शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Shravan 2023: श्रावणात उपास करताना टाळा 'या' चुका; तरच मिळेल उपास केल्याचे पुण्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 11:15 IST

Shravan 2023: श्रावणात अनेक जण महिनाभर एकवेळ उपास करतात तर काही जण सण वारानिमित्त उपास करतात, पण उपास करताना दिलेले नियम पाळतात का? ते बघणं महत्त्वाचं!

>> पं. हृषीकेश श्रीकांत वैद्य, धर्मसभा, राष्ट्रीय सचिव 

आज नवरात्री, एकादशी/ शिवरात्री/सोमवार/ चतुर्थी /शनिवार आहे , आज माझा उपास आहे ! असं आस्तिक लोक सर्रास म्हणतात. उपास हा शब्द शास्त्रात / वेदांत कुठे ही नाही. मग उपास म्हणजे नक्की काय? उपासाचा अर्थ काही खाऊ पिऊ नये हा आहे का? की कंद, फळं, दूध इ उपासाचे पदार्थ खावे - त्याला उपास म्हणतात; असा आहे ? असे प्रश्न अनेकांना पडतात. 

आस्तिक जनहो, खरंतर उपसाचं खाण्या-पिण्याच्या पदार्थांशी तसं फार काही विशेष देणं घेणं नाही. उपासाचे खरे देणे घेणे आहे ते देवाशी - परब्रह्माशी ! ते कसे काय? चला जाणून घेऊया 

उपास हा "उपवास" शब्दाचा अपभ्रंश आहे. उपवास (उप=जवळ, वास= सहवास) म्हणजे आपले शरीर, वाचा,  मन, बुद्धी व चित्त देवा समीप ठेवणे. उपवासाचा दिवस म्हणजे तहान भूक विसरून तन्मय होऊन देवाची भक्ती करत त्याच्याशी एकरूप होण्याचा दिवस. ज्याच्या सहवासाने आपण पापांपासून उपावृत्त(निवृत्त) होतो तो उपवास. 

उपवासाच्या दिवशी या नश्वर देहाला सांभाळण्यासाठी धान्य आदि निवडणे-टिपणे, चूल पेटवणे, रांधणे (जेवण बनवणे), भांडी घासणे, भांडी जागी लावणे, लादी पुसणे, स्वयंपाकघर स्वच्छ करणे, केस- नखं कापणे, मेकअप करणे, चुगल्या करणे, इ. गोष्टींमध्ये वेळ ने घालवता विशिष्ट तिथी किंवा वारी फक्त कंद-मूळ, फळं - दूध इ सात्विक आहार घेऊन किंवा काहीही न खाता पिता तो सगळा वेळ देवाच्या आराधनेसाठी (नामस्मरण, भजन, पूजन, ध्यान, इ.) व्यतीत करावा. देहाचे शोषण करावे - हाच खरा उपवास!  मस्त तुपातले-दाणे-आलं-मिरची घालून चमचमीत पदार्थ बनवण्यात दिवस घालवणे हा काही उपवास नाही बरं !

किमान उपवासाच्या दिवशी विविध  इंद्रियांच्या विविध खाद्यावर नियंत्रण ठेवायला हवे. कानांनी काय ऐकावे-काय ऐकू नये मुखाने काय बोलावे -काय बोलू नयेडोळ्यांनी काय बघावे - काय बघू नयेनाकाने काय घ्राणावे - काय घ्राणू नये जिव्हेने कसला स्वाद घ्यावा- कसला घेऊ नये. 

सगळ्या इंद्रियांना देवाकडे केंद्रित करावे हाच खरा उपवास ! बृहदारण्यक उपनिषद, गौतम धर्मसूत्र, काठक गृह्यसूत्र व महाभारत या इतिहास ग्रंथात उपवास कसा व का करावा याची सविस्तर माहिती आहे. 

अनेकांना वाटतं की काही न खातापिता आपण आनंदाने देवाचे स्मरण कसे करू शकतो ? अहो, जर परमेश्वरा प्रति  भक्ती/प्रेम असेल, त्याला भेटण्याची ओढ असेल तर त्यापूढे तहान भूक नक्कीच विसरू शकतो. उदाहरण घ्या जेव्हा आपल्याला एखाद्या घटनेपासून अत्यानंद प्राप्त होतो तेव्हा आपण तहान - भूक विसरून जातो ; दिवसभर न खाता पिता धावपळ करत राहू शकतो. तेव्हा अशक्तपणा ही येत नाही. तर जो आनंदकंद आहे तोच मिळणार आहे अशी दृढ श्रद्धा असेल तर तहान-भूक नाही का हरपणार ? 

वैज्ञानिक दृष्ट्याही महिन्यातून काही दिवस लंघन करणे हे शरीरासाठी उपयुक्त मानले गेले आहे. तर, उपास / उपवास म्हणजे नक्की काय याचा जुजबी अंदाज आता तुम्हाला नक्कीच आला असेल. 

संपर्क : 9323395598

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स