शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

महाभारत काळापासून आहे राजदंड देण्याची प्रथा; काय आहे त्यामागचा अर्थ? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 16:43 IST

राजदंडाचे मानकरी असणाऱ्यांना मिळणारे अधिकार कोणते आणि राजदंडाची रचना काय सुचवते? महाभारत काळात तो कोणाला मिळालेला ते पाहू! 

नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धर्मगुरूंच्या हस्ते सेंगोल अर्थात राजदंड बहाल करण्यात आला. ही अतिशय प्राचीन परंपरा आहे. तमिळनाडूच्या जुन्या मठाच्या अधिनाम महंतांच्या हस्ते तो राजदंड पंतप्रधानांना प्रदान करण्यात आला आणि आपली संस्कृती पुनश्च रुजवण्यात आली आहे. राजदंड केवळ सामर्थ्याचे प्रतीक नाही, तर ती मोठी जबाबदारी आहे, प्रजेसाठी समर्पित राहण्याची!

राजदंड हे सुबत्तेचे प्रतीक आहे. तो शासनकर्त्यांच्या हाती यासाठी सोपवला जातो, जेणेकरून त्याच्या राज्यात सर्व प्रजा धन धान्याने परिपूर्ण राहो आणि तसे ठेवण्याची क्षमता शासनकर्त्याला मिळो. तो एकार्थी लक्ष्मी मातेचा वरदहस्त मानला जातो. म्हणून त्याची रचनादेखील वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे आढळते. 

महाभारतातही आहे राजदंड दिल्याचा दाखला 

रामायण-महाभारताच्या कथांमध्ये असे वारसाहक्क सोपवल्याचे उल्लेख आढळतात. या कथांमध्ये मुकुट घालणे, मुकुट परिधान करणे हे सत्ता सोपवण्याचे प्रतीक म्हणून वापरलेले दिसते, पण त्यासोबतच एक धातूची काठीही राजाला देण्यात येत, ज्याला राजदंड असे म्हणत असत. महाभारतात युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाच्या वेळीही याचा उल्लेख आहे. शांतीपर्वात त्याविषयी सांगताना 'राजदंड हा राजाचा धर्म आहे, प्रजेचे रक्षण आणि आर्थिक सुबत्ता आणणे हे त्याचे कर्तव्य मानले जाते. तसे करण्यासाठी तो वचनबद्ध असतो.' राजदंड हे राजाच्या स्वैराचाराला आळा घालण्याचे साधनही आहे. महाभारत काळात महर्षी व्यासांनी तो धर्मराज युधिष्ठिराला सोपवला होता. 

दंड हा शिक्षेसाठी सुद्धा वापरला जातो. राजाची प्रजा गुण्यागोविंदाने नांदावी म्हणून त्याची न्यायव्यवस्था चोख असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. राजाने निःपक्षपातीपणे दोन्ही गटांची बाजू ऐकून मगच न्यायनिवाडा करायला हवा आणि गुन्हेगाराला कठोर शिक्षा देऊन राज्यात समता, बंधुता, शांतता प्रस्थापित केली पाहिजे. यासाठी त्याच्या हाती असलेली शक्ती म्हणजे राजदंड! मात्र राजाचे सगळेच निर्णय योग्य असतील असे नाही. आताच्या काळात जसे सर्वोच्च न्यायालय असते तसे त्याकाळात धर्मगुरूंना ते स्थान होते. राजाकडे उचित न्याय न मिळाल्यास प्रजा धर्मगुरुंकडे फिर्याद करू शकत असे. म्हणून राजदंड राजाच्या हाती असला तरी ते सोपवणारे धर्मगुरू राजाहून श्रेष्ठ मानले जात असत. राज्याच्या कारभारात ते ढवळाढवळ करत नसत, परंतु राजाकडून काही चूक घडत असल्याचे कळताच त्या विषयात हस्तक्षेप करून न्यायदान करत असत. 

असाच राजदंड नव्या संसद सदनाला आणि १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशाला पुनश्च मिळाला आहे. त्यामुळे देशात सुबत्ता, शांतता आणि वैभवसंपन्नता प्रस्थापित होईल अशी आशा बाळगूया!

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी