शहरं
Join us  
Trending Stories
1
६७ बिनविरोध नगरसेवक निवडणूक आयोगाच्या रडारवर; दबाव टाकला की आमिष दाखवलं? होणार चौकशी
2
सुकमामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत १२ नक्षलवादी ठार
3
आघाड्यांचा 'फज्जा', बंडखोरीचा 'धडाका'! उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट; 'युती' कागदावर, 'मैदानात' मात्र सर्वच स्वतंत्र!
4
तारिक रहमान होणार 'किंग', पण प्रचाराचं काय? बांगलादेशात निवडणूक आयोगाच्या 'या' एका नियमाने वाढवलं टेन्शन!
5
Border 2: मेरा दिमाग हिला हुआ है! 'घर कब आओगे' गाण्याच्या लाँचवेळी सनी देओल असं का म्हणाला?
6
पाकिस्तानची नापाक खेळी; राजस्थानमध्ये ड्रोनने पाठवली 'पांढरी पावडर', पोलिसांनी असा लावला छडा
7
इराणमध्ये खामेनींविरोधात निदर्शने तीव्र, ट्रम्प यांच्या पाठिंब्यामुळे 'Gen-Z' चा उत्साह वाढला
8
एकच प्रीमिअम, पती-पत्नीला मिळणार विमा सुरक्षा प्लॅन; जाणून घ्या कसं?
9
महाराष्ट्राचा शाहरुख खान! पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या उमेश कामतचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन, दाखवले सिक्स पॅक ॲब्स
10
कंडोमच्या किमती वाढल्याने लोकसंख्या वाढेल? सलग तिसऱ्या वर्षी चीनला भीती, भारतासाठी ही एक संधी
11
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामाचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
12
‘नवसाचं पोर गेलं, भरपाई दिल्याने परत येणार का?’ दूषित पाण्यामुळे मृत्यू; दोन अधिकाऱ्यांना हटवले
13
इराण पेटला...! सर्वोच्च नेते खामेनेईंविरुद्ध तरुणाईचे रस्त्यावर उतरून आंदोलन; देशाच्या अर्थव्यवस्थेला घरघर, निदर्शनात सात जणांचा मृत्यू
14
कॅनडा सोडायची वेळ आली? १० लाख भारतीयांचे 'लीगल स्टेटस' धोक्यात; जंगलात टेंट लावून राहण्याची आली वेळ!
15
कोण होते सिद्धार्थ भैय्या? हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; १३ वर्षांत ३७००% रिटर्न, मल्टिबॅगर स्टॉक निवडण्याची कला होती अवगत
16
शेणाने रंगवल्या आहेत नितीन गडकरींच्या घराच्या भिंती, फराह खानने दाखवली झलक, पाहा व्हिडीओ
17
शाहरुख खान अन् भन्साळीही वापरणार 'धुरंधर' फॉर्म्युला? 'किंग' अन् 'लव्ह अँड वॉर' दोन भागांमध्ये येणार
18
Shakambhari Purnima 2026: शाकंभरी पौर्णिमेचा 'महायोग'! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुखाचा पूर
19
बायकोने केलं लाखोंचं कर्ज, हप्ते भरून पती झाला कंगाल; अखेर कानपूरच्या व्यापाऱ्याने संपवलं जीवन!
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, घरबसल्या होईल दरमहा २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

Shani Dev: शनी देव राशीला येण्याने सगळेच जण भयभीत का होतात? ब्रह्मवैवर्तपुराणात सापडते कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 07:00 IST

Shani Dev: शनी देवाचे नाव काढले तरी त्यांच्याबद्दल मनात नकारात्मक छटा येते; त्यांच्याबद्दल जनमानसात एवढी भीती निर्माण होण्यामागचे कारण जाणून घ्या!

शनिदेवाचे नाव येताच काही लोक घाबरतात. लोकांना वाटते की शनिदेव नेहमी क्रोधित असतात आणि अशुभ परिणाम देतात. मात्र, तसे नाही. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते. शनि हा सेवा आणि कृतीचा कारक आहे. असे म्हटले जाते की शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. तुमचे कर्म चांगले नसेल तर आपली वक्र दृष्टी टाकून शिक्षा देतात. ती शिक्षा मात्र अतिशय कठोर असते. परंतु शनी देवांचा स्वभाव  वज्राहून कठोर का बनला, जाणून घेऊया त्यामागील पौराणिक कथा!

पिता पुत्राचे वैर :

शनी देव हे सूर्य पुत्र आहेत. असे असूनही शनिदेवाचा काळसर रंग पाहून सूर्यदेवाने पत्नी छायावर संशय घेतला आणि तिचा अपमान केला आणि सांगितले की हा माझा मुलगा होऊ शकत नाही. मातेच्या तपाचे सामर्थ्य शनिदेवातही आले होते आणि त्यांनी रागाने वडील सूर्यदेवांकडे पाहिले तेव्हा सूर्यदेव पूर्णपणे काळे झाले, त्यांच्या घोड्यांची हालचाल थांबली. त्रस्त झाल्याने सूर्यदेवांना भगवान शंकराचा आश्रय घ्यावा लागला. यानंतर भगवान शिवाने सूर्यदेवाला आपली चूक कळवून दिली. सूर्यदेवाने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली. त्यानंतर त्याला पुन्हा त्याचे खरे रूप मिळाले. पण पिता पुत्राचे बिघडलेले नाते सुधारले नाही. या प्रसंगाने शनी देवांची जन्मतः दृष्टी पालटली आणि प्रत्येक अपराध्याला कठोर शिक्षा देण्याचे व्रत त्यांनी अंगिकारले. 

तसेच आणखी एक कारण : 

ब्रह्म वैवर्त पुराणानुसार शनिदेव हे श्रीकृष्णाचे परम भक्त होते. शनिदेव तरुण झाल्यावर त्यांचा विवाह चित्ररथाच्या कन्येशी झाला. शनिदेव भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये इतके लीन झाले होते की ते आपल्या पत्नीकडे लक्षही देऊ शकत नव्हते. हे पाहून त्याची पत्नी संतप्त झाली आणि तिने शनिदेवाला शाप दिला की ते ज्यांच्या सहवासात अधिक काळ राहतील त्याचा नाश होईल. शनिदेवाने त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. राग शांत झाल्यावर पत्नीलाही आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि ती आपला शाप परत घेऊ शकली नाही. या कारणास्तव असे मानले जाते की शनी देव ज्यांच्या राशीला जातात त्यांना फार जपून राहावे लागते आणि शनी देवांचा कार्यकाळ संपेपर्यंत त्यांच्या परीक्षेला सामोरे जावे लागते!