२६ दिवसांत ३३ टक्के पाऊस

By Admin | Updated: June 27, 2017 00:26 IST2017-06-27T00:26:32+5:302017-06-27T00:26:32+5:30

जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असताना त्यात निसर्गाचा साथही अत्यंत महत्वाची बाब आहे.

33% rain in 26 days | २६ दिवसांत ३३ टक्के पाऊस

२६ दिवसांत ३३ टक्के पाऊस

खरीप हंगाम उशिरा : दीड लक्ष हेक्टरमधील पेरणी खोळंबली
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असताना त्यात निसर्गाचा साथही अत्यंत महत्वाची बाब आहे. मान्सूनची चाहूल लागली असतानाही जिल्ह्यात २६ दिवसात फक्त ३३ टक्के पाऊस बरसला आहे. परिणामी खरीप हंगामाला यावर्षीही विलंबाने सुरूवात होणार असून दीड लक्ष हेक्टरमधील पेरणी खोळंबली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी नर्सरी भात पिकाची लागवड केली असली तरी रोवणीला प्रारंभ झालेला नाही.
दुसरीकडे ९० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी बांधव निसर्गाच्या कृपेवर आधारित आहे. मान्सूनसत्र सुरू होऊनही वरूण राजाने मुबलक प्रमाणात हजेरी लावलेली नाही. मागील २६ दिवसात लाखांदूर, भंडारा, मोहाडी व लाखनी तालुक्यातच काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या आधारावरच पाऊसाची टक्केवारी ३३ वर पोहचली असली तरी जिथे बरसला तिथेच बरसला, अशी स्थिती पहायला मिळत आहे. पेरणी करूनही पाऊस न बरसल्याने बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. हवामान खात्याच्या नोंदीप्रमाणे भंडारा तालुक्यात आतापर्यंत ६९.५ मि.मी. मोहाडी ३६.४, तुमसर १०.४, पवनी ३९.७, साकोली ३२.२, लाखांदूर ४५.५, लाखनी १४०.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी ५३.४ इतकी आहे.

Web Title: 33% rain in 26 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.