शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

महाभारत काळापासून आहे राजदंड देण्याची प्रथा; काय आहे त्यामागचा अर्थ? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 16:43 IST

राजदंडाचे मानकरी असणाऱ्यांना मिळणारे अधिकार कोणते आणि राजदंडाची रचना काय सुचवते? महाभारत काळात तो कोणाला मिळालेला ते पाहू! 

नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धर्मगुरूंच्या हस्ते सेंगोल अर्थात राजदंड बहाल करण्यात आला. ही अतिशय प्राचीन परंपरा आहे. तमिळनाडूच्या जुन्या मठाच्या अधिनाम महंतांच्या हस्ते तो राजदंड पंतप्रधानांना प्रदान करण्यात आला आणि आपली संस्कृती पुनश्च रुजवण्यात आली आहे. राजदंड केवळ सामर्थ्याचे प्रतीक नाही, तर ती मोठी जबाबदारी आहे, प्रजेसाठी समर्पित राहण्याची!

राजदंड हे सुबत्तेचे प्रतीक आहे. तो शासनकर्त्यांच्या हाती यासाठी सोपवला जातो, जेणेकरून त्याच्या राज्यात सर्व प्रजा धन धान्याने परिपूर्ण राहो आणि तसे ठेवण्याची क्षमता शासनकर्त्याला मिळो. तो एकार्थी लक्ष्मी मातेचा वरदहस्त मानला जातो. म्हणून त्याची रचनादेखील वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे आढळते. 

महाभारतातही आहे राजदंड दिल्याचा दाखला 

रामायण-महाभारताच्या कथांमध्ये असे वारसाहक्क सोपवल्याचे उल्लेख आढळतात. या कथांमध्ये मुकुट घालणे, मुकुट परिधान करणे हे सत्ता सोपवण्याचे प्रतीक म्हणून वापरलेले दिसते, पण त्यासोबतच एक धातूची काठीही राजाला देण्यात येत, ज्याला राजदंड असे म्हणत असत. महाभारतात युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाच्या वेळीही याचा उल्लेख आहे. शांतीपर्वात त्याविषयी सांगताना 'राजदंड हा राजाचा धर्म आहे, प्रजेचे रक्षण आणि आर्थिक सुबत्ता आणणे हे त्याचे कर्तव्य मानले जाते. तसे करण्यासाठी तो वचनबद्ध असतो.' राजदंड हे राजाच्या स्वैराचाराला आळा घालण्याचे साधनही आहे. महाभारत काळात महर्षी व्यासांनी तो धर्मराज युधिष्ठिराला सोपवला होता. 

दंड हा शिक्षेसाठी सुद्धा वापरला जातो. राजाची प्रजा गुण्यागोविंदाने नांदावी म्हणून त्याची न्यायव्यवस्था चोख असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. राजाने निःपक्षपातीपणे दोन्ही गटांची बाजू ऐकून मगच न्यायनिवाडा करायला हवा आणि गुन्हेगाराला कठोर शिक्षा देऊन राज्यात समता, बंधुता, शांतता प्रस्थापित केली पाहिजे. यासाठी त्याच्या हाती असलेली शक्ती म्हणजे राजदंड! मात्र राजाचे सगळेच निर्णय योग्य असतील असे नाही. आताच्या काळात जसे सर्वोच्च न्यायालय असते तसे त्याकाळात धर्मगुरूंना ते स्थान होते. राजाकडे उचित न्याय न मिळाल्यास प्रजा धर्मगुरुंकडे फिर्याद करू शकत असे. म्हणून राजदंड राजाच्या हाती असला तरी ते सोपवणारे धर्मगुरू राजाहून श्रेष्ठ मानले जात असत. राज्याच्या कारभारात ते ढवळाढवळ करत नसत, परंतु राजाकडून काही चूक घडत असल्याचे कळताच त्या विषयात हस्तक्षेप करून न्यायदान करत असत. 

असाच राजदंड नव्या संसद सदनाला आणि १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशाला पुनश्च मिळाला आहे. त्यामुळे देशात सुबत्ता, शांतता आणि वैभवसंपन्नता प्रस्थापित होईल अशी आशा बाळगूया!

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी