शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

Ram Navami 2023 : सबंध रामायण तर वाचाच, पण 'या'पाच मुख्य व्यक्ती नक्की लक्षात ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 11:05 IST

Ram Navami 2023: रामायणातील या पात्रांकडून आपण शिकलो, तर आपल्या आयुष्यातील प्रश्न दूर करता येतील.

रामायणातील 'ही' पाच मुख्य पात्र, शिकवतात आयुष्यातील पाच मुख्य गोष्टी!

राजा दशरथ: वृद्धत्वाकडे झुकल्यावर राजा दशरथाने स्वेच्छानिवृत्ती पत्करून राज्यकारभार श्रीरामांच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतला. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. पदाचा, सत्तेचा मोह भल्याभल्यांना सुटत नाही. परंतु दुसऱ्याने जाणीव करून देण्याआधी आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव होणे आणि पदाचा मोह त्यागणे गरजेचे आहे. 

प्रभू श्रीराम : अयोध्येचा राजा म्हणून राजपदाची शपथ घेणार तेवढ्यात वार्ता येते वनवासाची! काय असेल तो प्रसंग, कसा असेल तो क्षण, कशी असेल रामाची मानसिक स्थिती? अन्य कोणी असते, तर त्याला हा धक्का सहन झाला नसता, परंतु रामांनी पितावचनाचे पालन केले आणि आनंदाने वनवासदेखील पत्करला. अशा या दशरथपुत्र श्रीरामाचे नाम घेणे केव्हाही चांगलेच, परंतु त्यांचे गुण अंगिकारणे त्याहून चांगले. श्रीरामांच्या चरणांचा ध्यास आपल्याला मंदिरापर्यंत नेईल, परंतु आचरणाचा ध्यास श्रीरामांपर्यंत नेईल!

माता सीता : वनवासात जाण्याची शिक्षा फक्त रामाला मिळाली होती. परंतु पत्नीधर्म म्हणून सीतेने वनवासात जाण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी तिला विरोध केला. खुद्द रामांनीसुद्धा तिला नाही म्हटले, परंतु सीतेने राजसुखाचा त्याग करून पतीला साथ द्यायची ठरवली. यातून आपल्याला शिकवण मिळते, की कितीही मोठे संकट आले, तरी ही नियतीची योजना आहे असे मानून तिचा स्वीकार करा आणि आपल्या तत्त्वाला तिलांजली न देता सुखदु:खात आपल्या माणसांची साथ द्या. या निर्णयामुळे सीतेला अनेक कष्ट सहन करावे लागले, परंतु तिच्या त्यागामुळेच ती माता सीता म्हणून गौरवली गेली. 

भरत : लक्ष्मण रामाच्या सावलीप्रमाणे सर्वत्र वावरत असला, तरीदेखील बंधू प्रेमाबाबत राम भरताच्या प्रेमाचे दाखले दिले जातात. रामाला वनवास मिळाला, हे कळताच आजोळी गेलेला भरत रामाच्या भेटीला चित्रकुट पर्वतावर येऊन पोहोचतो आणि राज्यकारभार तुम्ही स्वीकारा अशी विनवणी करतो. राम पितृआज्ञेबाहेर नसतात. ते भरताला वडिलांची आणि आईची ईच्छा आणि कर्तव्य पूर्ण कर सांगतात. तेव्हा भरत श्रीरामांच्या पादुका राज्यसिंहासनावर ठेवून राज्यकारभार पाहतो आणि राम परत येईपर्यंत आपणही राज्याबाहेर छोटीशी कुटी बांधून वनवासी जीवन व्यतीत करतो. यावरून शिकवण मिळते, जी गोष्ट आपली नाही, त्यावर अधिकार दाखवू नका आणि ती ज्याची आहे त्याला आदराने सुपूर्द करा. 

लक्ष्मण : लक्ष्मणाने रामाला सदैव साथ दिली, तरी रामाचे भरतावर अधिक प्रेम होते. परंतु म्हणून लक्ष्मणाने कधीच वाईट वाटून घेतले नाही. तो आपले कर्तव्य निभावत राहिला. म्हणून त्याच्याकडून आपण शिकले पाहिजे, की नाव व्हावे म्हणून काम करू नये, तर काम करत राहावे, आपोआप नाम होते. निष्काम मनाने केलेली सेवा ईश्वरचरणी रुजू होते. म्हणतात ना...जिनके मन कपट, दंभ नही, हो माया, उनके हृदय बसहु रघुराया!

टॅग्स :Ram Navamiराम नवमीramayanरामायण