शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

'पुढचे ३६५ दिवस मी आनंदातच राहणार आहे' हा असूदे तुमचा मुख्य संकल्प; तो पूर्ण कसा करायचा ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 15:21 IST

ही वरवर सोपी वाटणारी पण प्रयत्नांती शक्य असणारी क्रिया ज्या दिवशीपासून जमेल, त्या दिवसापासून पुढचे ३६५ दिवस आनंदाचे सुरू होतील.

जोवर तुमचा आनंद दुसऱ्यांमध्ये शोधत राहाल तोवर पुढचे वर्षच काय, तर आजन्म दुःखीच राहावे लागेल. याउलट स्वतःमध्ये आनंद शोधायला ज्या दिवसापासून सुरुवात कराल, त्या दिवसापासून उर्वरित आयुष्य आनंदातच घालवू शकाल. सुखी समाधानी आयुष्याचे हे साधे समीकरण आहे. आणि ते सोडवणे आपल्याच हातात आहे. हा गुंता सोडवायचा कसा आणि केवळ एक दोन दिवस नाही तर आयुष्यभर आनंदात कसे राहता येईल, यावर विचार आणि कृती करूया. 

नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या संकल्पाच्या यादीत स्वतःला आनंदी ठेवण्याला प्राधान्य द्या. जोवर तुम्ही आनंदी राहणार नाही तोवर तुम्ही दुसऱ्याला आनंद देऊ शकणार नाही. यासाठी आपण आधी आनंदात कसे राहायचे यावर थोडे चिंतन करू. 

आपल्या सभोवतालचे जग, माणसं, परिस्थिती बदलणे हे आपल्या हातात नाही. त्यांना बदलत बसलो तर आपले आयुष्य संपून जाईल. यासाठी बदलाची सुरुवात आपल्याला स्वतः पासून करावी लागेल. आपल्याला नको असलेले लोक, परिस्थिती वारंवार आपल्यासमोर येत राहणार. परंतु त्याच्याशी सामोरे कसे जायचे हे आपल्या हातात आहे. 

बाह्य परिस्थिती आपण बदलू शकलो नाही, तर आतली अर्थात मनातली परिस्थिती आपण सहज बदलू शकतो. त्यासाठी हवा आत्मसंवाद. ज्याप्रमाणे एखाद्याशी बोलल्यावर मन हलके होते, तसाच संवाद शांतपणे आपण आपल्याशी केला, तर आनंदाची कुपी आपल्याला सापडू शकेल. तटस्थपणे परिस्थितीचे अवलोकन करून आपण स्वतःशी संवाद साधला, तर अकारण काळजी करत असलेली परिस्थिती आपण गमतीशीरपणे पाहू शकतो. उदा. नोकरीवर बॉस, घरात बायको, नवरा, मुलं, सासू सासरे, नातेवाईक जे कोणी आपल्याला त्रास देतात किंवा ज्यांचा आपल्याला त्रास होतो, अशा लोकांकडे मनाच्या पातळीवर गमतीने बघायला शिका. मनातल्या मनात त्यांची टेर ओढली तरी त्यांना कळणार नाही, राग येणार नाही आणि आपल्याही रागाचा निचरा होऊन जाईल. एकदा राग गेला कि त्या व्यक्तीची, परिस्थितीची सकारात्मक बाजू आपण बघू शकू. 

स्वतःशी संवाद साधायचा आहे, तर तो चांगलाच संवाद साधायला हवा. संवाद म्हणजे विचार. आपले विचार सकारात्मक हवे असतील तर आपल्याला बाह्य रूपात धीर गंभीरपणे आणि अंतर्गत मनाला एखाद्या खोडकर मुलाप्रमाणे विषय हलका फुलका करता आला पाहिजे. 'मन चिंती ते वैरी न चित्ती', असे म्हणतात. मग मनात वाईट विचार आणायचेच कशाला? बाह्य जगात राग, लोभ, प्रेम सगळे काही केले तरी अंतर्गत मनाची शांतता अबाधित राहिली पाहिजे. 

यासाठी मनाच्या पातळीवर तटस्थ पणे परिस्थितीचे अवलोकन करा. त्या प्रसंगातली गंमत शोधून त्या क्षणाचा आनंद घ्या. ही वरवर सोपी वाटणारी पण प्रयत्नांती शक्य असणारी क्रिया ज्या दिवशीपासून जमेल, त्या दिवसापासून पुढचे ३६५ दिवस आनंदाचे सुरू होतील. नवीन वर्षाच्या आणि नवीन आयुष्याच्या शुभेच्छा!

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य