शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

Vastu Tips: आर्थिक संकट असो वा जुना आजार; झोपण्यापूर्वी 'या' उपायाने मिळेल समाधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:32 IST

Vastu Tips: रोजच्या जगण्यात त्रासदायक ठरतात दोन गोष्टी- पैशांची अडचण आणि शारीरिक व्याधी, यावर वास्तू शास्त्रात एक सोपा तोडगा सांगितला आहे!

आर्थिक संकट आणि असाध्य आजार कोणाचेही सुख आणि शांती हिरावून घेतात. कारण या दोन्ही गोष्टी मन:शांती हिरावून घेतात. जिथे मन शांत नसेल तिथे जगण्याचे समाधान तरी कसे मिळणार? हे चक्र गुंतागुंतीचे आहे. त्यावर समाधान म्हणून वास्तू शास्त्रात एक तोडगा सांगितला आहे. कोणता ते जाणून घेऊ. 

जीवनात सुख आणि दुःख हा मानवी जीवनाचा एक सामान्य भाग आहे. कधीकधी आपल्याला आयुष्यात खूप आनंद मिळतो, तर कधीकधी आपल्याला दुःखांशी झुंजावे लागते. वाईट काळातून बाहेर पडण्यासाठी आपण अनेक उपाय करतो आणि संकटातून बाहेर काढण्यासाठी देवाला प्रार्थना करतो. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वास्तुशास्त्र देखील उपाय सांगते. यापैकी एक उपाय रात्री झोपण्याशी संबंधित आहे. वास्तुशास्त्रानुसार, रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली अशी एक वस्तू ठेवा, ज्यामुळे आर्थिक संकटापासून ते आजार, मानसिक ताणापर्यंत सर्व दोष दूर होण्यास मदत मिळते. चला जाणून घेऊया तो वास्तु उपाय काय आहे.

झोपताना उशीखाली ठेवा 'ही' गोष्ट :

वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही अनेक समस्यांनी वेढलेले असाल आणि त्यापासून मुक्ती मिळवू इच्छित असाल, तर रात्री झोपताना उशीखाली मिठाची छोटीशी पुडी ठेवा. मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे काम करते आणि मनाला शांती प्रदान करते. त्यात इतकी नैसर्गिक शक्ती आहे की ते आजूबाजूला असलेल्या नकारात्मक लहरी शोषून घेते. मिठाच्या या उपायामुळे रात्री भयानक स्वप्न पडत नाहीत, आर्थिक अडचणीतून मार्ग सापडतो, दीर्घकाळापासून सुरु असलेला आजार कमी होतो आणि मन शांत, समाधानी आणि प्रसन्न राहण्यास मदत मिळते. 

वास्तुदोषही दूर होतो :

हा उपाय केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट करत नाही, तर घरातील वास्तुदोष दूर करण्यास देखील मदत करतो. यासाठी शुक्रवारी रात्री उशीखाली मिठाची पुडी ठेवा आणि आठवड्याने पुढच्या शुक्रवारी नवीन पुडी ठेवा. सलग ११ शुक्रवारी हा उपाय केल्याने घरातील वातावरण सकारात्मक होऊ लागते आणि कुटुंबात एकता वाढते.

आर्थिक अडचणीतून मार्ग : 

रात्री उशीखाली मिठाची पुडी ठेवून झोपल्याने मुख्यतः मानसिक शांतता लाभते. विचारचक्र थांबते. आजरपण कमी होते. आर्थिक अडचणीतून नवनवे मार्ग सापडतात. शिवाय आर्थिक वृद्धी व्हावी म्हणून मिठाची पुडी उशीखाली ठेवण्याआधी 'ओम धनाय नम:' या मंत्राचा ११ वेळा जप केला असता या उपायाचा अधिक लाभ होतो. 

(सदर माहिती सामान्य गृहीतके आणि वास्तू शास्त्राच्या मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.)

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र