१८ तासांच्या भारनियमनाने शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: November 11, 2014 22:33 IST2014-11-11T22:33:33+5:302014-11-11T22:33:33+5:30
पुसला परिसरात सुरु असलेल्या १८ तासांच्या भारनियमनाने शेतकरी त्रस्त झाला असून हे भारनियमन बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

१८ तासांच्या भारनियमनाने शेतकरी त्रस्त
पुसला : पुसला परिसरात सुरु असलेल्या १८ तासांच्या भारनियमनाने शेतकरी त्रस्त झाला असून हे भारनियमन बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या वरुड तालुक्यातील लिंगा या गावासह करवार, पिंपलागढ, जामगाव, कारली, महेंद्री येथे गावठाण फिडर नसल्याने विद्युत भारनियमनाचा सामना आदीवासी बांधवासह शेतकरी, विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. वीज भारनियमनाला कंटाळून अनेकांनी शहराकडे आगेकूच केली तर गोरगरीब शेतममजूर रात्र जागून काढत आहे. परंतु हिंस्त्र प्राणी गावात येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जिल्हा परिषदेच्या पुसला सर्कलमधील सातपुड्याच्या पायथ्याशी जंगल परिसरामध्ये वसलेली ही गावे आहेत.
कृषी पंपाचे १८ तासाचे भारनियमन असल्याने ओलिताचा प्रश्न शेतकऱ्यामध्ये निर्माण झाला आहे. जंगली प्राणीसुध्दा रात्रीने शेतात संचार करीत असतात. यामुळे पिके वाचविण्याकरिता ओलितासाठी शेतकऱ्यांना रात्रीला शेतात जावे लागत आहे. अशा वेळी वन्य प्राण्यांची भीती शेतकऱ्यांना आहे. तसेच सर्प दंशाच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे वीज भारनियमन बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर )