शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

जे घडते ते पूर्णपणे आपल्या पारमार्थिक हिताचेच असते! - तुकाराम महाराज 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 8:00 AM

देवाने आपल्याला किती किती चांगल्या गोष्टींचे दान दिलेले आहे याचा विचार आपण करीत नाही. जरा कुठे बिनसले, की त्याला आपण दोष देतो.

आपण जे भोग भोगतो, ते आपल्या कर्माचे प्रारब्ध असतात. आपण चांगल्या गोष्टी उपभोगून मोकळे होतो. परंतु वाईट गोष्टी आयुष्यात घडू लागल्या की देवाला डागण्या द्यायला सुरुवात करतो. याबाबत तुकाराम महाराज म्हणतात... 

बोल नाही तुझ्या दातृत्वपणासी, आम्ही अविश्वासी सर्वभावे।दंभे करू भक्ती सोंग दावू जना, अंतरी भावना वेगळिया।चित्ताचा तू साक्षी तुज कळे सर्व, किती करू गर्व आता पुढे।तुका म्हणे देवा तू काय करिसी, कर्मा दुस्तरासी आमुचिया।।

देवाने आपल्याला किती किती चांगल्या गोष्टींचे दान दिलेले आहे याचा विचार आपण करीत नाही. जरा कुठे बिनसले, एखाद्या कामात यश नाही आले, एखादे दुखणे आले, संकट आले, की `देवा माझ्यावर का रे असा प्रसंग आणलास?' म्हणून त्याला आपण दोष देतो. पण आपण हे ओळखत नाही की 

नादत्ते कस्यचित्त पापं न चैव सुकृतं विभु:। अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तव:।

देव कोणाचे पाप घेत नाही, पुण्य घेत नाही, जो तो निजकर्माचा भोग भोगतो. ज्ञानावर अज्ञानाचे आवरण पडलेले असते. त्यामुळे प्राणिमात्र कर्तेपणा स्वत:कडे घेऊन मोहमूढ होतात. परमेश्वराच्या औदार्याला सीमा नाही. आपली श्रद्धाच कमी पडते. जे घडते ते पूर्णपणे आपल्या पारमार्थिक हिताचेच असते. कधीकधी दु:खानेच माणूस जास्त शहाणा होतो. ते शिकवते. कार्य करण्यास प्रवृत्त करते. आपल्या चित्ताचा देव साक्षी असतो. भक्तीचे सोंग लोकांपुढे एखाद्याने आणले तरी आतून देहबुद्धी गेलेली नसते. 

शरीर सुखासाठी, मन कीर्तीसाठी, भावना जिव्हाळ्यासाठी आसुसलेल्या असतात. देव ते जाणतो. परिपूर्ण श्रद्धेचे फळ त्या भक्ताला मिळत नाही. मी मोठा भक्त आहे, मी पुण्यकृत्येच करतो. असा आव आणला तरी देव फसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे आमचे कर्मच दुर्धर आहे की तू आम्हाला सोडवूच शकत नाहीस. आम्हाला सुद्धा खरी मुक्ती नकोच असते. काहीही करून स्वार्थच साधायचा असतो. त्याला तू काय करणार?