शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

आवडती माणसं आपल्यातून निघून जातात, तेव्हा श्रीकृष्णाची एक गोष्ट नेहमी आठवते... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 12:15 IST

जगात एवढी वाईट माणसं असताना देव चांगल्या माणसांनाच का नेतो, हे कोडे उलगडणे कठीण; पण श्रीकृष्णाच्या कथेतून अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न!

आपल्या सर्वांचा लाडका गायक केके याचे काल वयाच्या ५३ व्या वर्षी अकाली निधन झाले. त्यावेळी त्याच्या चाहत्यांची पहिली प्रतिक्रिया होती, 'हे काही त्याचं जाण्याचं वय नव्हतं!'

तो गेला याचे वाईट वाटले, पण त्याला जोडूनच अनेकांच्या मनात नेहमीचा प्रश्नही आला, की एवढी वाईट माणसं जगात असताना देवाला चांगलीच माणसं का न्यावीशी वाटतात? यावर जुने जाणकार सांगतात, 'देवालाही आपल्यासारखीच चांगल्या माणसांची गरज असते म्हणून!' वस्तुतः ही सबब आपल्या मनाला पटत नाही आणि आपण आपल्या मनाच्या पातळीवर देवाशी शीतयुद्ध पुकारतो आणि त्याला जाब विचारतो... तू असं का केलंस? 

या मोहमायेत, संसारात अडकलेले आपण सामान्य जीव, या अवघड प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळणे कठीण. त्यामुळे आपण तात्पुरता शोक व्यक्त करतो आणि पुन्हा आपापल्या संसारात गुरफटून जातो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, 'मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे!' अर्थात आज दुसऱ्याच्या जाण्याचा शोक करणारा मनुष्य स्वतः अकस्मात कधी निघून जाईल हे सांगता येणार नाही. या गोष्टी समजत असल्या तरी मनात प्रश्न उरतोच, 'चांगल्या व्यक्तीच का?' यावर श्रीकृष्णाची एक गोष्ट आठवते. तिचा अन्वयार्थ लावून या प्रश्नाची उकल शोधण्याचा प्रयत्न करू. 

एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन एका जंगलातून जात होते. त्या जंगलात हिंस्त्र श्वापदे होती. नावालाही मनुष्य प्राणी नाही. अशा जागी गेल्यावर अर्जुनाने विचारलं, 'कृष्णा या निबिड अरण्यात मला का घेऊन आलास?' कृष्ण म्हणाले सांगतो...! दोघेही पायी पायी जंगलातून चालत होते. पाचोळा पायाखाली चुरडला जात होता. त्या घनघोर अरण्यात वृक्षांच्या दाटीमुळे सूर्यप्रकाश आत शिरायला वाव नव्हता. त्यामुळे दिवसा काळोख होता. चालता चालता ते अरण्याच्या शेवटाकडे पोहोचले.  तिथून पुढे स्वच्छ प्रकाशात पलीकडचा निसर्ग दिसत होता. काही कोसावर मानवी वस्तीदेखील दिसत होती. त्याच ठिकाणी एक झोपडी दिसली. कृष्ण म्हणाले, या झोपडीत जाण्यासाठी तुला सोबत घेऊन आलो आहे. जा, झोपडीचे दार ठोठव. अर्जुनाने तसे केले. एक आजीबाई झोपडीतून बाहेर आली. कृष्ण दर्शनाने आजी मोहरून गेली. म्हणाली, 'कृष्णा तुझ्या दर्शनासाठीच तग धरून होते. आता मी मरायला मोकळी.' 

आजीबाईंचा वनवासी पाहुणचार घेत अर्जुन म्हणाला, 'आजी तुम्ही एकट्याच राहता? मग उदरनिर्वाह कशावर करता?''झोपडीच्या पाठीमागे एक गाय आहे. तिचे दूध विकायला पलीकडच्या गावात जाते आणि त्यातून मिळणाऱ्या धान्यावर जगते आणि तिलाही जगवते.' आजी कृतार्थतेने सांगत होती. 

'पण या निबीड अरण्याजवळ राहताना भीती नाही वाटली?' अर्जुनाने आणखी एक प्रश्न विचारला. आजीबाई म्हणाली, 'नाही वाटली, कृष्णाचं नाव घेत जगत होते. तो तर गोपाळ आहे. तो असताना मला आणि माझ्या गायीला कशाची भीती असणार आहे? माझी गाय माझे सर्वस्व आहे. तिच्याच जीवावर आणि कृष्णाच्या भरवशावर जगत आहे.' 

एवढं बोलून झाल्यावर कृष्णाने आजीबाईंना आशीर्वाद दिला आणि अर्जुनासह ते झोपडीतून बाहेर पडले. आजी झोपडीत होती. कृष्णाने बाहेर पडताच म्यानेतून तलवार काढत गायीला ठार केले. अर्जुन बघतच राहिला. म्हणाला, 'कृष्णा हे काय केलंस? आजीबाईंच्या जगण्याचं साधनच हिरावून घेतलंस?'श्रीकृष्ण म्हणाले, 'अर्जुना आजीचा सगळा जीव गायीत अडकला होता आणि गायीचा आजीत. मी आजीचा जीव काढून घेतला आणि तिचा मोह मायेचा मार्ग मोकळा केला. माझे भक्त आज ना उद्या माझ्याकडे यायचेच आहेत. त्यांना या क्लेशदायी जगात त्रास होऊ नये म्हणून मी त्यांचा कार्यकाल पूर्ण होताच तडक माझ्याकडे बोलावून घेतो! आजीचे व गायीचे कार्य पूर्ण झाले होते, म्हणून स्वहस्ते त्यांना मी परमधामाचा मार्ग दाखवला!

या कथेचा अन्वयार्थ काढायचा तर असे लक्षात येईल की, चांगल्या व्यक्ती तडकाफडकी निघून जातात आणि दुष्ट, खाष्ट, वाईट वृत्तीची माणसं दीर्घकाळ आपले भोग भोगत राहतात!