शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्र सांगते की 'या' पाच चुकीच्या सवयींमुळे दारिद्रय हात धुवून पाठी लागते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 17:43 IST

यश मिळाले तर त्याचे क्रेडिट आपण स्वतःकडे घेतो आणि अपयश आले तर नशिबावर त्याचे खापर फोडतो. परंतु शास्त्र सांगते की तुमच्या यशाला जसे तुम्ही कारणीभूत असता तसेच तुमच्या अपयशाला तुमच्या चुकीच्या सवयी कारणीभूत ठरू शकतात. 

यशस्वी लोकांचे यश आपल्याला दिसते पण त्यामागे त्यांनी घेतलेली मेहनत दिसत नाही. शास्त्र सांगते, यशस्वी तेच लोक होतात जे आपल्या दुर्गुणांवर मात करतात. अशा लोकांना प्रसिद्धी, पैसा, यश सर्वकाही मिळते. याउलट जे लोक आपल्या सवयी बदलत नाहीत, दारिद्रय त्यांची पाठ सोडत नाही. अशी परिस्थिती आपल्या वाट्याला येऊ नये असे वाटत असेल तर पुढील सवयींना आळा घाला!

सूर्योदयानंतर उठणारे लोक : 'लवकर निजे लवकर उठे त्यास आयु आरोग्य लाभे' असे धर्म शास्त्रात म्हटले आहे. परंतु ब्रह्म मुहूर्त दूरच आपण सूर्योदयाच्या वेळीदेखील उठत नाही. परिणामी दिवस उशिरा सुरू होतो आणि उशिरा संपतो. लवकर उठल्यामुळे पहाटेच्या शांत वातावरणात स्वतःवर लक्ष देता येते. त्या कालावधीत दिवसभराच्या तुलनेत कमी विचार असतात. त्यामुळे मन शांत होण्यास, एकाग्र होण्यास वेळ लागत नाही. आपल्याला ज्या क्षेत्रात पुढे जायचे आहे, त्याबद्दल जी तयारी करायची आहे, त्याची आखणी या कालावधीत करणे आपल्याला फायदेशीर ठरते. कारण त्या काळात आपला मेंदू सर्वात जास्त कार्यरत असतो. सकाळच्या वेळी केलेले पाठांतर, वाचन दीर्घकाळ लक्षात राहते. स्मरण शक्ती वाढते. सकारात्मकता वाढते. म्हणून म्हणून उशिरा उठणे टाळा! अन्यथा कितीही मेहनत घेतलीत तरी अपयश आणि दारिद्रय तुमची पाठ सोडणार नाही हे नक्की!

आळशी लोक : आळस हा माणसाचा शत्रू आहे हे आपण बालपणी शिकलो, परंतु त्याच्यापासून दूर राहणे आपण शिकलो नाही तर दारिद्रयाशी हातमिळवणी झालीच म्हणून समजा! आळसामुळे आपली प्रगती थांबते, ध्येय दूर जाते आणि जगण्याला उद्दिष्ट राहात नाही. त्याला आपण नैराश्य म्हणत कुरवाळू लागतो. परंतु शास्त्र सांगते जो अकार्यक्षम असतो तोच नैराश्येच्या गर्तेत जातो. जो स्वतःची मदत करू शकत नाही त्याची मदत दुसरे कोणीही करू शकत नाही. म्हणून आळस झटका आणि कामाला लागा!

मळके कपडे घालणारे लोक : कपडे महाग आहेत की स्वस्तातले हे महत्त्वाचे नसून ते स्वच्छ असणे जास्त महत्त्वाचे आहे. आपल्या कपड्यांवरून आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडते तसेच आपला आत्मविश्वास दुणावतो. मळके, चुरगळलेले, फाटके कपडे पाहून कोणीही आपल्याला जवळ करत नाही. यासाठीच आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभतील असे कपडे परिधान करावेत. ते नीट नेटके असावेत. स्वच्छ असावेत. ते परिधान केल्यामुळे आपल्याला आल्हाददायक वाटले पाहिजे. 

दुसऱ्यांचा अपमान करणारे लोक : काही लोक स्वतःला सर्वज्ञ समजतात. त्यांच्या लेखी दुसऱ्यांना काहीच येत नाही. या गैरसमजापोटी ते त्यांचा अपमान करतात, कमी लेखतात. अशा गर्विष्ठ लोकांशी कोणी मैत्री करत नाही. त्यामुळे हे लोक स्वतःच्या प्रगतीत स्वतःच अडथळा निर्माण करतात. याउलट जे लोक स्वतः बरोबर इतरांच्या प्रगतीचा विचार आणि कृती करतात त्यांची प्रगती आपोआप होत जाते. म्हणून विद्यार्थी दशेत राहून प्रत्येकाचा चांगला गुण घेऊन स्वतःचा उत्कर्ष करणे केव्हाही चांगले!

अस्वच्छ राहणारे लोक : ज्या लोकांना स्वतःची, घराची स्वच्छता राखता येत नाही असे लोक आपल्या कामातही नीटनेटकेपणा आणू शकत नाहीत. या लोकांकडे कोणीही लक्ष देत नाही. एवढेच काय तर लक्ष्मी माताही अशा घरांकडे फिरत नाही. तसेच अशा लोकांच्या हाती लक्ष्मी टिकत नाही. कारण खर्च करण्याबाबतीतही त्यांना नेटकेपणाने व्यवहार जमत नाही. यासाठीच आपल्या छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत आपण डोळसपणे लक्ष द्यायला हवे. अस्वच्छता दूर करायला हवी, घरातली, शरीरातली आणि मनातलीदेखील; तर आणि तरच तुमचा सर्वार्थाने उत्कर्ष होऊ शकेल आणि दारिद्रयापासून तुमची सुटका होऊ शकेल!