शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

Vastu Tips: तुमचे घर कृत्रिम फुलांनी सजवाल, तर घरातील आनंद, वैभव, शांततादेखील कृत्रिम रूप घेईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 10:28 IST

Vastu Shastra : कृत्रिम फुलांनी घराची सजावट करण्याचा ट्रेंड वाढत आहे. आर्टिफिशियल फुले दिसायला आकर्षक असली तरी वास्तूच्या दृष्टीने ती फायदेशीर असतात की नाही ते जाणून घ्या... 

वास्तुशोभेसाठी फुलांचा वापर करणे हा प्रयोग काही नवीन नाही. ही पद्धत पूर्वापार चालत आली आहे. अगदी राजा महाराजांच्या काळापासून! त्याकाळात त्यांच्या राजमहालाच्या अवती भोवती उपवन असे. त्यानंतरच्या काळात घराभोवती छोटीशी बाग केलेली असे. त्यानंतरच्या काळात गॅलरीत बागेची हौस भागवली जाऊ लागली. आणि आता तर तेवढेही बागकाम करायला वेळ नाही म्हणून कृत्रिम फुलांनी घर सजवण्याचा पर्याय शहरी घरांमध्ये आढळतो. सण उत्सवापुरता त्यांचा वापर ठीक आहे परंतु दररोज ती फुले घरात सजवून ठेवणे हिताचे नाही. ती फुलं दिसायला आकर्षक असतात, परंतु त्या फुलांमुळे रोगराई वाढण्याची आणि इतर संकटं ओढवून घेण्याची दाट शक्यता असते. 

घराच्या आवारात, परिसरात किंवा घरात फुलांची आकर्षक रचना करण्यामागे वास्तुशास्त्राचा हेतू होता, तो म्हणजे प्रसन्न वातावरणाची निर्मिती! केवळ फुलदाणीत फुलांची सजावट नाही, तर देवघरात देव्हाऱ्याभोवती फुलांची आरास, दारात फुलांची रांगोळी, प्रवेशद्वाराजवळ घंगाळ्यात पाण्यावर तरंगणारी आकर्षक फुलं-पानं पाहून कोणाला बरे प्रसन्न वाटणार नाही? मात्र ती जागा आता कृत्रिम फुलांनी घेतली असल्यामुळे त्या फुलांना सुगंध, दरवळ नसला तरी ती आकर्षणापुरती वापरली जातात. मात्र वास्तुशास्त्राला त्या फुलांचा वापर अमान्य आहे. 

कुटुंबात दु:ख वाढू लागते

वास्तुशास्त्राविषयी बोलायचे झाले तर, कृत्रिम फुले घरात लावू नयेत. याचे कारण कृत्रिम गोष्टी खरी अनुभूती देत ​​नाहीत. त्यामुळे संसाराचा खरा आनंदही खोटा वाटू लागतो. म्हणून कृत्रिम वस्तू, तसेच जुन्या वापरलेल्या वस्तू आपल्या घरात वापरणे टाळावे असे सांगितले जाते. अन्यथा घरात अशांतता वाढते. 

नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते

ज्योतिषशास्त्रानुसार कृत्रिम फुले आणल्याने नकळत नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. ही नकारात्मक उर्जा लवकरच कुटुंबातील सर्व लोकांना आपल्या कवेत घेते, घरच्यांची चिडचिड होते, वाद होतात. नकारात्मक प्रभाव वाढतो. 

आरोग्यावर वाईट परिणाम होतो

खरी फुले रोजच्या रोज बदलली जातात. मात्र खोटी फुले दिवसेंदिवस तशीच तशी राहतात. त्यावर धूळ, माती बसून आजारांना आमंत्रण मिळते. कीटकांचा, जीवजीवाणूंचा वावर वाढतो. त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरही होतो. कृत्रिम फुलांमुळे डोकेदुखी, मायग्रेन, मानसिक ताण, चक्कर येणे, ताप, यांसारख्या समस्या वाढतात. विशेषत: महिलांना या समस्या लवकर होतात, त्यामुळे ही बनावट फुले शक्यतो टाळावीत.

दिखावा करण्याची सवय वाढते

वास्तूनुसार घरामध्ये कृत्रिम फुले लावल्याने घरातील सदस्यांमध्ये खोटे बोलण्याची आणि दिखाऊपणाची वृत्ती वाढते. यामुळे त्यांना वास्तविक जगापासून दूर असलेल्या काल्पनिक आणि कृत्रिम जगात जगण्याची सवय होते, ज्यामुळे त्यांचे समाजापासून वेगळेपण वाढते. दिखाव्याच्या वृत्तीमुळे घरातील लोकांमधील आपुलकी कमी होते आणि वैमनस्य वाढते. त्यामुळेच अशी फुले घरात न लावलेलीच बरी!

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र