शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

शास्त्र सांगते की 'या' पाच चुकीच्या सवयींमुळे दारिद्रय हात धुवून पाठी लागते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 17:43 IST

यश मिळाले तर त्याचे क्रेडिट आपण स्वतःकडे घेतो आणि अपयश आले तर नशिबावर त्याचे खापर फोडतो. परंतु शास्त्र सांगते की तुमच्या यशाला जसे तुम्ही कारणीभूत असता तसेच तुमच्या अपयशाला तुमच्या चुकीच्या सवयी कारणीभूत ठरू शकतात. 

यशस्वी लोकांचे यश आपल्याला दिसते पण त्यामागे त्यांनी घेतलेली मेहनत दिसत नाही. शास्त्र सांगते, यशस्वी तेच लोक होतात जे आपल्या दुर्गुणांवर मात करतात. अशा लोकांना प्रसिद्धी, पैसा, यश सर्वकाही मिळते. याउलट जे लोक आपल्या सवयी बदलत नाहीत, दारिद्रय त्यांची पाठ सोडत नाही. अशी परिस्थिती आपल्या वाट्याला येऊ नये असे वाटत असेल तर पुढील सवयींना आळा घाला!

सूर्योदयानंतर उठणारे लोक : 'लवकर निजे लवकर उठे त्यास आयु आरोग्य लाभे' असे धर्म शास्त्रात म्हटले आहे. परंतु ब्रह्म मुहूर्त दूरच आपण सूर्योदयाच्या वेळीदेखील उठत नाही. परिणामी दिवस उशिरा सुरू होतो आणि उशिरा संपतो. लवकर उठल्यामुळे पहाटेच्या शांत वातावरणात स्वतःवर लक्ष देता येते. त्या कालावधीत दिवसभराच्या तुलनेत कमी विचार असतात. त्यामुळे मन शांत होण्यास, एकाग्र होण्यास वेळ लागत नाही. आपल्याला ज्या क्षेत्रात पुढे जायचे आहे, त्याबद्दल जी तयारी करायची आहे, त्याची आखणी या कालावधीत करणे आपल्याला फायदेशीर ठरते. कारण त्या काळात आपला मेंदू सर्वात जास्त कार्यरत असतो. सकाळच्या वेळी केलेले पाठांतर, वाचन दीर्घकाळ लक्षात राहते. स्मरण शक्ती वाढते. सकारात्मकता वाढते. म्हणून म्हणून उशिरा उठणे टाळा! अन्यथा कितीही मेहनत घेतलीत तरी अपयश आणि दारिद्रय तुमची पाठ सोडणार नाही हे नक्की!

आळशी लोक : आळस हा माणसाचा शत्रू आहे हे आपण बालपणी शिकलो, परंतु त्याच्यापासून दूर राहणे आपण शिकलो नाही तर दारिद्रयाशी हातमिळवणी झालीच म्हणून समजा! आळसामुळे आपली प्रगती थांबते, ध्येय दूर जाते आणि जगण्याला उद्दिष्ट राहात नाही. त्याला आपण नैराश्य म्हणत कुरवाळू लागतो. परंतु शास्त्र सांगते जो अकार्यक्षम असतो तोच नैराश्येच्या गर्तेत जातो. जो स्वतःची मदत करू शकत नाही त्याची मदत दुसरे कोणीही करू शकत नाही. म्हणून आळस झटका आणि कामाला लागा!

मळके कपडे घालणारे लोक : कपडे महाग आहेत की स्वस्तातले हे महत्त्वाचे नसून ते स्वच्छ असणे जास्त महत्त्वाचे आहे. आपल्या कपड्यांवरून आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडते तसेच आपला आत्मविश्वास दुणावतो. मळके, चुरगळलेले, फाटके कपडे पाहून कोणीही आपल्याला जवळ करत नाही. यासाठीच आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभतील असे कपडे परिधान करावेत. ते नीट नेटके असावेत. स्वच्छ असावेत. ते परिधान केल्यामुळे आपल्याला आल्हाददायक वाटले पाहिजे. 

दुसऱ्यांचा अपमान करणारे लोक : काही लोक स्वतःला सर्वज्ञ समजतात. त्यांच्या लेखी दुसऱ्यांना काहीच येत नाही. या गैरसमजापोटी ते त्यांचा अपमान करतात, कमी लेखतात. अशा गर्विष्ठ लोकांशी कोणी मैत्री करत नाही. त्यामुळे हे लोक स्वतःच्या प्रगतीत स्वतःच अडथळा निर्माण करतात. याउलट जे लोक स्वतः बरोबर इतरांच्या प्रगतीचा विचार आणि कृती करतात त्यांची प्रगती आपोआप होत जाते. म्हणून विद्यार्थी दशेत राहून प्रत्येकाचा चांगला गुण घेऊन स्वतःचा उत्कर्ष करणे केव्हाही चांगले!

अस्वच्छ राहणारे लोक : ज्या लोकांना स्वतःची, घराची स्वच्छता राखता येत नाही असे लोक आपल्या कामातही नीटनेटकेपणा आणू शकत नाहीत. या लोकांकडे कोणीही लक्ष देत नाही. एवढेच काय तर लक्ष्मी माताही अशा घरांकडे फिरत नाही. तसेच अशा लोकांच्या हाती लक्ष्मी टिकत नाही. कारण खर्च करण्याबाबतीतही त्यांना नेटकेपणाने व्यवहार जमत नाही. यासाठीच आपल्या छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत आपण डोळसपणे लक्ष द्यायला हवे. अस्वच्छता दूर करायला हवी, घरातली, शरीरातली आणि मनातलीदेखील; तर आणि तरच तुमचा सर्वार्थाने उत्कर्ष होऊ शकेल आणि दारिद्रयापासून तुमची सुटका होऊ शकेल!