शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

जेव्हा आयुष्य निरस वाटू लागेल, तेव्हा 'या' रामायणाची पटकन उजळणी करा, मनाला उभारी मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 07:00 IST

'आयुष्यात राम उरला नाही' असे आपण म्हणतो, पण आपणही रामायणाचे एक भाग असतो; कसे ते वाचा!

आयुष्य कंटाळवाणे वाटू लागले की आयुष्यात राम उरला नाही असे आपण म्हणतो. परंतु रामाशिवाय आपले आयुष्यच पूर्ण होणार नाही, याची प्रचिती आपल्याला फार उशिरा येते. जे रामायण रामकथेमुळे आपल्याला गोड वाटते, त्या रामायणाचे आपणही एक भाग असतो. नव्हे तर ते रामायण आपल्या आतच घडत असते. मग राम उरला नाही असे म्हणून कसे चालेल? या गोष्टीची जाणीव करून देणारी एक सुंदर कविता-

|| शरीरी वसे रामायण ||

जाणतो ना कांही आपणशरीरी आपुल्या वसे रामायण || धृ ||

आत्मा म्हणजे रामच केवळ,मन म्हणजे हो सीता निर्मळ !जागरुकता हा तर लक्ष्मण,शरीरी आपुल्या वसे रामायण ||१||

श्वास, प्राण हा मारुतराया,फिरतो जगवित आपुली काया |या आत्म्याचे करीतो रक्षणशरीरी आपुल्या वसे रामायण ||२||

नील जाम्बुवंत रक्त नसा या,फिरती शोधत जनक तनयागर्वच म्हणजे असतो रावणशरीरी आपुल्या वसे रामायण ||३||

रक्त पेशी त्या सुग्रीव, वानर,भाव भावना त्यातील वावरमोहांधता करी आरोग्य भक्षणशरीरी आपुल्या वसे रामायण ||४||

नखें केंस त्वचा शरीरावरती,शरीर नगरीचे रक्षण करतीबंधु खरे हे करती राखणशरीरी आपुल्या वसे रामायण ||५||

क्रोध म्हणजे कुंभकर्ण तो,शांत असता घोरत पडतोडिवचताच त्या करी रणक्रंदनशरीरी आपुल्या वसे रामायण ||६||

गर्वे हरले सौख्य मनाचेकांसाविस हो जीवन आमुचेसंकटी येई शरीर एकवटूनशरीरी आपुल्या वसे रामायण ||७||

मनन करता भगवंताचे,रक्षण होईल आरोग्याचेराम जपाचे अखंड चिंतनशरीरी आपुल्या वसे रामायण ||८||

|| श्री रामार्पणमस्तु ||