शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
2
Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
3
श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...
4
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
5
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
6
चुकीच्या वेळी दूध प्यायल्याने मुलांच्या वाढीवर परिणाम? सकाळ की संध्याकाळ... 'ही' आहे सर्वोत्तम वेळ
7
लग्नासाठी ऑनलाइन वधू शोधत होता अन् लागला ४९ लाखांचा चुना; पीचडी करण्याऱ्या तरुणासोबत काय घडलं?
8
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
9
भारतीय युवकानं नाकारली ६७ लाखांची जॉब ऑफर; 'वर्क फ्रॉम होम'पासून का काढतायेत पळ? समोर आलं कारण
10
Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
11
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
12
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
13
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
14
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
15
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
16
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
17
हनिमूनच्या रात्री नवरी फक्त 'हे' म्हणाली, नवरदेव निघून गेला अन् परतलाच नाही; नेमकं काय घडलं?
18
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
19
स्मृती मंधानाला चीट केल्याची चर्चा, लग्नही पुढे ढकललं; सर्व प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला
20
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

रामाला नाचणी प्रिय का? याचे उत्तर मिळते संत कनकदास यांच्या 'रामधान्यचरित्र' काव्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 15:35 IST

एकादशीला तांदूळ खात नाही हे माहीत होते, पण विष्णुरूप रामाला नाचणी आवडत होती, हे तुम्हीदेखील पहिल्यांदाच ऐकत असाल तर वाचा ही गोष्ट!

समाज माध्यमावर माहितीचा पूर लोटलेला असतो. अशातच काही गोष्टी तर्कशास्त्राला धरून असतात तर काही बिनबुडाच्या. काही विषय चिंतनाचे ठरतात तर काही चिंतेचे! अशातच राम नवमीच्या काळात निनामी सदर गोष्ट वाचण्यात आली. तर्कसुसंगत असल्याने शिवाय संतांचे आणि त्यांच्या काव्याचे नाव नमूद केल्याने त्याबद्दल चिंतन करावेसे वाटले. नाचणीचे महत्त्व वेगळे सांगायला नको, पण त्याच्याशी रामकथा जोडली गेल्याने तिचे महत्त्व अधिकच वधारले असे म्हणता येईल. 

आता रामाचे आवडते धान्य कुठले ?,याचं उत्तर दडलंय एका भांडणात.

चला तर मग बघुया काय आहे हे भांडण.

भगवान श्रीरामांनी रावणाचा पराभव केला आणि ते अयोध्येला जायला निघाले. वाटेत गौतम ऋषींचा आश्रम लागला. त्यामुळे राम, लक्ष्मण आणि  सीतामाई त्यांना भेटायला गेले. गौतम ऋषींनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले. 

राम विजयी होऊन आला होता म्हणून गौतम ऋषींनी खास मेजवानीचे आयोजन केले होते. जेवणात प्रत्येक धान्यापासून बनवलेल्या एकेका पदार्थाचा समावेश होता. जेवताना गौतम ऋषी रामाला प्रत्येक धान्याची माहिती देत होते, त्यांचे गुणदोष सांगत होते. शेवटी ते म्हणाले, "या सर्व धान्यांमध्ये नाचणी सर्वश्रेष्ठ आहे." 

हे ऐकताच तांदळाला राग आला. तो तिथे प्रकट झाला आणि त्याने नाचणीला हिणवायला सुरुवात केली. "म्हणे नाचणी सर्वश्रेष्ठ. आहे काय त्या नाचणीत ? ना रंग ना रूप. छोटे छोटे दाणे आणि काळासावळा रंग. कशी वेडीबिद्री दिसते.""मी हंसासारखा पांढराशुभ्र आहे. मला तर फुलासारखा सुगंध येतो. आणि म्हणून लग्नात, इतर मंगलकार्यात अक्षता म्हणून मिरवण्याचा मान माझाच. म्हणून मीच धान्यांत श्रेष्ठ." 

हे ऐकून नाचणीचाही संयम सुटला. तिनेही आपली बाजू लावून धरली. "मी नसेन दिसण्यात सुंदर. पण गरीब असो किंवा श्रीमंत मी भेदभाव न करता सगळ्यांचे पोट भरते."

शब्दाने शब्द वाढत जातो. शेवटी या दोघांत श्रेष्ठ कोण हे ठरवण्याची जबाबदारी रामावर येऊन पडते. राम म्हणतात की "मी गेली १४ वर्षं घरापासून लांब आहे. मला घरी जायची ओढ लागली आहे. तेव्हा मी आधी अयोध्येला जातो. तिथे जाऊन मी ६ महिन्यांनी परत येईन  आणि मग माझा निर्णय देईन. पण तोपर्यंत तांदूळ आणि नाचणी दोघांना ६ महिने तुरुंगात डांबून ठेवण्यात यावे." 

राम अयोध्येला निघून जातात आणि इकडे तांदूळ व नाचणीची रवानगी तुरुंगात होते. ६ महिन्यांनी जेव्हा राम परत येतात तेव्हा या दोघांना तुरुंगातून बाहेर काढतात. तांदूळ खराब झालेला असतो आणि त्याला कीड लागलेली असते. नाचणी मात्र जशी असते तशीच बाहेर येते. 

हे बघून प्रभुराम म्हणतात. "तांदूळ आणि नाचणी दोघांवरही सारखीच आपत्ती कोसळली. पण तांदूळ खराब झाला आणि नाचणी तशीच राहिली." म्हणून ते आपले मत नाचणीच्या पारड्यात टाकतात. 

या प्रसंगानंतर राघवाचा जिच्यावर अनुराग (प्रेम) आहे ती रागी असं नवीन नाव नाचणीला मिळालं.

मित्रांनो तांदूळ आणि नाचणीच्या भांडणाची ही गोष्ट कानडी संत कनकदास यांच्या 'रामधान्यचरित्र' या काव्यात सांगितलेली आहे. 

माणसाचे चारित्र्य त्याच्या जन्मावरून, रंग रूपावरुन न ठरवता त्याचे विचार कसे आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कठीण प्रसंगात तो कसा वागतो यांच्यावरून केली पाहिजे. हे आपल्याला या कथेतून शिकायला मिळते...