शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

सोमवारपासून सुरू होत आहे शाकंभरी नवरात्र; जाणून घ्या उत्सवाची सविस्तर माहिती. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 16:08 IST

सोमवारी अर्थात १० जानेवारी पासून शाकंभरी नवरात्र सुरू होत आहे. ही नवरात्र चैत्र आणि शारदीय नवरात्री इतकीच महत्त्वाची आहे. त्यानिमित्त जाणून घ्या या व्रताबद्दल सविस्तर माहिती

वर्षभरात एकूण तीन नवरात्री येतात. पहिली चैत्र नवरात्र, दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी शाकंभरी नवरात्र. चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असते. शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते. तर शाकंभरी नवरात्र पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते. चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र उत्साहात साजरी केली जाते, परंतु शाकंभरी नवरात्राबद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसते. काय आहे या नवरात्रीचे वैशिष्ट आणि ती कशी साजरी करतात, याची सविस्तर माहिती ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या 'धर्मबोथ' या ग्रंथातून जाणून घेऊया.

पौष शुद्ध सप्तमीच्या दिवशी शाकंभरी देवीचे नवरात्र सुरू होते. ह्याचे सारे पूजाविधी हे अश्विनातील देवी नवरात्रीसारखेच आहेत. अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबाची शाकंभरी देवी ही कुलदेवता आहे. हिचे दुसरे नाव 'बनशंकरी' असे आहे. या बनशंकरीचे विजापुरातील बादामी येथे मंदिर आहे. या काळात तिथे फार मोटा रथोत्सव असतो. वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते.

शाकंभरी नवरात्रीची कथा 

देवीभागवतामध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा आहे. त्यानुसार, एकदा आपल्या देशात अवर्षणामुळे लोक अन्नपाणी नसल्यामुळे तडफडून प्राण सोडू लागले. त्यांच्या या दीनस्थितीने देवीला त्यांची दया आली. त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या, पालेभाज्या निर्माण केल्या. त्या या मरणासन्न जनांना प्रेमाने खाऊ घालून देवीने त्यांचे प्राण वाचवले. म्हणून तिला 'शाकंभरी' हे नाव प्राप्त झाले. अशी क्षुधाशांती करणारी देवी, म्हणून तिची प्रार्थना करूया.

या देवि सर्व भुतेषु क्षुधारूपेण संस्थिता,नम: तस्यै, नम: तस्यै, नम: तस्यै नमो नम:

महाभारतातील वनपर्वामध्ये देवीने केवळ पालेभाज्या खाऊन एक हजार वर्षे तप केले, म्हणून तिला 'शाकंभरी' हे नाव मिळाले अशी कथा आहे. 

शाकंभरी देवीचा नैवेद्य 

ज्यांची ही कुलदेवता आहे, ती मंडळी पौष शुक्ल सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत या देवीचा नवरात्रोत्सव भक्तीपूर्वक साजरा करतात. पौष पौर्णिमेला देवीला साठ भाज्या आणि साठी कोशिंबिरींचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. म्हणून या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हणतात.

अलिकडच्या काळात आरोग्याबद्दल समाज सजग झाला आहे. आहाराचे संतुलन आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञदेखील फळे, भाज्या, कोशिंबिरी, भाज्यांचे, फळांचे रस घेण्याचा सल्ला देतात आणि लोक ऐकतातही!

शाकंभरी नवरात्रीनिमित्त असाही एक संकल्प 

शाकंभरी नवरात्रानिमित्त मुद्दाम नऊ दिवस विविध भाज्या मुद्दाम आहारात समाविष्ट कराव्यात. तसेच इतरांनाही रसरूपात द्याव्यात. ही एवढी सोपी गोष्ट 'व्रत' म्हणून कोणालाही करता येणे सहज शक्य आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही हे व्रत हितकारक आहे. चला तर, 'जय माता दी' म्हणत शाकंभरी देवीचा उत्सव साजरा करूया आणि आरोग्याचे संवर्धन करूया.

टॅग्स :Navratriनवरात्री