शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Shani Dev: शनी देव राशीला येण्याने सगळेच जण भयभीत का होतात? ब्रह्मवैवर्तपुराणात सापडते कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 07:00 IST

Shani Dev: शनी देवाचे नाव काढले तरी त्यांच्याबद्दल मनात नकारात्मक छटा येते; त्यांच्याबद्दल जनमानसात एवढी भीती निर्माण होण्यामागचे कारण जाणून घ्या!

शनिदेवाचे नाव येताच काही लोक घाबरतात. लोकांना वाटते की शनिदेव नेहमी क्रोधित असतात आणि अशुभ परिणाम देतात. मात्र, तसे नाही. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते. शनि हा सेवा आणि कृतीचा कारक आहे. असे म्हटले जाते की शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. तुमचे कर्म चांगले नसेल तर आपली वक्र दृष्टी टाकून शिक्षा देतात. ती शिक्षा मात्र अतिशय कठोर असते. परंतु शनी देवांचा स्वभाव  वज्राहून कठोर का बनला, जाणून घेऊया त्यामागील पौराणिक कथा!

पिता पुत्राचे वैर :

शनी देव हे सूर्य पुत्र आहेत. असे असूनही शनिदेवाचा काळसर रंग पाहून सूर्यदेवाने पत्नी छायावर संशय घेतला आणि तिचा अपमान केला आणि सांगितले की हा माझा मुलगा होऊ शकत नाही. मातेच्या तपाचे सामर्थ्य शनिदेवातही आले होते आणि त्यांनी रागाने वडील सूर्यदेवांकडे पाहिले तेव्हा सूर्यदेव पूर्णपणे काळे झाले, त्यांच्या घोड्यांची हालचाल थांबली. त्रस्त झाल्याने सूर्यदेवांना भगवान शंकराचा आश्रय घ्यावा लागला. यानंतर भगवान शिवाने सूर्यदेवाला आपली चूक कळवून दिली. सूर्यदेवाने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली. त्यानंतर त्याला पुन्हा त्याचे खरे रूप मिळाले. पण पिता पुत्राचे बिघडलेले नाते सुधारले नाही. या प्रसंगाने शनी देवांची जन्मतः दृष्टी पालटली आणि प्रत्येक अपराध्याला कठोर शिक्षा देण्याचे व्रत त्यांनी अंगिकारले. 

तसेच आणखी एक कारण : 

ब्रह्म वैवर्त पुराणानुसार शनिदेव हे श्रीकृष्णाचे परम भक्त होते. शनिदेव तरुण झाल्यावर त्यांचा विवाह चित्ररथाच्या कन्येशी झाला. शनिदेव भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये इतके लीन झाले होते की ते आपल्या पत्नीकडे लक्षही देऊ शकत नव्हते. हे पाहून त्याची पत्नी संतप्त झाली आणि तिने शनिदेवाला शाप दिला की ते ज्यांच्या सहवासात अधिक काळ राहतील त्याचा नाश होईल. शनिदेवाने त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. राग शांत झाल्यावर पत्नीलाही आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि ती आपला शाप परत घेऊ शकली नाही. या कारणास्तव असे मानले जाते की शनी देव ज्यांच्या राशीला जातात त्यांना फार जपून राहावे लागते आणि शनी देवांचा कार्यकाळ संपेपर्यंत त्यांच्या परीक्षेला सामोरे जावे लागते!