शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

दुसऱ्याला चुकीचे ठरवण्याआधी एकदा त्याच्या बाजूने विचार करून बघा; कदाचित तुमचे मत बदलेलही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 17:43 IST

कोण चूक कोण बरोबर यापेक्षा काय बरोबर आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे!!!

बऱ्याचदा गोष्टी आपण पाहतो आणि त्यावरून आपण अनुमान काढतो. मात्र, परिस्थिती वेगळीही असू शकते, याचा विचार आपल्या मनाला शिवतही नाही. कारण, आपण परिस्थिती आणि वास्तव यात फरक असू शकतो. आपण दर्शनीय गोष्टींवर विश्वास ठेवतो, परंतु बऱ्याचदा परिस्थितीमागील वास्तव वेगळेच असते. उदा पहा.

एकदा बाईंनी शाळेत विद्यार्थ्याला गणित घातले, राजू, तुला दोन चॉकलेट आणि दोन चॉकलेट दिली, तर तुझ्याजवळ किती चॉकलेट झाली?' राजूने उत्तर दिले, पाच! बाईंनी पुन्हा प्रश्न विचारला. `राजू, दोन चॉकलेट आणि दोन चॉकलेट दिली, तर किती झाली?' राजूने पुन्हा तेच उत्तर दिले, `पाच!' एवढा साधा प्रश्न राजूला कळत नाही पाहून बाईंना राग आला. त्यांनी थोडे धीराने घेत राजूला वेगळ्या पद्धतीने प्रश्न समजावून पाहिला. `राजू, तुला दोन बिस्किटे दिली आणि दोन बिस्किटे दिली, तर तुझ्याजवळ किती बिस्किटे झाली?' राजू म्हणाला `चार' बाईंना हुश्श्य झाले! राजूला गणित कळले आहे, हे त्यांना कळल़े  त्यांनी पुन्हा खातरजमा करण्यासाठी राजूला दोन अधिक दोन चॉकलेट किती झाली विचारले, तर राजू पुन्हा `पाच' असे उत्तरला. शेवटी बाई ओरडल्या. `राजू दोन अधिक दोन बिस्किट चार होतात, तर दोन अधिक दोन चॉकलेट पाच कशी होतील?' त्यावर राजू निरागसपणे म्हणाला, `बाई, कारण एक चॉकलेट आधीच मला आईने दिले आहे आणि ते माझ्या बॅगेत आहे. म्हणून मी चॉकलेट पाच होतील असे म्हणालो.'

वरील उदाहरण पाहिले, तर बाईंना अपेक्षित उत्तर चुकीचे नव्हते, परंतु राजूचेही उत्तर अचूक होते. म्हणून दरवेळी तांत्रिक बाबी न तपासता वास्तवाचेही भान ठेवले पाहिजे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण नेमके तेच करत नाही. 

अनेकदा भांडणाचे विषय कळण्याआधीच मुख्य विषय सोडून भलत्याच विषयावरून वाद होतात आणि नाती दुरावतात. संशय निर्माण होतात. याउलट, दोन्ही व्यक्तींनी केवळ आपल्याला दिसत असलेले चित्र न पाहता त्यापलीकडची परिस्थिती जाणून घेतली, तर अनेक गोष्टींचे निराकरण सहज होऊ शकेल. 

आपल्याला वाटते, की आपला जोडीदार आपल्यावर प्रेम करत नाही. हे सत्य असेलही. परंतु, त्यामागील वास्तव आपण जाणून घेतले आहे का? बऱ्याचदा मुले पालकांचे ऐकत नाहीत, हे आपल्याला दिसते, परंतु ते का ऐकत नाहीत, हे आपण जाणून घेतो का? 

कोण चूक कोण बरोबर यापेक्षा काय बरोबर आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. नेहमी दोन अधिक दोन चार हा गणिताचा नियम सगळीकडे लागू होतोच असे नाही. नात्यांना नियमांच्या चौकटीत बसवण्यापेक्षा नात्यांना मोकळीक दिली, तर ती जास्त चांगल्या प्रकारे बांधली जातात. तो मोकळेपणा नात्यांमध्ये हवा असेल, तर नात्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न करा आणि राजूच्या दप्तरात जसे चॉकलेट दडले होते, तसे दर्शनीय परिस्थितीमागचे दडलेले वास्तव जाणून घ्या.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी