शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

Shravan 2023: श्रावणात उपास करताना टाळा 'या' चुका; तरच मिळेल उपास केल्याचे पुण्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 11:15 IST

Shravan 2023: श्रावणात अनेक जण महिनाभर एकवेळ उपास करतात तर काही जण सण वारानिमित्त उपास करतात, पण उपास करताना दिलेले नियम पाळतात का? ते बघणं महत्त्वाचं!

>> पं. हृषीकेश श्रीकांत वैद्य, धर्मसभा, राष्ट्रीय सचिव 

आज नवरात्री, एकादशी/ शिवरात्री/सोमवार/ चतुर्थी /शनिवार आहे , आज माझा उपास आहे ! असं आस्तिक लोक सर्रास म्हणतात. उपास हा शब्द शास्त्रात / वेदांत कुठे ही नाही. मग उपास म्हणजे नक्की काय? उपासाचा अर्थ काही खाऊ पिऊ नये हा आहे का? की कंद, फळं, दूध इ उपासाचे पदार्थ खावे - त्याला उपास म्हणतात; असा आहे ? असे प्रश्न अनेकांना पडतात. 

आस्तिक जनहो, खरंतर उपसाचं खाण्या-पिण्याच्या पदार्थांशी तसं फार काही विशेष देणं घेणं नाही. उपासाचे खरे देणे घेणे आहे ते देवाशी - परब्रह्माशी ! ते कसे काय? चला जाणून घेऊया 

उपास हा "उपवास" शब्दाचा अपभ्रंश आहे. उपवास (उप=जवळ, वास= सहवास) म्हणजे आपले शरीर, वाचा,  मन, बुद्धी व चित्त देवा समीप ठेवणे. उपवासाचा दिवस म्हणजे तहान भूक विसरून तन्मय होऊन देवाची भक्ती करत त्याच्याशी एकरूप होण्याचा दिवस. ज्याच्या सहवासाने आपण पापांपासून उपावृत्त(निवृत्त) होतो तो उपवास. 

उपवासाच्या दिवशी या नश्वर देहाला सांभाळण्यासाठी धान्य आदि निवडणे-टिपणे, चूल पेटवणे, रांधणे (जेवण बनवणे), भांडी घासणे, भांडी जागी लावणे, लादी पुसणे, स्वयंपाकघर स्वच्छ करणे, केस- नखं कापणे, मेकअप करणे, चुगल्या करणे, इ. गोष्टींमध्ये वेळ ने घालवता विशिष्ट तिथी किंवा वारी फक्त कंद-मूळ, फळं - दूध इ सात्विक आहार घेऊन किंवा काहीही न खाता पिता तो सगळा वेळ देवाच्या आराधनेसाठी (नामस्मरण, भजन, पूजन, ध्यान, इ.) व्यतीत करावा. देहाचे शोषण करावे - हाच खरा उपवास!  मस्त तुपातले-दाणे-आलं-मिरची घालून चमचमीत पदार्थ बनवण्यात दिवस घालवणे हा काही उपवास नाही बरं !

किमान उपवासाच्या दिवशी विविध  इंद्रियांच्या विविध खाद्यावर नियंत्रण ठेवायला हवे. कानांनी काय ऐकावे-काय ऐकू नये मुखाने काय बोलावे -काय बोलू नयेडोळ्यांनी काय बघावे - काय बघू नयेनाकाने काय घ्राणावे - काय घ्राणू नये जिव्हेने कसला स्वाद घ्यावा- कसला घेऊ नये. 

सगळ्या इंद्रियांना देवाकडे केंद्रित करावे हाच खरा उपवास ! बृहदारण्यक उपनिषद, गौतम धर्मसूत्र, काठक गृह्यसूत्र व महाभारत या इतिहास ग्रंथात उपवास कसा व का करावा याची सविस्तर माहिती आहे. 

अनेकांना वाटतं की काही न खातापिता आपण आनंदाने देवाचे स्मरण कसे करू शकतो ? अहो, जर परमेश्वरा प्रति  भक्ती/प्रेम असेल, त्याला भेटण्याची ओढ असेल तर त्यापूढे तहान भूक नक्कीच विसरू शकतो. उदाहरण घ्या जेव्हा आपल्याला एखाद्या घटनेपासून अत्यानंद प्राप्त होतो तेव्हा आपण तहान - भूक विसरून जातो ; दिवसभर न खाता पिता धावपळ करत राहू शकतो. तेव्हा अशक्तपणा ही येत नाही. तर जो आनंदकंद आहे तोच मिळणार आहे अशी दृढ श्रद्धा असेल तर तहान-भूक नाही का हरपणार ? 

वैज्ञानिक दृष्ट्याही महिन्यातून काही दिवस लंघन करणे हे शरीरासाठी उपयुक्त मानले गेले आहे. तर, उपास / उपवास म्हणजे नक्की काय याचा जुजबी अंदाज आता तुम्हाला नक्कीच आला असेल. 

संपर्क : 9323395598

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स