शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

Shravan Vrat 2021 : शिवशंकरांनी अस्त्र म्हणून त्रिशूळ का धारण केले? काय आहे त्याचे महत्त्व? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 08:00 IST

Shravan Vrat 2021 : त्रिशूळ हे अत्यंत प्रभावी, परिणामकारक असे आयुध असल्यामुळे ते मोठ्या आवेशात आणि आवेगात फिरवून प्रतिस्पर्ध्यांच्या अंगात खुपसतात, असा रामायणात उल्लेख आढळतो.

अनेक हिंदू देव देवतांच्या हाती त्रिशूळ हे आयुध असते. परंतु त्रिशूळ हे भगवान महादेवाचे आयुध मानण्यात येते. त्रिशूळ म्हणजे एक लांब दांडा आणि पुढे तीन टोक असतात. तीन टोक म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे सर्जन, पालन व संहार यांचे दैवत आहेत. असुरशक्तीचा विनाश नि:पात करून प्रजाजनांत सुख, शांती आणि वैभव यावे यासाठी त्रिशूळात शक्ती आणि भक्ती साकार झाली आहे. 

त्रिशूळ हे अत्यंत प्रभावी, परिणामकारक असे आयुध असल्यामुळे ते मोठ्या आवेशात आणि आवेगात फिरवून प्रतिस्पर्ध्यांच्या अंगात खुपसतात, असा रामायणात उल्लेख आढळतो.

बौद्ध धर्मातील बोधिवृक्ष आणि त्रिरत्न या प्रतीकांचे त्रिशूळाशी साम्य आहे. सांची, भरहूत आणि अमरावती येथील बौद्ध शिल्पस्तंभावर त्रिशूळ कोरलेले आहे. कार्ले, भाजे, जुन्नर, बेडसे, कुडा येथील लेण्यातही त्रिशूळ हे चिन्ह प्रामुख्याने आढळते. 

सत्पात्र ब्राह्मणाला म्हणजे योग्यता असलेल्या मनुष्याला दान स्वीकारण्यासाठी बोलावणे पाठवून, सस्नेह, आदराने निमंत्रण करून या महानुभव व्यक्तीस दान न करताच अवमानित, विन्मुख पाठवले, तर निमंत्रणकर्त्यास मनुष्यहिंसेइतके पाप लागते आणि या पापाचा धनी म्हणून त्याला पोटशूळाचा विकार जडतो. 

शारीरिक वेदनेने त्याचे जीवन असह्य होते अशी समजूत असल्याने त्याच्या परिमार्जनासाठी, पापक्षालनासाठी त्रिशूळदान करतात. हे दान कृष्णपक्षातील अष्टमी किंवा चतुर्दशी या दिवशी करावे असा संकेत आहे. रुद्रसुक्ताने, शिवपंचाक्षरी मंत्राने किंवा त्रिशूलाय नम: या नाममंत्राने त्रिशूलाची यथाविधी पूजा करतात.

मोहोंजोदडोच्या उत्खननात त्रिशूळ सापडल्याचा उल्लेख आढळतो. त्रिशूळ हा तीन ज्वाळा असलेल्या अग्नीसारका तेजाळता दिसत असल्यामुळे त्याचा ब्रह्ममूलाशी अनुबंध जोडतात. असा हा परमात्म्याशी, ईश्वराशी नाते असलेला, देवगणांच्या हाती आयुध म्हणून अनुग्रह झालेला, सनातन धर्माच्या शक्तीचे प्रतीक असलेला दुष्टांचा कर्दनकाळ, सृजनांचा तारणहार ठरला आहे. म्हणून शिवलिंगाच्या पूजेबरोबरच शिवालयात त्रिशूळाचीही पूजा होते. 

यावरून लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हिंदू देवदेवतांनी आपल्या हाती शस्त्र बाळगून स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या रक्षणाचा आदर्श घालून आहे. आपणही स्वसंरक्षणाची आणि इतरांच्या रक्षणाची जबाबदारी उचलली पाहिजे. दर वेळी शस्त्र बाळगलेच पाहिजे असे नाही, तर हाती असलेल्या वस्तूचा शस्त्रासारखा वापर करण्याची मी मनाची तयारी केली पाहिजे. अन्यथा शस्त्र हाती असूनही ते चालवण्याचे बळ अंगात नसेल तर उपयोग नाही. काळाची गरज पाहता आपण स्वतःला आणि पुढच्या पिढीला कणखर बनवले पाहिजे. त्यासाठी हिंदू देवदेवतांकडून प्रेरणा घ्यायला हवी. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल