शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

Solar Eclipse 2022: २०२२ चे पहिले सूर्यग्रहण: भारतात दिसणार का? पाहा, ग्रहणाची वेळ, महत्त्व आणि मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 14:15 IST

Solar Eclipse 2022: खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय? भारतातील ग्रहणाची वेळ जाणून घ्या...

वास्तविक पाहता ग्रहण ही वैज्ञानिक घटना आहे. मात्र, ज्योतिषीय दृष्टिकोनातून ग्रहण विशेष मानले जाते. एखाद्या ग्रहणाचे पडसाद राशींसह जगावर पडत असतात, अशी मान्यता आहे. संपूर्ण एप्रिल महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाचा मानला गेला. सन २०२२ चे पहिले ग्रहण सूर्यग्रहण असणार आहे. हे सूर्यग्रहण खंडग्रास स्वरुपाचे असणार आहे. ग्रहणाची तारीख काय, भारतात ग्रहण दिसणार का, ग्रहणाचे महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया... (Solar Eclipse April 2022)

सन २०२२ मधील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी आहे. रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी ग्रहण सुरू होईल आणि पहाटे ४ वाजून ०७ मिनिटांनी ग्रहण समाप्त होईल. भारतात रात्रीची वेळ असल्यामुळे ग्रहण दिसणार नाही. त्यामुळे यासाठीचा सूतक काळ आणि अन्य बंधने पाळण्याची गरज नाही. नित्यनेमाचे धार्मिक विधी, इतर कार्ये केली जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे. सन २०२२ मधील पहिले सूर्यग्रहण दक्षिण-पश्चिम अमेरिका, प्रशांत महासागर आणि अंटार्टिक क्षेत्रात पाहायला मिळू शकेल. (Solar Eclipse April 2022 Date and Time in India)

यंदाचे पहिले ग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण

जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. थोडक्यात ज्या सूर्यग्रहणात चंद्र हा सूर्याला पूर्णपणे व्यापू शकत नाही त्या सूर्यग्रहणाला खंडग्रास म्हणतात. कंकणाकृती हेदेखील खंडग्रासच आहे. फक्त यात संपूर्ण रिंग दिसते म्हणून हा प्रकार वेगळा गृहीत धरला जातो. खंडग्रास स्थितीत चंद्र संपूर्णपणे सूर्यासमोर आलेला दिसत नाही. त्याचा काहीसा भाग सूर्याला झाकू शकतो. चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधून जाताना त्याची स्थिती काय आहे, यावरून ग्रहण कोणत्या प्रकारचे लागणार आहे, हे सांगितले जाते.

ग्रहणानंतर स्नानाचे महत्त्व

ग्रहणानंतरच्या स्नानाला विशेष महत्त्व असते, असे सांगितले जाते. ग्रहणानंतर शक्य असल्यास गंगा नदीत जाऊन स्नान करावे असे म्हटले जाते. ग्रहणानंतरचे गंगास्नान अतिशय शुभ मानले गेले आहे. वैज्ञानिकदृष्ट्याही याला महत्त्व असल्याचे सांगितले जाते. तसेच या दिवशी लवंग आणि कापराचा उपाय उपयुक्त मानला गेला आहे. लवंग आणि कापराचा वापर करून धूप केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो. घरातील नकारात्मकता दूर होऊ शकते आणि ग्रहणातील प्रतिकूल प्रभावाचा नाश होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.  

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणAstrologyफलज्योतिष