शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

योग साधना करताना पाणी का पिऊ नये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 14:28 IST

जेव्हा तुम्ही योगाचा सराव करता, तेव्हा तुम्ही शरीरातले 'उष्ण' वाढवत असता. जर तुम्ही थंड पाणी प्यायले तर उष्ण वेगाने खाली येईल, आणि यामुळे इतर विविध प्रतिक्रिया उद्भवतील.

योग साधना करत असताना, शरीरात योग्य परिस्थिती राखण्याचे महत्त्व आणि सराव करत असताना पाणी का पिऊ नये, याबद्दल सद्गुरू पुढील लेखात सांगतात.प्रश्नकर्ता: नमस्कार सद्गुरू, आपण म्हणालात की योग सराव करताना पाणी पिऊ नये किंवा बाथरूमला जाऊ नये - असं का?

सद्‌गुरु: जेव्हा तुम्ही योगाचा सराव करता, तेव्हा तुम्ही शरीरातले 'उष्ण' वाढवत असता. जर तुम्ही थंड पाणी प्यायले तर उष्ण वेगाने खाली येईल, आणि यामुळे इतर विविध प्रतिक्रिया उद्भवतील. याने एलर्जी, अतिरिक्त म्युकस व अशा समस्यांची शक्यता वाढते. जर तुम्ही योगासनांचा एका विशिष्ठ तीव्रतेने सराव करीत असाल आणि अचानक थंड पाणी प्यायले तर तुम्हाला लगेच सर्दी होऊ शकते. आणि सरवादरम्यान बाथरूमला कधीही जाऊ नका कारण सराव करताना घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर गेले पाहिजे. हळूहळू या शरीराच्या सक्तीपूर्ण प्रवृत्ती कमी करण्याचा विचार आहे जेणेकरुन एक दिवस जर तुम्ही स्वस्थ बसलात तर तुम्ही स्वतः योगस्वरूप बनाल - केवळ योगाचा सराव करणे नाही.

हळू हळू, जसे तुम्ही सराव करता तसा तुमचा हा योग तुमच्यात आकार घेतो. जर तुम्ही काही आसने केली तर तुमच्या डोक्याच्या वरच्या भागातून घाम यायला हवा- संपूर्ण शरीरावर नाही.बाकी शरीराला हवामानाच्या परिस्थितीनुसार घाम फुटू शकतो, परंतु मुख्य घाम तुमच्या डोक्यातून यायला हवा. याचा अर्थ तुम्ही तुमची उर्जा योग्य दिशेने निर्देशित करीत आहात आणि आसने केल्याने ते नैसर्गिकरित्या होईल. अंतिम लक्ष्य हे तुमचं डोकं हे एका सर्वस्वी वेगळ्या तत्वाचे कारंजे व्हायला हवे , जेणेकरुन आपण प्रथम खराब पाण्याने सराव करा. जर तुम्ही तुमच्यातले उष्ण वर ढकलंत ठेवले तर स्वाभाविकच खराब पाणी वरच्या दिशेला जाईल. जर तुमची शरीरयंत्रणा खूपच गरम झाली तर थोड्याशा शवासनाने शांत करा, परंतु थंड पाण्याने उष्णता कमी करू नका. बाथरूममध्ये जाण्याऐवजी ते घामाच्या स्वरूपात बाहेर गेले पाहिजे त्या मार्गाने शरीरातील शुद्धीकरणाची प्रक्रिया कितीतरी प्रभावी बनते.

सरावाच्या वेळी, जर तुम्हाला खूप घाम येत असेल, तर सहसा तुमचे कपडे त्याने भिजतील. पण जर आपण उघड्या अंगाने असाल, तर नेहमी घाम परत शरीरात चोळून जिरवावा, कारण त्यामध्ये आंतरिक प्राणाचा एक अंश असतो जो आपल्याला हरवायचा नाहीये. जेव्हा आपण घाम पुन्हा शरीरात जिरवतो तेव्हा आपल्या शरीरात एक विशिष्ट वलय आणि शक्ती निर्माण होते -आपल्या स्वतःच्या ऊर्जेचा एक कोश - ज्याला कवच देखील म्हणता येईल, आपल्याला हे शरीरा बाहेर घालवायचे नाही. योग हा शरीराचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आहे. जर आपण नियमितपणे आसने केली, आणि आपण आपला घाम परत शरीरामध्ये जिरवला तर आपण काही प्रमाणात उष्ण निर्माण करत आहे आणि प्राण अधिक प्रखर करत आहे. गरम हवामान, थंड हवामान, भूक, तहान - या सर्वांपासून तुम्ही पूर्णपणे मुक्त व्हाल असे नाही - परंतु या गोष्टी आपल्याला जास्त त्रास देखिल देणार नाहीत.