शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मोक्ष म्हणजे तरी काय...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 6:58 PM

हृदयातील संपूर्ण कामवासना नष्ट होऊन मनुष्य जेव्हा पूर्णपणे वैराग्यसंपन्न होतो तेव्हाच तो मुक्त होतो आणि ही मुक्तावस्था म्हणजेच मोक्ष..!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

आपल्या भारतीय धर्मशास्त्राने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थांना नितांत महत्त्व दिले आहे. मनुष्य देहातच या चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती करता येते इतर देहात हे कालत्रयी शक्य नाही.

आपल्या सर्वांना काही प्रश्न सतत पडत असतात ते असे की, मोक्ष म्हणजे नेमके काय...?तो कुठे असतो..?कुठे गेले म्हणजे तो प्राप्त होतो..?

तर लक्षांत घ्या की, मोक्ष आकाशात नाही, पाताळात नाही, भूतलावर नाही. मोक्ष तर आज, आत्ता, इथेच मिळवता येतो. शिवगीताकार मोक्षाचे वर्णन करतात -

मोक्षस्य न हि वासोडस्ति न ग्रामांत्तर मेव ना ।अज्ञान ह्रदयग्रंथि नाशो मोक्ष इति स्मृत: ॥ 

हृदयातील संपूर्ण कामवासना नष्ट होऊन मनुष्य जेव्हा पूर्णपणे वैराग्यसंपन्न होतो तेव्हाच तो मुक्त होतो आणि ही मुक्तावस्था म्हणजेच मोक्ष..!

देहाच्या ठिकाणी अहं आणि मम हे दोन भाव सतत निर्माण होत असतात. या भावापासून वेगळे होणे, भावातीत होणे म्हणजे मोक्ष..! देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी रत झाली की जीवाला बंध प्राप्त होतो व आत्म्याच्या ठिकाणी आत्मबुद्धी रत झाली की मोक्ष प्राप्त होतो. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे खरं तर जीवनमुक्त अवस्था प्राप्त होत नाही यासाठी आत्मज्ञानाचीच गरज असते.

रज्जूवर भासलेल्या सर्पाला मारण्याकरिता कुठले शस्त्र वापरणार..? अहो.! दोरीवर सापाचा भास झाला तो घनदाट किर्र्  अंधारामुळे. हा फक्त भास झाला आहे. तो साप आहे की दोरी याचे ज्ञान फक्त प्रकाशानेच होणार आहे. तसे देह म्हणजेच मी या अज्ञान ग्रंथीची निवृत्ती फक्त आत्मज्ञानाच्या प्रकाशानेच होणार आहे.

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -

वाचुनी ज्ञानेविण एके ।उपाय करिसी जितुके ।तिही गुंफसि अधिके ।रुखी इथे ॥

एका आत्मज्ञानावाचून या वृक्षाला छेदण्याचे जेवढे म्हणून आपण प्रयत्न करू तेवढे आपण अधिक बंधनात पडू. हे आत्मज्ञान याच देहात, जिवंतपणी प्राप्त करावयाचे आहे. मोक्ष काही मृत्यूनंतर मिळविण्याचे साधन नाही. मोक्ष हा जिवंतपणी घ्यावयाचा अनुभव आहे.

ज्ञानराज माऊली म्हणतात -

मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल ।ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख ॥

दीप गेल्यावरी कैचा जी प्रकाश ।झाका झाकी त्यास कासयाची ॥

जवंवरी देह आहे तवंवरी साधन ।करूनिया ज्ञान सिद्ध करा ॥

आहे मी हा कोण करावा विचार ।म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक