शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

देवाच्या पूजेची फुले कचऱ्याच्या टोपलीत का टाकू नयेत? ती कुठे टाकणे योग्य? ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 15:35 IST

केवळ देवाला वाहिलेली फुले नाहीत, तर निर्माल्याचा फुलांमध्येही भाविकांचा भक्तिभाव रुजलेला असतो, त्यासाठीच त्याची सुयोग्य व्यवस्था लागली जाते.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये केर काढणाऱ्या केरसुणीलाही लक्ष्मी मानतात. तिचे दिवाळीत पूजन करतात. तिला चुकून जरी पाय लागला तरी नमस्कार करतात. तेव्हा अशा या अतिउच्च संस्कृतीमध्ये देवाला आदल्या दिवशी वाहिलेल्या व दुसऱ्या दिवशी निर्माल्य झालेल्या फुलांनाही महत्त्व दिले आहे. यात नवल नाही.

पण पूजा ही मूलत: आर्य संस्कृतीमध्ये नव्हती. आर्यांना पूजन माहित नव्हते, त्यांना यजन माहित होते. ऋग्वेदामध्ये पूजा हा शब्द देखील नाही. पूजा हा द्राविड भाषेतील शब्द आहे. त्यातील पू चा अर्थ पुष्प असा आहे. पू अधिक जेय म्हणजे पुष्पलंकरण होय. त्यावरून पुढे पूजा हा शब्द आपल्याकडे निर्माण झाला असावा. यातील तात्पर्य असे की पूजेच्या वेळी देवांना फुले वाहून अलंकृत करण्यात येते.  दुसऱ्या दिवशी त्याचे रुपांतर निर्माल्यात होते.

'देवस्वत्वनिवृत्तिविशिष्ट देवदत्तं वस्तू' म्हणजे देवाला अर्पण केलेली, पण नंतर देवाने तिच्यावरील स्वामित्त्व काढून घेतलेली अशी जी वस्तू ती निर्माल्य होय. मग ती फुले असोत वा दूर्वा तुळशीसारखी तृणपल्लवी असो. बेल मात्र त्याला अपवाद आहे. तो कितीही वेळा वाहिला तरी त्याचे निर्माल्य होत नाही. 

काही काही पूजांची लागलीच सांगता होते. तेव्हा अशा प्रसंगी देवाला वाहिलेली फुले पुष्पमाला किंवा देवाला एकदा वाहून काही वेळाने काढलेल्या पुष्पमाला, फुले ही सुद्धा निर्माल्यच मानतात.

देवांमधील चैतन्याचा गंध या फुलांच्या माध्यमातून मंदिरात, घरात दरवळून आपणास प्राप्त होतो. यापुढे त्या फुलांना, माळांना पावित्र्य प्राप्त होते. तेव्हा अशा कोणत्याही पवित्र वस्तुला पाय लावीत नाहीत. इतकेच नव्हे, तर देवांवरील असे निर्माल्य काढल्यानंतर तो आपल्या भाळी लावून हुंगतात, त्यात सुरलेल्या देविक चैतन्याचाही लाभ व्हावा, ही भावना असते. याला शिव निर्माल्य मात्र अपवाद आहे. कारण सुखी जीवन जगावे अशी निर्माल्य हुंगण्यामागील भावना असते. शिव ही संहारक देवता असल्याने त्याचा निर्माल्य हुंगीत नाहीत, असे सर्व प्रकारचे निर्माल्य साठवून किंवा लागलीच नदी किंवा जलाशयात टाकतात. केराच्या टोपलीत टाकत नाहीत. कारण त्याच्या पावित्र्याला धक्का लागू नये, ही त्यामागील श्रद्धा असते.