शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

हनुमंताला आपल्या शक्तीचा विसर का पडला होता? त्याच्या शक्तीची जाणीव त्याला कशी झाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 2:41 PM

कठीण प्रसंगी कोणी गर्भ गळीत झाले असता, त्याला त्याच्या शक्तीची जाणीव करून देणे, या प्रसंगाची तुलना रामायणातल्या या प्रसंगाशी केली जाते. 

सीतेचे अपहरण झाले, तेव्हा राम लक्ष्मणासह सीतेच्या शोधार्थ निघाले होते. वाटेत त्यांची आणि हनुमंताची भेट झाली. सीतेचा शोध घेण्याकरता हनुमंतानेच सुग्रीव, जांबुवंत आणि आदी वानरसेनेशी हनुमंतांनी रामाचा परिचय करून दिला होता. सीतेला रावणाने पळवून लंकेत नेले आहे, हे कळल्यावर सीतेचा तपास काढण्यासाठी रामांनी हनुमंताला लंकेत जाण्यास सांगितले. तेव्हा हनुमंताने आपली असमर्थता व्यक्त केली. समुद्र पार करून लंकेत जाण्यास आपण योग्य नाही, असे म्हटले. तेव्हा त्याला जांबुवंतांनी त्याच्या ठायी असलेल्या अपार शक्तीची जाणीव करून दिली. परंतु, प्रश्न असा पडतो, की तोवर हनुमंत स्वतःकडे असलेल्या शक्तीपासून एवढा अनभिज्ञ का होता? हनुमंताने जन्मतःच भूक लागली म्हणून सूर्याचा गोळा फळ समजून खाण्यासाठी आकाशी झेप घेतली होती. सूर्याला गिळंकृत करायला निघालेल्या हनुमानावर देवेंद्राने वज्रप्रहार केला. त्यामुळे तो मूर्च्छित होऊन पडला. त्याला पाहून पवन देवांनी रागाने आपले काम थांबवले. सजीव सृष्टी हादरून गेली. सगळे देव त्यांना शरण आले. तेव्हा पवन देवांनी त्यांना अट घातली, 'माझ्या मुलाला शुद्धीवर आणा, तरच मी माझे कार्य पुन्हा सुरु करतो. 

देवेंद्राने हनुमंताला शुद्धीवर आणले आणि त्याच्यासकट सर्व देवांनी हनुमंताला आशीर्वाद आणि आपल्या जवळील विविध अस्त्र भेट म्हणून दिले. त्यामुळे बाल हनुमान सर्व शक्तिमान झाला होता. मात्र बाल वयात त्याला या शक्तीचा सदुपयोग कसा करावा हे माहीत नव्हते. तो खोडकर होता. त्याच्या खोड्यांमुळे सगळे त्रासले होते. विशेष म्हणजे ऋषी मुनी त्रस्त झाले होते. तेव्हा भृगु वंशातील ऋषींनी त्याला शाप दिला, 'हनुमंता तू तुझी शक्ती गमावून बसशील.' 

त्याच्या वतीने त्याच्या आई वडिलांनी माफी मागितली. तेव्हा ऋषींनी सांगितले, 'जेव्हा तुझ्या शक्तीची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा कोणी तुला त्या शक्तींची आठवण करून दिली तर या शक्ती परत मिळतील.' 

या आशिर्वादानुसार जांबुवंतांनी हनुमंताला त्याच्या शक्तीची जाणीव करून दिली आणि हनुमंताला आपल्या शक्तीची प्रचिती आली. 

म्हणून कठीण प्रसंगी कोणी गर्भ गळीत झाले असता, त्याला त्याच्या शक्तीची जाणीव करून देणे, या प्रसंगाची तुलना रामायणातल्या या प्रसंगाशी केली जाते.