शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 13:13 IST

Solar Eclipse 2025: २१ सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही, पण ग्रहणाचे वेध लागताच ग्रहणाचा प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी दिलेले उपाय करा. 

यंदा भाद्रपद अमावास्येला (Bhadrapad Amavasya 2025) सूर्यग्रहण (Solar Eclipse 2025) असणार आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. मात्र ग्रहणाचा प्रभाव त्याचा कार्यकाळात सर्वत्र समप्रमाणात जाणवतो. म्हणून ग्रहणाशी संबंधित काही पथ्य पाळणे आवश्यक असते. ग्रहणाची छाया आणि वातावरणातील प्रतिकूलता नियंत्रित ठेवण्यासाठी तुळशीचा उपाय अवश्य करा, जसा पितृपक्षाच्या सुरूवातीला चंद्र ग्रहणाच्या वेळी केला होता...!

Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा

२०२५ चे शेवटचे सूर्यग्रहण कधी आहे?

२१ सप्टेंबरच्या रात्री वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होईल. या दिवशी सर्वपित्री अमावस्येला देखील आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, हे ग्रहण रात्री १०:५९ ते पहाटे ३:२३ पर्यंत राहील. ते भारतात दिसणार नाही. मात्र ग्रहण काळ आणि ग्रहण प्रभाव पाळण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्यानुसार ग्रहण कन्या राशीत होईल. ग्रहणाचा काळ १२ तास आधी सुरू होतो. भारतीय वेळेनुसार सकाळी १०:५९ वाजता ग्रहण वेध सुरू होईल. शिवाय, हे आंशिक सूर्यग्रहण असेल, जे सूर्याच्या अगदी थोड्या भागाला व्यापेल. त्याची वेळ आणि श्राद्धविधी नियम जाणून घेऊ. 

सूर्यग्रहण २०२५ वेळ

ग्रहण वेध सकाळी १०:५९ वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईलग्रहण रात्री १:५९ वाजता (भारतीय वेळेनुसार) संपेलग्रहण काळ ३:२३ वाजता (भारतीय वेळेनुसार) संपेल.

Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!

अन्न आणि पाण्यावर तुळशीचे पान 

केवळ ग्रहणातच नाही, तर ग्रहणाच्या बारा तास आधी वातावरण दूषित होऊ लागते, त्यालाच ग्रहण वेध म्हणतात. हा केवळ समज नाही, तर विज्ञानानेदेखील त्याला पुष्टी दिली आहे. त्यालाच शास्त्राने ग्रहणाचा वेध काळ म्हटला आहे. या दूषित वातावरणात अन्न, पाणी निषिद्ध सांगितले जाते. कारण, पृथ्वीला ऊर्जा आणि प्रकाश देणारे चंद्र, सूर्य ग्रहण काळात झाकोळले गेल्यामुळे अन्य सुक्ष्म जीव जीवाणूंचे प्राबल्य वाढते आणि त्यामुळे अन्न, पाणी दूषित होते. म्हणून ग्रहण काळात अन्न, पाणीदेखील वस्त्राने झाकले जाते व त्यात तुळशीचे पान टाकले जाते. तुळशीच्या पानामुळे अन्न, पाणी दूषित होत नाही आणि ग्रहणकाळ सुटल्यावर ते वापरण्यास योग्य ठरते. आपले पूर्वज आठवणीने या गोष्टींचे पालन  करत असत, आपणही चांगल्या आणि आरोग्यदायी गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया. 

Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणTraditional Ritualsपारंपारिक विधीAstrologyफलज्योतिषHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स