शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
2
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
4
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
5
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
6
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
7
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
8
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
9
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
10
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
11
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
12
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
13
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
14
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
15
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
16
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
17
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
18
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
19
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
20
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा आणि विश्वास यात नेमका फरक काय? गौर गोपाल दासांनी या गोष्टीतून दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 07:00 IST

देवावर आपली श्रद्धा आहे असे आपण नेहमी म्हणतो, पण त्याच्यावर विश्वासही आहे, हे कसे तपासावे? हे समजून घेण्यासाठी गौर गोपाल दास यांच्या गोष्टीची मदत घ्या.

आपण म्हणतो, की देवावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण संकटकाळी जेव्हा देव आपली परीक्षा घेतो, आपल्याला एकटे सोडतो, तेव्हा अचानक तो विश्वास डळमळीत होऊ लागतो. एवढेच नाही, तर आपण त्याचे अस्तित्वही नाकारतो. मग याला विश्वास म्हणायचे का?

महाभारतात १०० कौरवांसमोर ५ पांडवांचा विजय झाला, का? कारण साक्षात श्रीकृष्ण त्यांच्या पाठीशी होता. तेच जर, दुर्योधनाने श्रीकृष्णाला मागून घेतले असते, तर कदाचित वेगळाच इतिहास घडला असता. मात्र, दुर्योधनाने कृष्णापेक्षा त्याच्या अठरा औक्षहणी सैन्यावर विश्वास दाखवला आणि परमात्म्याचा संग नाकारला. याउलट अर्जुनाने, श्रीकृष्णावर विश्वास दाखवला आणि तुझे सैन्य नको, फक्त तू सोबत हवा, असे म्हटले आणि त्याच्या मार्गदर्शनाने विजय मिळवला.असा विश्वास असायला हवा. हेच सांगताना, साधू गौर गोपाल दास प्रभू सुंदर गोष्ट सांगतात....

एकदा एका विमानप्रवासात सगळे प्रवासी शांतपणे झोपले होते. अचानक विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला. प्रवाशांना सूचना मिळेपर्यंत विमान हवेत हेलकावे खाऊ लागले. एका क्षणी तर विमान १८० अंशात आकाश-पाताळाला समांतर झाले. सर्व प्रवाशांना वाटले, पुढचा क्षण आपण बघणार नाही. सगळे आरडा- ओरड करू लागले. रडू लागले. पायलटला दोष देऊ लागले. एकूणच सर्वांची भीतीने गाळण उडाली होती. 

मात्र, त्याच वेळी एक लहान मुलगी अजिबात भांबावून न जाता आपले गोष्टीचे पुस्तक छातीशी कवटाळून लोकांकडे बघत होती आणि हसत होती. ही गोष्ट एका माणसाच्या लक्षात आली. 

देवकृपेने काही क्षणातच विमान स्थिरस्थावर झाले आणि सुरक्षित ठिकाणी उतरवले गेले. सर्व प्रवासी देवाचे आभार मानत, एकमेकांचे अभिनंदन करत विमानातून उतार झाले. ती छोटी मुलगी, आपला सीट बेल्ट काढून उतरायला निघाली, तेव्हा त्या व्यक्तीने तिला थांबवून विचारले, 'बेटा, मगाशी एवढे लोक घाबरले असताना, आरडा-ओरड करत असताना, तू अगदी शांतपणे सर्वांकडे पाहत होतीस आणि नंतर काहीही न घडल्यासारखी पुन्हा पुस्तक वाचू लागलीस. तुला घडलेल्या प्रसंगाची भीती नाही वाटली?'

त्यावर ती मुलगी पुन्हा हसून म्हणाली, 'कसली भीती काका? या विमानाचे पायलट माझे बाबा आहेत, त्यामुळे सर्वांपेक्षा जास्त, त्यांना माझी काळजी असणार आणि ते आहेत म्हटल्यावर मला काहीच नाही होणार, याची मला खात्री होती.'

याला म्हणतात विश्वास! असा विश्वास आपण देवावर दाखवतो का, हे तपासून पाहायला हवे.

English
हिंदी सारांश
Web Title : Faith vs. Trust: Gaur Gopal Das explains with story.

Web Summary : Faith falters in crises, unlike unwavering trust. Mahabharata illustrates trusting Krishna. A girl's calm during turbulence, trusting her pilot father, exemplifies true faith in God.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीspiritualअध्यात्मिक