथील सर्वधर्मिय सामूहीक विवाह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथे गुरूवारला ओबीसी व छावा संग्राम परीषदेच्यावतीने सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात २१ जोडपी विवाहबद्ध झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या प्रणाली ठाकरे, मनोहर राऊत, भाजपचे वामन बेदरे, अ‍ॅड.वसंता एंचिलवार, सभापती मंगला बगमारे, पं.स. सदस्य शिवाजी देशकर, भरत खंडाईत, नगरसेव रामचंद राऊत, नुतन कांबळे, सभापती सुभाष राऊत, रामकृष्ण ठेंगरी, देवा पाटील राऊत, मनोहर महावाडे, ताराचंद मातेरे, दादाजी राऊत, सरपंच ग्रिष्मा राऊत, भायुमो सचिव जितेंद्र ढोरे, बाळु बुराडे, पवन समरत, सुभाष खिलवानी, वंदना ढोरे, अमर भानारकर, लोचन पारधी, उर्मिला राऊत संचालक, रूपाली राऊत ग्रा.पं.सदस्य, मनोरमा मोटघरे, गजानन शहारे उपस्थित होते.यावेळी खा.पटोले म्हणाले, मागील बारा वर्षांपासून हा सोहळा छावा संग्राम परीषदेच्यावतीने आयोजित करण्यात येत आहे. जनतेच्या आशिवार्दाने आपले विवाह सोहळे आजही चालुच आहेत. जनतेच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासुन कल्याणकारी योजना सुरू केल्या असून, त्याचा फायदा जनतेला मिळणार आहे असेही ते म्हणाले.खा.पटोले यांनी संसारपयोगी साहीत्य व ग्रामगितेचे वाटप करून व सर्व वर-वधुंचे पालकत्व स्वीकारून कन्यादान केले. प्रास्ताविक नाना पिलारे यांनी तर संचालन रामचंद्र राऊत व यशवंत नखाते यांनी केले. कार्यक्रमासाठी विलास पिलारे, मधुकर भोयर, मंगेश राऊत, श्रीधर राऊत, यांच्यासह मोहरणावासीयांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)साकोली : सामूहिक विवाह सोहळयाच्या माध्यमातून बहुजन समाजाला एकत्र आणण्याचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित होते, त्यांच्या विचारावर श्रद्धा ठेवत आम्ही हे कार्य प्रामाणिकपणे करीत आहोत. या सोहळयांच्या माध्यमातून ओबीसी बहुजन समाज विकासाच्या प्रवाहात आला पाहिजे. ओबीसी समाजाचे स्वतंत्र मंत्रालय असावे अशी आमची लढाई होती. त्यात आम्हाला यश आले असून राज्य सरकारने स्वतंत्र मंत्रालय तयार केले. बहुजनांना एकत्र आणण्याचे व्यासपीठ म्हणजे सामूहीक विवाह सोहळे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.पळसगाव (सोनका) येथे आयोजित सामुहिक विवाह सोहळयात ते बोलत होते. यावेळी १३ जोडपी विवाहबध्द झाली. त्यांना खा.पटोले यांनी भेटवस्तू दिले. मंचावर आमदार परिणय फुके, साकोलीच्या नगराध्यक्षा धनवंता राऊत, श्रावण ब्राम्हणकर, उपसभापती लखन बर्वे, माजी जि.प. सदस्या सविता ब्राम्हणकर, भरत खंडाईत, नेपाल कापगते, घनशाम मेंढे, जिल्हा परिषद सदस्य दीपक मेंढे, यादोराव कापगते, सरपंच कामिना भेंडारकर, सरपंच प्रेमराज गहाणे व राजू पालीवार उपस्थित होते. या विवाह सोहळयाला परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)