शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

Relationship Tips: जोडीदारापैकी कोणी एक खूपच तापट असेल तर उपाय काय? साधूबाबांनी दिले उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:28 IST

Relationship Tips: राग लोभ प्रत्येक नात्यात असतातच, पण लोभ नसून नुसताच राग राग होत असेल तर त्या नात्यात कोणा एकाची घुसमट होते, त्यावर उपाय सांगणारी बोधकथा!

काही गोष्टी, मुद्दे सोदाहरण सांगितले की लगेच कळतात, पटतात. म्हणून पूर्वी आजी आजोबा नातवंडांना इसापनीतीच्या गोष्टी सांगत असत. त्यात संवाद प्राण्यांच्या तोंडी असले तरी घटना मानवी जीवनाशी निगडित असत. त्यातून खूप छान शिकवण मिळत असे. आज अशीच एक बोधकथा आपण जाणून घेणार आहोत. 

फार पूर्वी एक वृद्ध साधू हिमालयाच्या डोंगरात राहत होते. ते अत्यंत विद्वान होते आणि त्याच्या बुद्धिमत्तेची कीर्ती दूरवर पसरली होती. एके दिवशी एक स्त्री त्यांच्याकडे आली आणि रडायला लागली, "बाबा, माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो, पण जेव्हापासून तो युद्धातून परतला तेव्हापासून तो माझ्याशी नीट बोलतही नाही."

"युद्धातल्या हाणामारीमुळे त्याचा स्वभाव बदलला असेल" , साधूंनी सांगितले. 

"असू शकते, पण लोक म्हणतात की तुम्ही दिलेली औषधी वनस्पती माणसात बदल घडवू शकते, कृपया मला ती औषधी द्या." , महिलेने विनवणी केली.

साधूंनी थोडावेळ विचार केला आणि मग म्हणाले, "देवी, मी तुला ती औषधी नक्कीच दिली असती, पण ती बनवण्यासाठी एक गोष्ट लागेल, जी आज माझ्याकडे नाही."

“तुम्हाला काय लागेल ते सांगा मी घेऊन येईन.”, ती स्त्री म्हणाली.

“मला वाघाच्या मिशीचे केस हवे आहेत,” साधूंनी सांगितलं. 

पुढचा मागचा विचार न करता दुसऱ्याच दिवशी ती महिला वाघाच्या शोधात जंगलात निघाली, खूप शोधाशोध केल्यावर तिला नदीच्या काठावर वाघ दिसला, वाघाने तिला पाहताच डरकाळी फोडली, ती महिला घाबरली आणि धावत पळत आपल्या घरी आली. 

पुढचे काही दिवस असे घडत राहीले, ती बाई हिंमत दाखवून वाघाजवळ जाई आणि घाबरून परत येई. जसजसे महिने उलटले तसतसे वाघाला महिलेच्या येण्याची सवय झाली आणि आता तो तिला पाहिल्यावर घाबरवण्याचा थांबला. आता बाईंनीही वाघासाठी मांस आणायला सुरुवात केली आणि वाघ मोठ्या चवीने खाऊ लागला. त्यांची मैत्री वाढू लागली आणि आता ती महिलाही वाघाला थोपटायला लागली. मग एके दिवशी तिने हिंमत दाखवून वाघाच्या मिशीचे केसही काढले.

क्षणाचाही विलंब न करता ती साधुंकडे पोहोचली आणि म्हणाली, "बाबा, मी वाघाच्या मिशीचे केस आणले आहेत."

"खूप छान." असे म्हणत साधूंनी केस अग्नीत टाकले.

"अहो बाबा, हे काय आहे, हे केस मिळविण्यासाठी मी किती प्रयत्न केले आणि तुम्ही ते जाळून टाकले ? आता माझी औषधी वनस्पती कशी तयार होणार?" बाई घाबरून म्हणाल्या.

"आता तुम्हाला औषधी वनस्पतींची गरज नाही." साधू म्हणाले, ''जरा विचार करा, तुम्ही वाघाला कसे काबूत आणले….जर भयंकर प्राण्याला संयमाने आणि प्रेमाने काबूत ठेवता येते, तर माणसाला काबूत आणता येत नाही का? जा, वाघाला जसे मित्र बनवले तशी तुझ्या नवऱ्याची प्रेमाची भावना जागृत कर.”

बाईला साधूंचे म्हणणे समजले आणि तिला तिची जडीबुटी मिळाली...! 

या बोधकथेतून शिकण्यासारखी गोष्ट हीच की जोडीदारापैकी कोणी एक तापट असेल तर दुसऱ्याला संयमाने घ्यावे लागते आणि प्रेमाने व सबुरीने त्यांना आपलेसे करावे, हेच स्वभावावरचे औषध समजावे. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीrelationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप