शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 11:21 IST

Spiritual: आजपासून मार्गशीर्ष महिना सुरु झाला, अध्यात्मिक उन्नतीसाठी हा महिना महत्त्वाचा मानला जातो, त्यासाठी कोणते बदल करावे ते जाणून घेऊ. 

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

एका गावात एक व्यक्ती राहत होती. रोज नित्याची कामे करून मठात जात असे. तिथे त्यांना एक दिवस एक तपस्वी भेटला. त्यांना नमस्कार केल्यावर त्यांनी विचारले, काय मागायचे आहे तुला ते माग. आपल्या मनातील त्यांनी ओळखले ह्या आनंदात त्या व्यक्तीने सांगितले, की महाराज संसारात सर्व सुखप्राप्ती आहे पण कितीही काहीही झाले तरी समाधान मिळत नाही त्यासाठी काय करावे? त्यावर त्यांनी सांगितले की कुणाचीही निंदा करायची नाही आणि कुणी करत असेल तर तिथे ऐकायला श्रोते म्हणूनसुद्धा उभे राहायचे नाही. अखंड नामस्मरण करत राहा. निदान तसा प्रयत्न तरी सुरु कर. अजिबात वेळ फुकट घालवू नकोस. त्यांना नमस्कार करून तो माणूस गावातील पाराजवळ गेला. जिथे तो रोजच आपल्या मित्रांना भेटला जात असे. 

२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना

तिथे हेच चालू होते. त्याने आपल्या मित्रांना सांगितले की आताच मी एका योगी पुरुषाला भेटून आलो आहे आणि त्यांनी मला जे सांगितले ते तुम्हाला सांगतो. मला ते पटले आहे तुम्हालाही पटेल. सगळ्यांनी उत्सुकतेने विचारल्यावर त्याने सांगितले की आजपासून मुखाने फक्त नाम घ्यायचे, कुणाहीबद्दल वाईट बोलायचे नाही आणि ऐकायचे सुद्धा नाही. ठरले तर मग! सगळ्यांनी त्याला संमती दिली. पुढील १० मिनिटे नि:शब्द शांतता, कुणीच काही बोलेना. कारण कुणाबद्दल चांगले बोलायची आपल्या जिभेला सवयच नाही मुळी. सतत ह्याचे त्याचे करत बसणारे आपण कुणाबद्दल चांगले बोलायचे तर आपले शब्द भांडार अपुरे पडते.

सांगायचे तात्पर्य, ह्या षड्रिपूंपासून तुम्हा आम्हा कुणाचीही सुटका नाही. पण, आपण त्यातून सुटण्यासाठी प्रयत्न तरी करू शकतो. प्रयत्नांचे सामर्थ्य विचार प्रणाली बदलवण्याचे सामर्थ्य नक्कीच ठेवतात. दिवसभरात आपला किती वेळ फुकट चालला आहे ते शोधून काढले तर समजेल की परमेश्वरापासून आपण किती दूर आहोत आणि त्याचे मूळ कारण सुद्धा हेच आहे. 

देवदिवाळी २०२५: कशी साजरी करतात देवदिवाळी? काय असतो नैवेद्य आणि कोणत्या देवांची होते पूजा? वाचा 

कुणाचे तरी काहीतरी वाईट चिंतणे, मुखाने बोलणे आणि ऐकणेसुद्धा हे आपल्या महाराजांना आवडेल का? हा प्रश्न स्वतःलाच विचारायची गरज आहे.कधीतरी आपल्याला राग येतो. कुणीतरी आपल्याबद्दल बोलले की त्याबद्दलच्या भावना, द्वेष, मत्सर उफाळून येतो हे अगदी मान्य! पण म्हणून आपणही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपली कर्मे वाढवून घ्यायची की त्यातून वेगळा मार्ग शोधायचा हे आपण आपले ठरवायचे आहे. कधीतरी एखादा शब्द बोलणे आणि जिभेला फक्त निंदा करायची सवय असणे ह्यात फरक आहे. त्याच्या आहारी जाऊ नये. आयुष्याच्या अखेरी शनी महाराज आहेतच मग हिशोब करायला!

आज जीवन अत्यंत आव्हानात्मक आहे. सकाळी घराबाहेर पडलेला माणूस घरी येईपर्यंत जीव टांगणीला लागलेला असतो. समाजात असून नसल्यासारखे वागणे हे परमेश्वरी आव्हान आहे आणि ते स्वीकारण्याचे धाडस करायला पाहिजे. पूर्वीच्या काळी स्त्रिया जात्यावर दळताना ओव्या, श्लोक म्हणत असत ते ह्याचसाठी. कुणीही चार डोकी जमली की सुरु! पण त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो, हे विसरून चालणार नाही. घराच्या उंबरठ्याच्या आत आपले जग आहे आणि ते किती अनमोल आहे ते आपल्याला माहिती आहे . तिथे गोमुत्र शिंपडून, पूजा व्रते करून वास्तू शुद्ध होईल पण जोवर मनाचे पावित्र्य साधता येणार नाही तोवर सर्व व्यर्थ आहे. 

