शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

श्रावणी सोमवारी गोकुळाष्टमी: जन्माष्टमी दिवशी सोमवारचा उपवास कसा सोडावा? शास्त्र काय सांगते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 09:37 IST

Shri Krishna Janmashtami On Shravan Somvar 2024: जन्माष्टमीचा दुसऱ्या दिवशीपर्यंत केला जातो. श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो. दोन्ही व्रते एकाच दिवशी आल्याने कोणता उपवास कधी सोडावा, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. त्याबाबत शास्त्र काय सांगते, ते जाणून घ्या...

Shri Krishna Janmashtami On Shravan Somvar 2024: संपूर्ण देशभरात अनेक उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात. यापैकी एक म्हणजे जन्माष्टमी. देशभरात श्रीकृष्णाचा जन्मोत्सव, जन्म सोहळा विविध पद्धतीने साजरा केला जातो. श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. यंदा २०२४ मध्ये २६ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार आहे. यंदा जन्माष्टमी श्रावणी सोमवारी आल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. श्रावणी सोमवारी शिवपूजन केले जाणार आहे. जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार, अशा दोन्ही व्रतांचे उपवास केले जातात. या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाबाबत आणि तो सोडण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असल्याचे म्हटले जात आहे. कोणता उपास कधी आणि कशा प्रकारे सोडावा, हे जाणून घेऊया...

गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते. महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही, दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते. यानंतर विविध मंडळाचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात. श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास केला जातो. हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा प्रचलित आहे. याच दिवशी श्रावणी सोमवार आहे. श्रावणी सोमवारीही उपवास केला जातो. अनेक ठिकाणी श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो. परंतु, श्रावणी सोमवारचा उपवास सोडला, तर जन्माष्टमीचा उपवास भंग होईल. त्यामुळे अनेकांना मनात प्रश्न उपस्थित झाला आहे की, जन्माष्टमीचा अहोरात्र केला जाणारा उपवास कायम ठेवायचा असेल, तर मग श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडायचा?

जन्माष्टमीच्या दिवशी श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडावा?

काही शास्त्रांनुसार, श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आले असतील आणि दोन्हींचे उपवास धरले असतील, तर श्रावणी सोमवारी सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन म्हणजे अवघ्राण केल्यामुळे सोमवारचा उपवास सुटेल. परंतु, ही पद्धत योग्य नाही. कारण ही पद्धत अवलंबली, तर जन्माष्टमीचा उपवासही सुटू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत नेमके काय करावे, याची योजना शास्त्रांत केलेली आढळून येते. 

एका उपवासात जर दुसरे पारणे करायचे असेल, तर पाण्याने पारणे करावे, असे सांगितले जाते. कारण एका वेदमंत्रात याबाबतचा संदर्भ येतो. ‘आपो वा अशितं अनशितं च|’, कारण पाणी जे असते, ते उपवासाला चालते आणि पारण्यालाही चालते, असा वेदमंत्र असल्यामुळे ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे, त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा. म्हणजेच तशी भावना मनात करायची असते. पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची की, मी सोमवारचा उपवास सोडतो. म्हणजे सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास अहोरात्र कायम सुरू राहील, असे सांगितले जात आहे.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीShravan Specialश्रावण स्पेशलchaturmasचातुर्मासPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिक