शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

श्रीमंतीची व्याख्या सांगताना टेंबे स्वामी महाराज रावणाचे उदाहरण देत मृत्यूचे गूढ उकलतात... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 10:36 IST

जन्म, शिक्षण, पैसा, आयुष्य, अध्यात्म आणि मृत्यू यांची परस्पर सांगड घालून शेवट कसा असावा सांगताहेत प.पु. टेंबे स्वामी महाराज!

धड पडेस्तोवर आपण धडपड करतो, ते कशासाठी? तर धन-संपत्ती, वैभव, स्थैर्य यांच्या प्राप्तीसाठी. एवढे सगळे कमवूनही जेव्हा हे सुख उपभोगण्याची वेळ येते, तेव्हा आपल्या हातात वयाचा, आरोग्याचा, मनस्थितीचा पत्ता असतोच असे नाही. कधी डाव रंगतो, तर कधी अर्ध्यावर मोडतो. म्हणून संत सांगतात, ज्याला तुम्ही सुख समजत आहात, ते मुळात सुख नाही, ती माया आहे. त्यात अडकलेला मनुष्य कधीच खऱ्या सुखाची प्राप्ती करू शकत नाही. गाडी, बंगला, नोकर, चाकर, उच्च राहणी या सर्वांपेक्षा उच्च विचारसरणी महत्त्वाची आहे. हे पटवून देताना टेंबे स्वामी उदाहरण देतात,

एक लाख नाती सवा लाख पोती,उस रावण घर मे ना दिवा न बत्ती

भरभराटीचे ऐहिक जीवन, आर्थिक समृद्धी, भरपूर गणगोत म्हणजे जीवनाची इतिश्री असे समजणाऱ्यांना एके ठिकाणी श्री टेंबेस्वामी महाराज सांगतात, 'ऐहिक भोग जे मिळती ती भक्तीची फळे न होती' सोन्याच्या लंकेचा अधिपती, शेकडो स्त्रियांचा स्वामी आणि लाखो नातवंडे व पणतु असूनही अंत:काळी ज्याच्या घरी तिन्हीसांजेला दिवाबत्ती लावायला कोणी नव्हते, त्या रावणाच्या उदाहरणावरून स्पष्ट होते, की अंतकाळी परिवारातील कोणीही वाचवायला येत नाही. प्रत्येकजण आपापल्या कर्मांचा धनी असतो. भला मोठा समृद्ध परिवार वाढवणाऱ्या रावणाच्या आयुष्याच्या शोकांतिकेच्या काळ्याकुट्ट पार्श्वभूमीवर एकाकी संन्यस्त जीवन जगून विश्वाला प्रबोधन केलेले श्री नरसिंहसरस्वती स्वामीमहाराज, आदि शंकराचार्य, श्री ज्ञानेश्वर महाराज यांची तेजस्वी जीवने विद्युल्लतेप्रमाणे जाणवतात!

मरणोत्तर जे आपल्याबरोबर येणार नाही, येथेच सोडावे लागणार आहे, त्यासाठी सामान्य माणसे सोन्यासारखा दुर्मिळ नरदेह खर्ची घालतात. तर मरणोत्तर गतीचा विचार करून महायात्रेच्या पाथेयाची तयार संतपुरूष बालपणापासून करू लागतात. चार काटक्या जमवायच्या दोन अंडी घालायची आणि ती उबवीत बसायचे, एवढ्यासाठी मनुष्य जन्म नसतो, हे ते पक्के लक्षात ठेवतात.

तू जन्मता जरि स्वत: रडलास पोरा,आनंदुनीच हसला परि लोक सारा,ऐसेच पुण्य कर की मरताहि तू रे,तू हासशील परि विश्व रडेल सारे!

आज टेंबे स्वामी महाराजांची पुण्यतिथी. त्यांनी दत्तसेवा करून स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य सन्मार्गी लावले, तसे आपणही केवळ ऐहिक सुखामागे न धावता वेळीच पारमार्थिक सुखाची अनुभूती घेऊया.