शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

सिंचन प्रकल्पांत २२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:02 PM

अपुऱ्या पावसाचा फटका जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना बसला असून पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील ६३ प्रकल्पांमधील केवळ २२.१८ टक्के जलसाठा आहे. सिंचनाची भिस्त असलेल्या जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पात ८.१० दलघमी जलसाठा असल्याची उन्हाळी पिकांना प्रकल्पाचे पाणी मिळणार नाही. आगामी काळातील टंचाई लक्षात घेता या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी व चारापिकासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्यासाठी धोक्याची घंटा : जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पात आठ दलघमी पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपुऱ्या पावसाचा फटका जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना बसला असून पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील ६३ प्रकल्पांमधील केवळ २२.१८ टक्के जलसाठा आहे. सिंचनाची भिस्त असलेल्या जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पात ८.१० दलघमी जलसाठा असल्याची उन्हाळी पिकांना प्रकल्पाचे पाणी मिळणार नाही. आगामी काळातील टंचाई लक्षात घेता या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी व चारापिकासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.जिल्ह्यात एकूण ६३ प्रकल्प आहेत. त्यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बपेरा, मोहाडी तालुक्यातील टेकेपार बोथली आणि सोरणा हे चार मध्यम प्रकल्प आहे तर ३१ लघु प्रकल्प असून २८ माजी मालगुजारी तलाव आहे. चांदपूर प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पीत जलसाठा २८.८७ दलघमी असून सध्या याप्रकल्पात ७.४० दलघमी साठा आहे. तर बपेरा, टेकेपार बोथली आणि सोरर्णा या प्रकल्पात केवळ मृत जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत या प्रकल्पात दुप्पट म्हणजे १५.८३ टक्के जलसाठा होता. यावर्षी पडलेल्या अपुºया पावसाने पुर्णक्षमतेने प्रकल्प भरले नाहीत.जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून या प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्प क्षमता ५३.५४ दशलक्ष दलघमी आहे. सध्या या प्रकल्पात १२.९८ दलघमी उपयुक्त जलसाठा असून २४.२५ दलघमी मृतसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठ्याचे टक्केवारी १२.९८ आहे. २८ माजी मालगुजारी तलावांची प्रकल्पीय संकल्पीत क्षमता २५.३८ दलघमी असून सध्या या प्रकल्पात ५.९१ दलघमी म्हणजे २३.२९ टक्के जलसाठा आहे.या प्रकल्पातील अपुºया जलसाठ्याचा परिणामी उन्हाळी पिकांवर होणार आहे. कोणत्याही प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी सोडले जाणार नाही. सर्व पाणी पिण्यासाठी आणि चारापिकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. त्यामुळे नागरिकांना आतापासून पाण्याचा वापर जपून करण्याची गरज आहे.पाच वर्षांपासून घटतोय जलसाठाधान उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. जिल्ह्यातील बहुतांश शेती कोरडवाहू असून निसर्गाच्या भरोशावर अवलंबून आहे. मात्र गत पाच वर्षाचा तुलनात्मक अभ्यास केला असता दरवर्षी पावसाचे आणि परिणामी जलसाठ्याचे प्रमाण कमी होत आहे. २०१४ मध्ये जिल्ह्यातील ६३ प्रकल्पात ८१.६५ टक्के जलसाठा होता. २०१५ मध्ये निचांकी पातळीला जावून १८.५५ टक्के, २०१६ मध्ये २३.२६ टक्के आणि २०१७ मध्ये ४३.७५ टक्के जलसाठा होता. मात्र गत पावसाळ्यात अपुरा पाऊस झाल्याने सध्या प्रकल्पात २२.१८ टक्के जलसाठा आहे.