शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Solar Eclipse 2022: २०२२ चे पहिले सूर्यग्रहण: भारतात दिसणार का? पाहा, ग्रहणाची वेळ, महत्त्व आणि मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 14:15 IST

Solar Eclipse 2022: खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय? भारतातील ग्रहणाची वेळ जाणून घ्या...

वास्तविक पाहता ग्रहण ही वैज्ञानिक घटना आहे. मात्र, ज्योतिषीय दृष्टिकोनातून ग्रहण विशेष मानले जाते. एखाद्या ग्रहणाचे पडसाद राशींसह जगावर पडत असतात, अशी मान्यता आहे. संपूर्ण एप्रिल महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाचा मानला गेला. सन २०२२ चे पहिले ग्रहण सूर्यग्रहण असणार आहे. हे सूर्यग्रहण खंडग्रास स्वरुपाचे असणार आहे. ग्रहणाची तारीख काय, भारतात ग्रहण दिसणार का, ग्रहणाचे महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया... (Solar Eclipse April 2022)

सन २०२२ मधील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी आहे. रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी ग्रहण सुरू होईल आणि पहाटे ४ वाजून ०७ मिनिटांनी ग्रहण समाप्त होईल. भारतात रात्रीची वेळ असल्यामुळे ग्रहण दिसणार नाही. त्यामुळे यासाठीचा सूतक काळ आणि अन्य बंधने पाळण्याची गरज नाही. नित्यनेमाचे धार्मिक विधी, इतर कार्ये केली जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे. सन २०२२ मधील पहिले सूर्यग्रहण दक्षिण-पश्चिम अमेरिका, प्रशांत महासागर आणि अंटार्टिक क्षेत्रात पाहायला मिळू शकेल. (Solar Eclipse April 2022 Date and Time in India)

यंदाचे पहिले ग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण

जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. थोडक्यात ज्या सूर्यग्रहणात चंद्र हा सूर्याला पूर्णपणे व्यापू शकत नाही त्या सूर्यग्रहणाला खंडग्रास म्हणतात. कंकणाकृती हेदेखील खंडग्रासच आहे. फक्त यात संपूर्ण रिंग दिसते म्हणून हा प्रकार वेगळा गृहीत धरला जातो. खंडग्रास स्थितीत चंद्र संपूर्णपणे सूर्यासमोर आलेला दिसत नाही. त्याचा काहीसा भाग सूर्याला झाकू शकतो. चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधून जाताना त्याची स्थिती काय आहे, यावरून ग्रहण कोणत्या प्रकारचे लागणार आहे, हे सांगितले जाते.

ग्रहणानंतर स्नानाचे महत्त्व

ग्रहणानंतरच्या स्नानाला विशेष महत्त्व असते, असे सांगितले जाते. ग्रहणानंतर शक्य असल्यास गंगा नदीत जाऊन स्नान करावे असे म्हटले जाते. ग्रहणानंतरचे गंगास्नान अतिशय शुभ मानले गेले आहे. वैज्ञानिकदृष्ट्याही याला महत्त्व असल्याचे सांगितले जाते. तसेच या दिवशी लवंग आणि कापराचा उपाय उपयुक्त मानला गेला आहे. लवंग आणि कापराचा वापर करून धूप केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो. घरातील नकारात्मकता दूर होऊ शकते आणि ग्रहणातील प्रतिकूल प्रभावाचा नाश होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.  

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणAstrologyफलज्योतिष