शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

Shravan Somvar 2021 vrat : विशेषतः श्रावणी सोमवारीच उपास का करतात? वाचा त्यामागील रोचक कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 16:47 IST

Shravan Somvar 2021 vrat : सोमवारचा उपास दुपारी सोडता येत नाही. तो सूर्यास्तानंतरच सोडावा लागतो. शिवभक्तांकडे हा कुळाचार आहे.

श्रावणी सोमवारची बालपणापासून मनात जपलेली आठवण म्हणजे, त्या दिवशी शाळेला मिळणारी अर्धी सुटी, दिवसभर फलाहार खाऊन केलेला उपास आणि सायंकाळी सातच्या आत केळीच्या पानावर घेतलेला सुग्रास भोजनाचा आस्वाद! आजही या आठवणी मनात रुंजी घालतात. परंतु, तेव्हा कधी पडला नाही, तो प्रश्न आता पडतो, तो म्हणजे श्रावणाच्या सोमवारीच उपासाला विशेष महत्त्व का? हे आहे त्याचे कारण...

आपल्याकडे सातही वार हे कुणा ना कुणा देवाचे म्हणून मानण्यात आले आहेत. रविवार-सूर्याचा, खंडोबाचा, सोमवार- शंकराचा, मंगळवार-गणपती आणि देवीचा, बुधवार-पांडुरंगाचा, गुरुवार-दत्तात्रेयांचा, शुक्रवार-बालाजी आणि लक्ष्मीचा, शनिवार-शनि आणि मारुतीचा हे वार आणि त्यांची दैवते आहेत. 

यातील विशेषत: सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी त्या त्या देवतांचे उपासक हा उपास करतात. तो एकादशीप्रमाणे दोन वेळचा नसतो. तर दुपारी जेवून रात्री उपास केला जातो. याला दुपारीच उपास सोडणे असे म्हणतात. परंतु असे करण्याला सोमवार अपवाद आहे. सोमवारचा उपास दुपारी सोडता येत नाही. तो सूर्यास्तानंतरच सोडावा लागतो. शिवभक्तांकडे हा कुळाचार आहे. सोमवारी सायंकाळी ते शंकराला दही भाताचा नैवेद्य अर्पण करतात आणि मगच उपास सोडतात.

अलीकडे असा सोमवारचा उपास करणारी मंडळी कमी झालेली असली, तरी श्रावणी सोमवारचा उपास करणारी मंडळी अनेक आहेत. तोही कुळाचार असतो. हा उपास स्त्री-पुरुष दोघेही करतात व दिवसभर उपास करून सूर्यास्तानंतर उपास सोडतात.

या श्रावणी सोमवारची एक कथा आहे-

एका गावात एक शिवालय होते. त्याचा गाभारा दुधाने भरून शंकराची पूजा करावी असे तेथील राजाच्या मनात आले. गावातील सर्व लोकांनी घरी एक थेंबभरही दूध न वापरता ते गाभाऱ्यात आणून ओतावे आणि याप्रमाणे जो वागणार नाही त्याला कठोर शासन करण्यात येईल अशी त्याने दवंडी पिटवली.सर्व गावकरी घाबरले. त्यांनी आपल्या लेकरा बाळांना दुधाचा थेंब न देता शंकराच्या गाभाऱ्यात आणून दूध ओतले. तरीही गाभारा दूधाने भरला नाही. राजा चिंतेत पडला. 

सायंकाळी एक बाई भक्तीभावाने एका छोट्या वाटीत दूध व तबकात बेल व धोतऱ्याची फुले, कापूर, उदबतती, गंध, भस्त असे साहित्य घेऊन तिथे आली. तिने मनोभावे प्रथम पूजा केली आणि वाटीतील दूध गाभाऱ्यात ओतले. तोच हळूहळू गाभारा दूधाने भरू लागला आणि थोड्या वेळातच तो पूर्णपणे दुधाने भरून वाहू लागला.

राजाला हकीकत कळली. तो धावत तिथे आला. त्याने त्या बाईला विचारलं, तेव्हा ती म्हणाली, 'राजन, माझ्या घरी नातवंडे लहान आहेत, घरात आणखी म्हातारी माणसे आहेत. त्यांनाही दूध लागते. लहान मुले आणि म्हातारी माणसे यांना उपाशी ठेवून गाभाऱ्यात दूध ओतणे मला पटले नाही. देवाने तसे कुठेही सांगितले नाही. मी छोट्या वाटीतून दूध आणून देवाला भक्तीभावाने वाहिले. देव भावाचा भुकेला असतो. त्याच्यापर्यंत माझी सेवा नक्कीच पोहोचली असेल. तुझ्या दवंडीप्रमाणे मी वागले नाही, तुला जी शिक्षा करायची ती कर! मी आनंदाने भोगीन. '

हे ऐकून राजा मनोमन खजील झाला. त्याने तिला वंदन केले. मग ती बाई घरी आली. तिच्या घरातील सर्व कुटुंबीयांना शिवकृपेने दीर्घायुष्य लाभले. तो प्रसंग घडला, तो दिवश श्रावणी सोमवारचा होता. तिने त्या दिवसापासून श्रावणी सोमवारच्या उपासाचे व्रत घेतले व तेच व्रत सर्व शिवभक्तांमध्ये रूढ झाले. पुढेपुढे हा कुळाचार बनला.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल