शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

Relationship Tips: सुखी दाम्पत्य जीवनासाठी चुकूनही करू नका 'या' २ गोष्टी- प्रेमानंदजी महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 12:51 IST

Relationship Tips: ज्याचा संसार सुखाचा असेल तोच पारमार्थिक मार्गावर पुढे जाऊ शकतो, यासाठी सुखी संसाराचा मंत्र देत आहेत प्रेमानंदजी महाराज!

संसारात नैराश्य आले म्हणून जर परमार्थाची वाट धरत असाल तर दोन्ही तुमच्याकडून साध्य होणार नाही. संसारात राहून विषय, विकार, वासना संपवून जो परमार्थाची वाट चालतो तोच मोक्षाकडे जातो. म्हणून संतांनी आधी 'प्रपंच करावा नेटका' असे म्हटले आहे. त्यासाठी नवरा बायकोचे नाते यावर भाष्य करताना अध्यात्मिक गुरु प्रेमानंदजी महाराज यांनी मार्गदर्शन केले आहे. 

ते सांगतात, विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया आहे. त्यात नवरा बायकोच्या नात्याचा पूर्ण डोलारा विश्वासावरच अवलंबून असतो. विश्वासाला तडा गेला तर छोटीशी भेग दरी बनू लागते आणि त्याचे पर्यवसान घटस्फोटात होते. तसे होऊ नये म्हणून नवरा बायकोने दोन महत्त्वाच्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत; कोणत्या ते जाणून घेऊ. 

पहिली गोष्ट म्हणजे प्रेम : 

नात्यात प्रेम असेल तर समोरच्या व्यक्तीला गुण दोषासकट स्वीकारण्याची मानसिकता आपोआप तयार होते. फक्त आई-वडील आणि मुलांच्या नात्यात उपजत प्रेम असते. नवरा बायकोच्या किंवा इतर कोणत्याही नात्यात सहवासाने, काळजीने, आपुलकीने प्रेम निर्माण करता येते. नवरा बायको या दोन वेगवेगळ्या वातावरणात घडलेल्या दोन स्वतंत्र व्यक्ती जेव्हा एका छताखाली येतात तेव्हा सहवासाने प्रेम वाढते तसेच वादालाही अनेक विषय सापडतात. मात्र कोणत्याही वादात अहंकाराचा समावेश झाला तर प्रेमळ नात्याला सुरुंग लागतो आणि नाते दुभंगते. अशा वेळी नवरा बायकोने अहंकार महत्त्वाचा की नाते यावर सारासार विचार करून वेळीच माघार घ्यावी आणि वाद मिटवावेत. तसेच इतर कोणामुळे अविश्वास निर्माण होत असेल तर परस्परांशी बोलून संशय दूर करावा, त्यामुळे अकारण तेढ वाढत नाही. नाते अधिक दृढ होते. 

नवरा बायकोचे परस्परांवर निस्सीम प्रेम असेल तर शारीरिक, मानसिक, आर्थिक गरजा भागवण्यासाठी इतर कोणाची गरज वाटत नाही की व्यभिचारही करण्याची गरज भासत नाही. मात्र तसे नसेल तर, विश्वासघात होण्याची शक्यता बळावते किंवा कोणा एकाची घुसमट होत राहते. असे नाते वरकरणी एकत्र असले तरी त्या नात्याला अर्थ उरत नाही. प्रेमाची, सहानुभूतीची, स्पर्शाची गरज प्रत्येक जीवाला असते तर नवरा-बायकोला का नसणार? हीच गरज ओळखून परस्परांचा आदर करा आणि प्रेमाने नाते घट्ट बांधून ठेवा. 

जबाबदारीची जाणीव : 

सद्यस्थितीत विवाहबाह्य संबंध उघडपणे स्वीकारले जात आहेत. पण या संबंधातून शारीरिक आकर्षण संपले की फक्त मनःस्ताप वाट्याला येतो हे लक्षात ठेवा. आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मानवी देह म्हटल्यावर वासना, विकार जडणारच! परंतु त्यावर विवेक बुद्धीने मात करणे हे आपल्या हातात आहे. इतर कोणाबद्दल वाटणारे आकर्षण आणि त्याच वेळी मनावर घातलेले बंधन हे समीकरण जुळून आले तर नाते कधीही तुटणार नाही. विचार, वासना येत राहतात, त्याकडे दुर्लक्ष करा. एकमेकांवर निष्ठा ठेवा, मुलांचा विचार करा आणि बाह्य आकर्षणाला बळी पडू नका. आपण चुकीचे वागतोय, तसेच जोडीदाराने आपल्याला फसवले असते तर आपण ते सहन करू शकलो असतो का? या गोष्टींचा विचार करणे यालाच जबाबदारीची जाणीव असणे म्हणतात. 

नवरा बायकोने या दोन गोष्टींचे पालन केले तरी अर्ध्याहून अधिक कलह मिटतील. प्रश्न राहिला पैशांचा, तर पैसा, संपत्ती कष्टानेही मिळवता येईल, मात्र एकदा तुटलेले नाते, अनेक प्रयत्न केले तरी जोडले जाईलच असे नाही, म्हणून नात्यांचा आदर करा आणि जपा, आयुष्याच्या शेवटी तेच कामी येणार आहे!

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप