शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 09:24 IST

Tulasi Vivah 2025 Celebration: यंदा २ ते ५ नोव्हेंबर तुळशी विवाह केला जाईल, मात्र हा विवाह लावून देण्यामागील पौराणिक कथा आणि लाभ जाणून घ्या. 

सृष्टीचे पालनकर्ता भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळस (Tulsi) अत्यंत प्रिय आहे. नैवेद्यावर तुळशीचे दल अर्थात तुळशीचे पान ठेवल्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते. कार्तिक महिन्यात दरवर्षी तुळशीचे लग्न विष्णू तथा कृष्ण अवतार असलेल्या शालिग्राम (Shaligram) यांच्यासोबत लावले जाते. देवउठनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हा विवाह सोहळा होतो आणि याच दिवसापासून चातुर्मास संपून सर्व शुभ-मंगल कार्याला पुन्हा सुरुवात होते. यंदा २ नोव्हेंबर रोजी देवउठनी अर्थात प्रबोधिनी एकादशी(Prabodhini Ekadashi 2025) आहे. या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह केला जातो. मात्र एकादशीला अनेक भाविकांचे उपास असल्याने लोक द्वादशी ते त्रिपुरी पौर्णिमा या कालावधीत तुलसी विवाह करतात. यंदा ५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरी पौर्णिमा(Tripuri Purnima 2025) आहे. 

कार्तिकी एकादशी २०२५: १ की २ नोव्हेंबर? अचूक तिथी, व्रतनियम आणि तुळशी विवाहाच्या तारखा जाणून घ्या!

पण श्री विष्णूंचे तुळशीशी लग्न लावून देण्यामागे काय आहे कारण? जाणून घेऊया तुळस-शालिग्राम विवाहाची पौराणिक कथा (Tulsi Vivah Katha)

पौराणिक कथांनुसार, जालंधर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता. या राक्षसाच्या पत्नीचे नाव वृंदा होते. वृंदा ही भगवान विष्णूंची निस्सीम भक्त होती. जेव्हा जालंधर युद्धावर जात असे, तेव्हा वृंदा भगवान विष्णूंची पूजा करत असे आणि तिच्या पतीव्रता धर्मामुळे जालंधरला हरवणे कोणत्याही देव-देवतेला शक्य नव्हते.

जालंधरच्या अत्याचारांनी जेव्हा सर्व देवी-देवता त्रस्त झाले, तेव्हा त्यांनी मदतीसाठी भगवान विष्णूंकडे धाव घेतली. भगवान विष्णूंनी सांगितले की, वृंदेचे सतीत्व नष्ट केल्याशिवाय जालंधरला पराभूत करणे शक्य नाही. यासाठी, भगवान विष्णूंनी जालंधरचे रूप घेतले आणि वृंदेच्या पतिव्रता धर्माचे उल्लंघन केले. वृंदेचे पतिव्रता धर्म खंडित झाल्यामुळे जालंधरच्या सर्व शक्ती नष्ट झाल्या. परिणामी, युद्धात तो भगवान शिवांशी लढताना हरला आणि शिवजींनी त्याचे शिर धडापासून वेगळे केले.

Manifestation Tips: पैसा, मनःशांती, समाधान, जे हवं ते सगळं मिळेल; फक्त रोज करा 'हे' तीन उपाय

वृंदेचा शाप आणि शालिग्राम अवतार:

आपल्यासोबत छल झाल्याचे जेव्हा जालंधरची पत्नी वृंदा हिला समजले, तेव्हा तिला प्रचंड राग आला. क्रोधित होऊन तिने जगाचे पालनहार असलेल्या भगवान विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला. भगवान विष्णूंनी तो शाप स्वीकारला आणि ते शालिग्राम रूपात पाषाण (दगड) बनले. यामुळे देवी लक्ष्मी खूप दुःखी झाल्या आणि त्यांनी वृंदेकडे शाप परत घेण्याची विनंती केली.

वृंदाने आपला शाप मागे घेतला, पण त्यानंतर तिने स्वतःला आत्मदाह केले. ती जळून भस्म झाल्यावर, तिच्या राखेतून एक रोपटे उगवले. भगवान विष्णूंनी त्या रोपट्याला 'तुळस' हे नाव दिले. तुळशीला माता लक्ष्मीचाच एक अंश मानले जाते.

भगवान विष्णू वृंदेच्या पतिव्रता धर्मावर खूप प्रसन्न होते, त्यामुळे त्यांनी वरदान दिले की, त्यांच्या शालिग्राम रूपाची पूजा नेहमी तुळशीसोबतच केली जाईल. तेव्हापासून दरवर्षी भगवान विष्णूंच्या शालिग्राम स्वरूपासह तुळशीचा विवाह करण्याची परंपरा सुरू झाली.

Marriage Astro Tips: लग्न ठरवताना घाई केली, तर भविष्यात हर्षल नेपच्युन देऊ शकतो धोका!

तुळशी विवाहाचे धार्मिक महत्त्व आणि लाभ : 

लक्ष्मी आणि विष्णूंचा आशीर्वाद: धार्मिक मान्यता आहे की, तुळशीचा विवाह केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांचीही कृपा प्राप्त होते.

आर्थिक समस्या दूर: हे व्रत किंवा विवाह केल्याने भक्ताला धन-समृद्धी आणि यश प्राप्त होते, तसेच आर्थिक समस्या दूर होतात.

विवाहातील अडथळे दूर: ज्यांच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील, त्यांचे अडथळे तुळशी विवाह विधीने दूर होतात, असे मानले जाते.

शुभ कार्यांची सुरुवात: तुळशी विवाहानंतर पुढील संपूर्ण वर्षासाठी विवाह आणि अन्य शुभ-मांगलिक कार्यांना सुरुवात होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Tulsi Vivah 2025: Why Vishnu Marries Tulsi Every Year?

Web Summary : Lord Vishnu marries Tulsi annually despite being Lakshmi's consort due to the legend of Vrinda's curse and blessing. Performing Tulsi Vivah brings prosperity, removes obstacles in marriage, and marks the beginning of auspicious events.
टॅग्स :ekadashiएकादशीPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण