शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Shakambhari Navratri: शाकंभरी नवरात्रीनिमित्त जाणून घ्या ललितात्रिपुरसुंदरीचे मंदिर आणि त्यामागील अद्भुत कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 10:32 IST

Shakambhari Navratri: मुंबई-मंगळुरू महामार्गावरून कधी गेलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या, सविस्तर जाणून घ्या.

>> सुजीत भोगले 

आदि शंकराचार्य लहान असतानाची गोष्ट. कालडी गावात एक श्री ललितात्रिपुरसुंदरीचे मंदिर होते. आचार्यांचे वडील शिवगुरू त्या मंदिराचे पुजारी होते. आचार्य रोज वडिलांबरोबर मंदिरात जात. देवीची पूजा करत. वडील देवीला प्रसाद अर्पण करत आणि नंतर ते दूध आचार्यांना देत असत आणि ते आचार्यांना सांगायचे देवीने निम्मे दुध प्यायले आहे आणि निम्मे मी तुला देतोय. 

एके दिवशी वडील बाहेरगावी जातात. आचार्य घरच्या नोकराबरोबर मंदिरात जातात. देवीची पूजा करतात. दुग्ध प्रसाद अर्पण करतात. देवी प्रकट होतच नाही, ना दुध पिते. आचार्य तिची विनवणी करतात परंतु तरीही देवी प्रकट होत नाही. मग आचार्य देवीसमोर हट्ट करतात. देवी द्रवते आणि प्रकट होते. आचार्य तिला प्रसाद ग्रहण करण्याची विनवणी करतात. आचार्यांचे लोभस रुपडे आणि गोड आळवणी यामुळे देवी प्रसन्न होते आणि दुध पिऊन टाकते. देवीने सर्व दुध प्यायलेले पाहून आचार्य रडू लागतात आणि देवीने समजूत घालण्याचा प्रयत्न केला तरी थांबत नाहीत. मग जगन्माता श्री ललिता त्रिपुरसुंदरी त्या बालकाला मांडीवर घेते आणि त्याला स्तनपान देते. 

असे म्हणतात देवीचे स्तन्य प्राशन केल्यावर आचार्यांचे देहभान हरपते आणि भानावर येतात तर देवी गुप्त झालेली असते आणि आचार्यांना देवीने दुग्धासह वेदांचे संपूर्ण ज्ञान प्रदान केलेले असते.  पुढे आचार्य मोठे होतात. गुरुकडून वेदविद्या लौकिकार्थाने ग्रहण करतात. संन्यास घेतात. श्री ललिता त्रिपुरसुंदरीचे मुल स्थानं कुटजशैल पर्वत आहे. आचार्यांची इच्छा असते की देवीच्या मुलस्थानी तिची उपासना करून तिला जागृत करायचे आणि तिला आपल्या जन्मगावी घेऊन जायचे आणि तिचा चेतनाअंश तिथे स्थापन करायचा. 

आचार्य कुटजशैल पर्वतावर जातात. तिथे आचार्य आले आहेत हे पाहून स्थानिक वनवासी आनंदित होतात. त्यांचा राजा आचार्यांच्या सन्मानार्थ तिथे एक ध्वजस्तंभ स्थापन करतो. हा ध्वजस्तंभ wrought iron अर्थात ओतीव लोखंडाचा आहे, त्या ध्वजस्तंभावर भगवा डौलाने फडकू लागतो. आचार्य देवीच्या मुलस्थानी असलेल्या गुहेत जातात. देवीची आराधना करतात. तिला प्रसन्न करून घेतात आणि आपला मनोदय सांगतात. देवी आचार्यांना सांगते मी तुझ्यासह येण्यास तयार आहे. पण माझी एक अट आहे. तू समोर चालायचे, मागे वळून पाहायचे नाही. माझ्या पैंजणांचा आवाज येत असेल. आचार्य मान्य करतात. 