Khandoba Navratra 2025: आजपासून ६ दिवस न चुकता म्हणा हे खंडोबाचे प्रासादिक स्तोत्र!

प्रत्येक गोष्टीला मर्यादा असावी तसेच कुणाचा किती राग करावा, द्वेष करावा त्याला सुद्धा असावी. कारण त्याने आपलेच नुकसान होते. कुणाचे मन दुखवू नका त्याने आपलेच भोग वाढणार आहेत तेही न संपणारे. पुढील अनेक जन्मांचे पाप आत्ताच जन्माला घालत आहोत आपण हाही विचार केला पाहिजे.

आपले संत वांग्मय वाचले तर मनुष्याने जीवन कसे जगावे हेच सांगितलेले आहे. पण आपल्याला सोशल मिडीयाशिवाय वेळ कुठे आहे? अर्थात तीही काळाची गरज आहे, पण अंतर्बाह्य शुद्धीकरणासाठी नामसुद्धा तितकेच किंबहुना त्याहीपेक्षा कितीतरी अधिक महत्वाचे आहे.

तुकाराम महाराज आपली शेंडी झाडाला बांधून ठेवत, कारण झोप येऊ नये आणि नामस्मरणाची शृंखला खंडित होऊ नये. इतकी जिद्द ठेवावी लागते तेव्हा कुठे काकणभर सुधारणा होते अन्यथा सर्व फोल आहे. 

चला तर मग आज मार्गशीर्ष शुभारंभ, निदान प्रयत्न तरी करुया. अनेक जण बोलत नाहीत, पण आपला द्वेष, पराकोटीचा मत्सर कृतीतून दाखवतात तेही तितकेच अयोग्य आहे. अनेकदा आपल्याला मिळालेले अपयश आणि त्याच वेळी दुसऱ्याचे सुख, प्रगती बघवत नाही आणि त्यातून इर्षा, मत्सर निर्माण होतो पण त्यामुळे आपली प्रगती होणार आहे का? उलट अनेक आजार मागे लागतात. जीवन अधोगतीला जाते.

मार्गशीर्ष म्हणजे फक्त लक्ष्मीला आवाहन आणि तिचे पूजन नाही तर विष्णूचे पूजसुद्धा झाले पाहिजे. त्यामुळे गुरुवारी पूजेच्या आधी विष्णूसहस्त्रनाम सुद्धा म्हणावे. लक्ष्मी विष्णू पूजन करावे. अवांतर बोलणे टाळावे. थंड पाण्याची बाटली, गहू, तांदूळ, साखर, तूप हा शिधा, रोजची भाजी, धान्य अशा अनेक गोष्टी या महिन्यात गरजूंना दान कराव्यात. देवळात हळद कुंकू दान करावे. अनेक स्त्रिया लावतील आणि आपोआप आपल्याकडून हळदी कुंकू होईल! देवीला कुंकुमार्चन, विष्णूला पवमान, अभिषेक, दत्तबावनी, दुर्गा सप्तशती, हनुमान चालीसा, आपल्या कुलस्वामिनीचा जप आणि कुलाचारांचे पालन करत मार्गशीर्ष साजरा करावा. 

प्रपंच करताना परमार्थ वेगळा करायची गरजच नाही. आपले नित्य कर्म करत असताना घेतलेले नाम हेच मोक्षाकडे नेणारे आहे आणि समाधानाची अमर्यादित दालने सुद्धा उघडणारे आहे, करून बघा आणि प्रचीती जरूर कळवा. नाहीतर आयुष्य संपून जाईल पण समाधान मिळणार नाही.

आपल्यातील हे परिवर्तन नोकरी, अडकलेला पैसा, विवाह, सौख्य, आजारपण ह्या सर्वा सर्वातून सहीसलामत आपल्याला बाहेर काढण्यास समर्थ आहे, हे नक्की! तेव्हा शुभस्य शीघ्रम!  एका संतावाचून विचारांचे परिवर्तन कुणी न करू शके आण , सत्य एक त्यांनाच कळे...!

ओम नमो भागवते वासुदेवाय |ओम श्री महालक्ष्म्यै माताय्ये नमः|

English
हिंदी सारांश
Web Title : At life's end, everyone meets Saturn; make these changes in Margashirsha!

Web Summary : Margashirsha month emphasizes self-improvement, avoiding negativity, and constant remembrance of God for inner peace. It highlights detachment from worldly distractions, charity, and devotion to Vishnu and Lakshmi for a fulfilling life.
टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थspiritualअध्यात्मिकMental Health Tipsमानसिक आरोग्य