शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

जे घडते ते पूर्णपणे आपल्या पारमार्थिक हिताचेच असते! - तुकाराम महाराज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 08:00 IST

देवाने आपल्याला किती किती चांगल्या गोष्टींचे दान दिलेले आहे याचा विचार आपण करीत नाही. जरा कुठे बिनसले, की त्याला आपण दोष देतो.

आपण जे भोग भोगतो, ते आपल्या कर्माचे प्रारब्ध असतात. आपण चांगल्या गोष्टी उपभोगून मोकळे होतो. परंतु वाईट गोष्टी आयुष्यात घडू लागल्या की देवाला डागण्या द्यायला सुरुवात करतो. याबाबत तुकाराम महाराज म्हणतात... 

बोल नाही तुझ्या दातृत्वपणासी, आम्ही अविश्वासी सर्वभावे।दंभे करू भक्ती सोंग दावू जना, अंतरी भावना वेगळिया।चित्ताचा तू साक्षी तुज कळे सर्व, किती करू गर्व आता पुढे।तुका म्हणे देवा तू काय करिसी, कर्मा दुस्तरासी आमुचिया।।

देवाने आपल्याला किती किती चांगल्या गोष्टींचे दान दिलेले आहे याचा विचार आपण करीत नाही. जरा कुठे बिनसले, एखाद्या कामात यश नाही आले, एखादे दुखणे आले, संकट आले, की `देवा माझ्यावर का रे असा प्रसंग आणलास?' म्हणून त्याला आपण दोष देतो. पण आपण हे ओळखत नाही की 

नादत्ते कस्यचित्त पापं न चैव सुकृतं विभु:। अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तव:।

देव कोणाचे पाप घेत नाही, पुण्य घेत नाही, जो तो निजकर्माचा भोग भोगतो. ज्ञानावर अज्ञानाचे आवरण पडलेले असते. त्यामुळे प्राणिमात्र कर्तेपणा स्वत:कडे घेऊन मोहमूढ होतात. परमेश्वराच्या औदार्याला सीमा नाही. आपली श्रद्धाच कमी पडते. जे घडते ते पूर्णपणे आपल्या पारमार्थिक हिताचेच असते. कधीकधी दु:खानेच माणूस जास्त शहाणा होतो. ते शिकवते. कार्य करण्यास प्रवृत्त करते. आपल्या चित्ताचा देव साक्षी असतो. भक्तीचे सोंग लोकांपुढे एखाद्याने आणले तरी आतून देहबुद्धी गेलेली नसते. 

शरीर सुखासाठी, मन कीर्तीसाठी, भावना जिव्हाळ्यासाठी आसुसलेल्या असतात. देव ते जाणतो. परिपूर्ण श्रद्धेचे फळ त्या भक्ताला मिळत नाही. मी मोठा भक्त आहे, मी पुण्यकृत्येच करतो. असा आव आणला तरी देव फसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे आमचे कर्मच दुर्धर आहे की तू आम्हाला सोडवूच शकत नाहीस. आम्हाला सुद्धा खरी मुक्ती नकोच असते. काहीही करून स्वार्थच साधायचा असतो. त्याला तू काय करणार?