कुटजशैल पर्वतावरून आचार्य आणि देवी यांचा प्रवास सुरु होतो. ( या पोस्टसह असलेले चित्र आचार्य आणि श्री ललिता त्रिपुरसुंदरीचे आहे ) एका विशिष्ट स्थानी आल्यावर पैंजणांचा आवाज थांबतो. आचार्य अनवधानाने मागे वळून बघतात. देवी सुंदर हास्य करते आणि वरदायिनी रुपात आचार्यांना दर्शन देते आणि सांगते. हे कोल्लूर स्थान आहे. इथे मी कोलासुर या राक्षसाचा वध केला होता. या स्थानी माझे मंदिर स्थापन कर. मी पुढे येणार नाही. 

देवी प्रकट होते त्या स्थानी एक स्वयंभू शिवलिंग दिसते. ज्याच्या एका बाजूला ब्रह्मा विष्णू आणि महेश ऐक्यरुपात स्थित आहेत आणि वामांगी महासरस्वती , महालक्ष्मी आणि महाकाली स्थित आहे. यांना विलग करणारी रेखा म्हणजे किराट-अर्जुन युद्ध प्रसंगी अर्जुनाच्या आघाताने शिवाच्या भाळी झालेला आघात आहे. या शिवलिंगासमोर आचार्य श्रीयंत्रारूढ अशी शिवशक्तीऐक्य स्वरूपिणी मूर्ती घडवून तिची स्थापना करतात. ते पूर्ण शक्तीपीठ म्हणजे श्री कोल्लूर मुकाम्बिका. देवीच्या ध्यान श्लोकातील उल्लेख : त्रिमुर्त्यैक्य स्वरूपिणी त्रिगुणात्मिका श्री मुकाम्बिका देवता असा आहे.

आचार्यांनी कुटज शैल पर्वतावर ज्या खडकावर बसून समुद्राकडे तोंड करून उपासना केली तिथे शंकराचार्य छत्री आहे. तिथून आपल्याला अरबी समुद्र दिसतो. कुटज शैल पर्वतावर आजही आपल्याला तो wrought iron चा ध्वजस्तंभ दिसतो. जसाच्या तसा आहे. पश्चिम घाटात, समुद्रापासून जवळ असूनही २४०० वर्षे झाली त्या स्तंभाला आजवर साधा गंज सुद्धा लागलेला नाही. या स्तंभाचे कार्बन डेटिंग आय आय टी बंगलोर वाल्यांनी केले. कालखंड कमीत कमी २४०० वर्ष पूर्वीचा आला. आचार्यांच्या जन्मतारखेला निश्चित करण्यासाठी हा एक मोठा वैज्ञानिक पुरावा आहे. कारण बहुसंख्य परंपरावादी मंडळी आचार्य इसवीसन ७९२ साली जन्मले असे म्हणतात.  

कसे जावे? 

  • कुटज शैल पर्वताचे स्थानिक नाव कोडचाद्री. 
  • कोल्लुर हे गाव मुंबई-मंगळुरू महामार्गावर बेंदूर फाट्यावरून तीस किलोमीटर आत आहे. 
  • कोल्लुर गाव हे श्री मुकांबिका butterfly sanctury च्या मध्यभागी आहे. 
  • इथून 60 किलोमीटर वर श्रुंगेरी आहे.
  • कोल्लुर वरून महिंद्राच्या उघड्या जीप आहेत. 
  • जायला चार तास , यायला चार तास .
  • पावसाळ्याचे चार महिने ही सेवा बंद असते.

महत्वाची गोष्ट: 

हे कर्नाटकात आहे. एकेकाळी हा भाग मराठा साम्राज्यात होता.  मंगळुरूच्या जवळ एक खेडे आहे. त्या संपुर्ण गावात फक्त चित्तपावन ब्राह्मण रहातात आणि आजही चित्तपावनी भाषेत बोलतात. ब्रिटिशांनी त्यांच्या सोईसाठी म्हणून जोग च्या धबधब्याच्या अलिकडे बॉम्बे प्रोव्हिन्स आणि पलिकडे मैसुर प्रोव्हिन्स केले. त्यात हा सगळा भाग मैसुरमध्ये गेला. 

टॅग्स :Navratriनवरात्रीTravel Tipsट्रॅव्हल टिप्स