शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

जे घडते ते पूर्णपणे आपल्या पारमार्थिक हिताचेच असते! - तुकाराम महाराज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 08:00 IST

देवाने आपल्याला किती किती चांगल्या गोष्टींचे दान दिलेले आहे याचा विचार आपण करीत नाही. जरा कुठे बिनसले, की त्याला आपण दोष देतो.

आपण जे भोग भोगतो, ते आपल्या कर्माचे प्रारब्ध असतात. आपण चांगल्या गोष्टी उपभोगून मोकळे होतो. परंतु वाईट गोष्टी आयुष्यात घडू लागल्या की देवाला डागण्या द्यायला सुरुवात करतो. याबाबत तुकाराम महाराज म्हणतात... 

बोल नाही तुझ्या दातृत्वपणासी, आम्ही अविश्वासी सर्वभावे।दंभे करू भक्ती सोंग दावू जना, अंतरी भावना वेगळिया।चित्ताचा तू साक्षी तुज कळे सर्व, किती करू गर्व आता पुढे।तुका म्हणे देवा तू काय करिसी, कर्मा दुस्तरासी आमुचिया।।

देवाने आपल्याला किती किती चांगल्या गोष्टींचे दान दिलेले आहे याचा विचार आपण करीत नाही. जरा कुठे बिनसले, एखाद्या कामात यश नाही आले, एखादे दुखणे आले, संकट आले, की `देवा माझ्यावर का रे असा प्रसंग आणलास?' म्हणून त्याला आपण दोष देतो. पण आपण हे ओळखत नाही की 

नादत्ते कस्यचित्त पापं न चैव सुकृतं विभु:। अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तव:।

देव कोणाचे पाप घेत नाही, पुण्य घेत नाही, जो तो निजकर्माचा भोग भोगतो. ज्ञानावर अज्ञानाचे आवरण पडलेले असते. त्यामुळे प्राणिमात्र कर्तेपणा स्वत:कडे घेऊन मोहमूढ होतात. परमेश्वराच्या औदार्याला सीमा नाही. आपली श्रद्धाच कमी पडते. जे घडते ते पूर्णपणे आपल्या पारमार्थिक हिताचेच असते. कधीकधी दु:खानेच माणूस जास्त शहाणा होतो. ते शिकवते. कार्य करण्यास प्रवृत्त करते. आपल्या चित्ताचा देव साक्षी असतो. भक्तीचे सोंग लोकांपुढे एखाद्याने आणले तरी आतून देहबुद्धी गेलेली नसते. 

शरीर सुखासाठी, मन कीर्तीसाठी, भावना जिव्हाळ्यासाठी आसुसलेल्या असतात. देव ते जाणतो. परिपूर्ण श्रद्धेचे फळ त्या भक्ताला मिळत नाही. मी मोठा भक्त आहे, मी पुण्यकृत्येच करतो. असा आव आणला तरी देव फसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे आमचे कर्मच दुर्धर आहे की तू आम्हाला सोडवूच शकत नाहीस. आम्हाला सुद्धा खरी मुक्ती नकोच असते. काहीही करून स्वार्थच साधायचा असतो. त्याला तू काय करणार?