शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

'असा' मोलाचा सल्ला देणारे साधू महाराज आपल्यालाही भेटत राहिले पाहिजे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 18:25 IST

क्रोधाचा एक क्षण सावरता आला, तर पश्चात्तापाचे असंख्य क्षण टाळता येतात.

असे म्हणतात, की राग येत असेल तर मनातल्या मनात १०० आकडे मोजा आणि रागाच्या भरात एखादी कृती करणार असाल, तर १००० आकडे मोजा. थोडक्यात रागाच्या क्षणी प्रतिक्रिया देण्याआधी दोन क्षण थांबा...त्यामुळे परिस्थिती बदलेल, राग निवळेल आणि हातून चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत.

स्वातंत्र्यपूर्व काळातली ही गोष्ट आहे. एक तरुण आपल्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून परदेशातील खलाशाची नोकरी पत्करतो. बायको आणि आपले कुटुंब मागे ठेवून परदेश गाठतो. खूप मेहनत घेतो. वेळच्या वेळी घरी पैसे पाठवतो. पत्र, टेलिफोन या माध्यमातून घरच्यांची चौकशी करतो. असे करत जवळपास १५ वर्षे उलटतात. आपल्या परिश्रमातून तो बऱ्यापैकी श्रीमंत माणूस बनतो. आणि एक दिवस जहाजातून प्रवास करत तो मायदेशी परतण्याचे ठरवतो. 

त्या प्रवासात त्याला एक साधू भेटतात. हा त्यांना आपली यशोगाथा ऐकवतो. त्यावर साधू त्याचे कौतुक करत म्हणतात, 'तुझे यश टिकून राहावे असे वाटत असेल तर एक सल्ला देतो, तो आयुष्यभर लक्षात ठेव. कितीही राग आला तरी दोन क्षण थांब आणि मगच व्यक्त हो!'

यशासाठी १५ वर्षे झटलेला तो तरुण खांदे उडवत साधूबाबाला देखल्या देवा दंडवत घालतो. प्रवास पूर्ण होतो. वायूवेगाने तो घरी पोहोचतो. आई वडिलांची भेट घेतो. बायको झोपली आहे कळल्यावर, दबकत पावले टाकत खोलीत जातो आणि तिथे पाहतो तर काय, आपली बायको परपुरुषाबरोबर झोपली आहे. क्षणात विचारांचे चक्र उलट्या दिशेने फिरू लागते. आपल्या कुटुंबासाठी आपण झटलो आणि आपल्या अपरोक्ष आपल्या बायकोने दुसऱ्या पुरुषाशी.... आणि आई वडिलांना काहीच हरकत नाही? रागाच्या भरात तो दरवाज्याला टेकू म्हणून ठेवलेला दगड उचलतो आणि तो दगड त्या दोघांच्या डोक्यात घालणार, तोच त्याला साधू बाबांचे शब्द आठवतात आणि तो दोन क्षण थांबतो. दोन पावले मागे सरकतो. त्याच्या धक्याने कपाटावर आघात होतो आणि त्या आवाजाने त्याची बायको आणि तो पुरुष उठतो. 

बायको आश्चर्यचकित होऊन आनंदाने नवऱ्याला मिठी मारते आणि तो पुरुषही धावत येऊन आलिंगन देतो. रागाच्या भरात तो तरुण त्या दोघांना दूर करतो. तेवढ्यात त्या पुरूषाची पगडी खाली पडते आणि मोठे केस सुटतात. ते पाहून तरुण आश्चर्यचकित होतो, कारण पगडी घातलेली व्यक्ती पुरुष नसून कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी पुरुषाचा वेष घेतलेली त्याची सख्खी धाकटी बहीण असते. 

तो तरुण त्या दोघींचे पाय धरून क्षमा मागतो आणि आपल्या अपराधी मनाची कबुली देतो व त्याचवेळेस मनोमन साधूबाबांचे आभार मानतो. ते दोन क्षण तो थांबला नसता, तर त्याच्या उज्वल भविष्याचे क्षणात मातेरे झाले असते. पण त्याने साधूबाबांची शिकवण अंमलात आणली, त्यामुळे त्याचे मोठे नुकसान टळले. यासाठीच म्हणतात, क्रोधाचा एक क्षण सावरता आला, तर पश्चात्तापाचे असंख्य क्षण टाळता येतात.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी