शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

'पुढचे ३६५ दिवस मी आनंदातच राहणार आहे' हा असूदे तुमचा मुख्य संकल्प; तो पूर्ण कसा करायचा ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 15:21 IST

ही वरवर सोपी वाटणारी पण प्रयत्नांती शक्य असणारी क्रिया ज्या दिवशीपासून जमेल, त्या दिवसापासून पुढचे ३६५ दिवस आनंदाचे सुरू होतील.

जोवर तुमचा आनंद दुसऱ्यांमध्ये शोधत राहाल तोवर पुढचे वर्षच काय, तर आजन्म दुःखीच राहावे लागेल. याउलट स्वतःमध्ये आनंद शोधायला ज्या दिवसापासून सुरुवात कराल, त्या दिवसापासून उर्वरित आयुष्य आनंदातच घालवू शकाल. सुखी समाधानी आयुष्याचे हे साधे समीकरण आहे. आणि ते सोडवणे आपल्याच हातात आहे. हा गुंता सोडवायचा कसा आणि केवळ एक दोन दिवस नाही तर आयुष्यभर आनंदात कसे राहता येईल, यावर विचार आणि कृती करूया. 

नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या संकल्पाच्या यादीत स्वतःला आनंदी ठेवण्याला प्राधान्य द्या. जोवर तुम्ही आनंदी राहणार नाही तोवर तुम्ही दुसऱ्याला आनंद देऊ शकणार नाही. यासाठी आपण आधी आनंदात कसे राहायचे यावर थोडे चिंतन करू. 

आपल्या सभोवतालचे जग, माणसं, परिस्थिती बदलणे हे आपल्या हातात नाही. त्यांना बदलत बसलो तर आपले आयुष्य संपून जाईल. यासाठी बदलाची सुरुवात आपल्याला स्वतः पासून करावी लागेल. आपल्याला नको असलेले लोक, परिस्थिती वारंवार आपल्यासमोर येत राहणार. परंतु त्याच्याशी सामोरे कसे जायचे हे आपल्या हातात आहे. 

बाह्य परिस्थिती आपण बदलू शकलो नाही, तर आतली अर्थात मनातली परिस्थिती आपण सहज बदलू शकतो. त्यासाठी हवा आत्मसंवाद. ज्याप्रमाणे एखाद्याशी बोलल्यावर मन हलके होते, तसाच संवाद शांतपणे आपण आपल्याशी केला, तर आनंदाची कुपी आपल्याला सापडू शकेल. तटस्थपणे परिस्थितीचे अवलोकन करून आपण स्वतःशी संवाद साधला, तर अकारण काळजी करत असलेली परिस्थिती आपण गमतीशीरपणे पाहू शकतो. उदा. नोकरीवर बॉस, घरात बायको, नवरा, मुलं, सासू सासरे, नातेवाईक जे कोणी आपल्याला त्रास देतात किंवा ज्यांचा आपल्याला त्रास होतो, अशा लोकांकडे मनाच्या पातळीवर गमतीने बघायला शिका. मनातल्या मनात त्यांची टेर ओढली तरी त्यांना कळणार नाही, राग येणार नाही आणि आपल्याही रागाचा निचरा होऊन जाईल. एकदा राग गेला कि त्या व्यक्तीची, परिस्थितीची सकारात्मक बाजू आपण बघू शकू. 

स्वतःशी संवाद साधायचा आहे, तर तो चांगलाच संवाद साधायला हवा. संवाद म्हणजे विचार. आपले विचार सकारात्मक हवे असतील तर आपल्याला बाह्य रूपात धीर गंभीरपणे आणि अंतर्गत मनाला एखाद्या खोडकर मुलाप्रमाणे विषय हलका फुलका करता आला पाहिजे. 'मन चिंती ते वैरी न चित्ती', असे म्हणतात. मग मनात वाईट विचार आणायचेच कशाला? बाह्य जगात राग, लोभ, प्रेम सगळे काही केले तरी अंतर्गत मनाची शांतता अबाधित राहिली पाहिजे. 

यासाठी मनाच्या पातळीवर तटस्थ पणे परिस्थितीचे अवलोकन करा. त्या प्रसंगातली गंमत शोधून त्या क्षणाचा आनंद घ्या. ही वरवर सोपी वाटणारी पण प्रयत्नांती शक्य असणारी क्रिया ज्या दिवशीपासून जमेल, त्या दिवसापासून पुढचे ३६५ दिवस आनंदाचे सुरू होतील. नवीन वर्षाच्या आणि नवीन आयुष्याच्या शुभेच्छा!

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य