शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

शास्त्र सांगते की 'या' पाच चुकीच्या सवयींमुळे दारिद्रय हात धुवून पाठी लागते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 17:43 IST

यश मिळाले तर त्याचे क्रेडिट आपण स्वतःकडे घेतो आणि अपयश आले तर नशिबावर त्याचे खापर फोडतो. परंतु शास्त्र सांगते की तुमच्या यशाला जसे तुम्ही कारणीभूत असता तसेच तुमच्या अपयशाला तुमच्या चुकीच्या सवयी कारणीभूत ठरू शकतात. 

यशस्वी लोकांचे यश आपल्याला दिसते पण त्यामागे त्यांनी घेतलेली मेहनत दिसत नाही. शास्त्र सांगते, यशस्वी तेच लोक होतात जे आपल्या दुर्गुणांवर मात करतात. अशा लोकांना प्रसिद्धी, पैसा, यश सर्वकाही मिळते. याउलट जे लोक आपल्या सवयी बदलत नाहीत, दारिद्रय त्यांची पाठ सोडत नाही. अशी परिस्थिती आपल्या वाट्याला येऊ नये असे वाटत असेल तर पुढील सवयींना आळा घाला!

सूर्योदयानंतर उठणारे लोक : 'लवकर निजे लवकर उठे त्यास आयु आरोग्य लाभे' असे धर्म शास्त्रात म्हटले आहे. परंतु ब्रह्म मुहूर्त दूरच आपण सूर्योदयाच्या वेळीदेखील उठत नाही. परिणामी दिवस उशिरा सुरू होतो आणि उशिरा संपतो. लवकर उठल्यामुळे पहाटेच्या शांत वातावरणात स्वतःवर लक्ष देता येते. त्या कालावधीत दिवसभराच्या तुलनेत कमी विचार असतात. त्यामुळे मन शांत होण्यास, एकाग्र होण्यास वेळ लागत नाही. आपल्याला ज्या क्षेत्रात पुढे जायचे आहे, त्याबद्दल जी तयारी करायची आहे, त्याची आखणी या कालावधीत करणे आपल्याला फायदेशीर ठरते. कारण त्या काळात आपला मेंदू सर्वात जास्त कार्यरत असतो. सकाळच्या वेळी केलेले पाठांतर, वाचन दीर्घकाळ लक्षात राहते. स्मरण शक्ती वाढते. सकारात्मकता वाढते. म्हणून म्हणून उशिरा उठणे टाळा! अन्यथा कितीही मेहनत घेतलीत तरी अपयश आणि दारिद्रय तुमची पाठ सोडणार नाही हे नक्की!

आळशी लोक : आळस हा माणसाचा शत्रू आहे हे आपण बालपणी शिकलो, परंतु त्याच्यापासून दूर राहणे आपण शिकलो नाही तर दारिद्रयाशी हातमिळवणी झालीच म्हणून समजा! आळसामुळे आपली प्रगती थांबते, ध्येय दूर जाते आणि जगण्याला उद्दिष्ट राहात नाही. त्याला आपण नैराश्य म्हणत कुरवाळू लागतो. परंतु शास्त्र सांगते जो अकार्यक्षम असतो तोच नैराश्येच्या गर्तेत जातो. जो स्वतःची मदत करू शकत नाही त्याची मदत दुसरे कोणीही करू शकत नाही. म्हणून आळस झटका आणि कामाला लागा!

मळके कपडे घालणारे लोक : कपडे महाग आहेत की स्वस्तातले हे महत्त्वाचे नसून ते स्वच्छ असणे जास्त महत्त्वाचे आहे. आपल्या कपड्यांवरून आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडते तसेच आपला आत्मविश्वास दुणावतो. मळके, चुरगळलेले, फाटके कपडे पाहून कोणीही आपल्याला जवळ करत नाही. यासाठीच आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभतील असे कपडे परिधान करावेत. ते नीट नेटके असावेत. स्वच्छ असावेत. ते परिधान केल्यामुळे आपल्याला आल्हाददायक वाटले पाहिजे. 

दुसऱ्यांचा अपमान करणारे लोक : काही लोक स्वतःला सर्वज्ञ समजतात. त्यांच्या लेखी दुसऱ्यांना काहीच येत नाही. या गैरसमजापोटी ते त्यांचा अपमान करतात, कमी लेखतात. अशा गर्विष्ठ लोकांशी कोणी मैत्री करत नाही. त्यामुळे हे लोक स्वतःच्या प्रगतीत स्वतःच अडथळा निर्माण करतात. याउलट जे लोक स्वतः बरोबर इतरांच्या प्रगतीचा विचार आणि कृती करतात त्यांची प्रगती आपोआप होत जाते. म्हणून विद्यार्थी दशेत राहून प्रत्येकाचा चांगला गुण घेऊन स्वतःचा उत्कर्ष करणे केव्हाही चांगले!

अस्वच्छ राहणारे लोक : ज्या लोकांना स्वतःची, घराची स्वच्छता राखता येत नाही असे लोक आपल्या कामातही नीटनेटकेपणा आणू शकत नाहीत. या लोकांकडे कोणीही लक्ष देत नाही. एवढेच काय तर लक्ष्मी माताही अशा घरांकडे फिरत नाही. तसेच अशा लोकांच्या हाती लक्ष्मी टिकत नाही. कारण खर्च करण्याबाबतीतही त्यांना नेटकेपणाने व्यवहार जमत नाही. यासाठीच आपल्या छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत आपण डोळसपणे लक्ष द्यायला हवे. अस्वच्छता दूर करायला हवी, घरातली, शरीरातली आणि मनातलीदेखील; तर आणि तरच तुमचा सर्वार्थाने उत्कर्ष होऊ शकेल आणि दारिद्रयापासून तुमची सुटका होऊ शकेल!