शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

Shravan Somwar 2022: नंदी महाराजांच्या कानात सांगितलेला निरोप महादेवांना पोहोचतो, हे खरंय का? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 17:44 IST

Shravan Somwar 2022: शिव मंदिरात गेल्यावर पहिला मान मिळतो नंदीला; पण त्यांच्या कानावर निरोप दिल्याने इच्छापूर्ती होते का? ते पाहू. 

नंदी हे भगवान भोलेनाथांचे वाहन मानले जाते. नंदीला भगवान शिवाचा द्वारपाल देखील म्हटले जाते. असे मानले जाते की महादेवापर्यंत पोहोचण्याआधी नंदीच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते. कारण नंदीला भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. ते नेहमी महादेवाच्या सेवेत तत्पर असतात. ते बसलेल्या अवस्थेतही एक पाय पुढे ठेवून बसतात. याचाच अर्थ भगवान महादेवाचे बोलावणे येताच क्षणाचाही विलंब न होता त्वरित उठून सेवेत रत होता यावे अशीच त्यांची बैठक असते. अशा या नंदी महाराजांनी महादेवाचे वाहन होण्याचा मान कसा मिळवला ते जाणून घेऊ. 

पौराणिक कथा : 

देव आणि दानवांमध्ये जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा सर्वांनी रत्न, माणिक, मोती, अस्त्र मिळवण्यासाठी पुढाकार घेतला परंतु जेव्हा त्यातून हलाहल बाहेर आले, ते विष भगवान शंकरांनी प्राशन केले. त्यावेळेस विषाचे काही थेंब जमिनीवर सांडले. त्यावेळेस नंदीने आपल्या स्वामींप्रमाणे मागचा पुढचा विचार न करता विश्वकल्याणासाठी ते विषाचे थेंब चाटून पोटात घेतले. तो दाह सहन केला. हे भगवान महादेवाला कळले तेव्हा त्यांनी नंदीच्या पाठीवरून हात फिरवत तो दाह शांत केला आणि त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला प्रिय भक्त अशी उपाधी दिली.

नंदीची वाहन म्हणून निवड :

नंदीचा स्वभाव भोळा. सांगितलेले प्रत्येक काम निमूटपणे करणारा. शिवाय त्याच्याकडे असलेली अपार शक्ती याचा सदुपयोग करण्यासाठी महादेवांनी त्याची वाहन म्हणून निवड केली व सदा सर्वदा आपल्या सन्निध ठेवले. शिव शंकरांची अपार शक्ती वाहून नेण्याचे सामर्थ्य त्याच्यात असल्यामुळे भगवान शंकर जिथे जातात तिथे नंदीला सोबत नेतात. म्हणून प्रत्येक शिवालयाच्या गाभाऱ्यात शिवलिंग व बाहेर नंदी महाराजांची मूर्ती दिसते. 

नंदीच्या कानात सांगितल्याने इच्छापूर्ती होते? 

अनेक भाविक आपल्या इच्छापूर्तीसाठी नंदी महाराजांच्या कानात आपली इच्छा प्रगट करतात व ती महादेवाकडून पूर्ण करून घ्यावी अशी प्रार्थना करतात. हा केवळ भक्तांचा भोळा भाव आहे. मानवाला वाटते, जसे मोठ्या माणसाकडून काम करवून घ्यायचे असेल तर त्याच्या जवळच्या सहकाऱ्याची मर्जी संपादन करावी लागते, त्याप्रमाणे देवाच्या दरबारातही नंदी महाराजांकडे वर्णी लावली तर आपली इच्छा पूर्ण होईल. परंतु याला कोणताही शास्त्राधार नाही. देव केवळ भावाचा भुकेला आहे. ज्याचा भाव सच्चा आहे, त्यालाच देव प्रसन्न होतो. असा भोलेनाथ जसा नंदी महाराजांना पावला, तसा आपल्यावरही करुणा करो, अशी प्रार्थना करूया. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल