शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Solar Eclipse 2022: २०२२ चे पहिले सूर्यग्रहण: भारतात दिसणार का? पाहा, ग्रहणाची वेळ, महत्त्व आणि मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 14:15 IST

Solar Eclipse 2022: खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय? भारतातील ग्रहणाची वेळ जाणून घ्या...

वास्तविक पाहता ग्रहण ही वैज्ञानिक घटना आहे. मात्र, ज्योतिषीय दृष्टिकोनातून ग्रहण विशेष मानले जाते. एखाद्या ग्रहणाचे पडसाद राशींसह जगावर पडत असतात, अशी मान्यता आहे. संपूर्ण एप्रिल महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाचा मानला गेला. सन २०२२ चे पहिले ग्रहण सूर्यग्रहण असणार आहे. हे सूर्यग्रहण खंडग्रास स्वरुपाचे असणार आहे. ग्रहणाची तारीख काय, भारतात ग्रहण दिसणार का, ग्रहणाचे महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया... (Solar Eclipse April 2022)

सन २०२२ मधील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी आहे. रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी ग्रहण सुरू होईल आणि पहाटे ४ वाजून ०७ मिनिटांनी ग्रहण समाप्त होईल. भारतात रात्रीची वेळ असल्यामुळे ग्रहण दिसणार नाही. त्यामुळे यासाठीचा सूतक काळ आणि अन्य बंधने पाळण्याची गरज नाही. नित्यनेमाचे धार्मिक विधी, इतर कार्ये केली जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे. सन २०२२ मधील पहिले सूर्यग्रहण दक्षिण-पश्चिम अमेरिका, प्रशांत महासागर आणि अंटार्टिक क्षेत्रात पाहायला मिळू शकेल. (Solar Eclipse April 2022 Date and Time in India)

यंदाचे पहिले ग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण

जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. थोडक्यात ज्या सूर्यग्रहणात चंद्र हा सूर्याला पूर्णपणे व्यापू शकत नाही त्या सूर्यग्रहणाला खंडग्रास म्हणतात. कंकणाकृती हेदेखील खंडग्रासच आहे. फक्त यात संपूर्ण रिंग दिसते म्हणून हा प्रकार वेगळा गृहीत धरला जातो. खंडग्रास स्थितीत चंद्र संपूर्णपणे सूर्यासमोर आलेला दिसत नाही. त्याचा काहीसा भाग सूर्याला झाकू शकतो. चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधून जाताना त्याची स्थिती काय आहे, यावरून ग्रहण कोणत्या प्रकारचे लागणार आहे, हे सांगितले जाते.

ग्रहणानंतर स्नानाचे महत्त्व

ग्रहणानंतरच्या स्नानाला विशेष महत्त्व असते, असे सांगितले जाते. ग्रहणानंतर शक्य असल्यास गंगा नदीत जाऊन स्नान करावे असे म्हटले जाते. ग्रहणानंतरचे गंगास्नान अतिशय शुभ मानले गेले आहे. वैज्ञानिकदृष्ट्याही याला महत्त्व असल्याचे सांगितले जाते. तसेच या दिवशी लवंग आणि कापराचा उपाय उपयुक्त मानला गेला आहे. लवंग आणि कापराचा वापर करून धूप केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो. घरातील नकारात्मकता दूर होऊ शकते आणि ग्रहणातील प्रतिकूल प्रभावाचा नाश होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.  

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणAstrologyफलज्योतिष