शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
Daily Top 2Weekly Top 5

एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: September 26, 2020 07:00 IST

हनुमंतांनी सीतामाईला हृदयस्थ रामाचे दर्शन घडवले, त्यावर प्रसन्न होऊन सीतामाई आणि रामरायांनी हनुमंताला 'चिरंजीवी भव' असा आशीर्वाद दिला.

ठळक मुद्देहनुमंताचे आपल्यावर एवढे उपकार आहेत, की आपल्या प्राणांची कुडी जरी दिली, तरी त्याचे उपकार फिटणार नाहीत -प्रभू श्रीराम

ज्योत्स्ना गाडगीळ 

प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, हनुमंत आणि समस्त वानरसेना रावणाला पराजित करून अयोध्येत परत आली. तेव्हा, अयोध्यावासीयांनी उत्सव साजरा केला, जल्लोश केला, गुढ्या उभारल्या, रांगोळ्या काढल्या आणि आपल्या रघुरायाचे आणि सीतामाईचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. प्रेमाने भारावलेल्या सीतामाईला त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असे वाटले. तिने आपला मनोदय रामरायासमोर मांडला आणि त्यांनी होकार दिल्यावर एक भेट समारंभ आयोजित केला. समस्त वानरसेना, अयोध्यावासी या समारंभात सहभागी झाले होते. प्रत्येकाची वैयक्तिक भेट घेऊन सीतामाई आणि रामरायांनी त्यांना भेटवस्तू देऊ केली. 

या समारंभात हनुमंतदेखील उपस्थित होते. मात्र, त्यांचे समारंभात अजिबात लक्ष नव्हते. ते एका झाडावर फळ खात बसले होते. अचानक सीतामाईच्या लक्षात आले, जवळपास सर्वांना भेटवस्तू देऊन झाल्या, मात्र या कार्यात ज्याचा सिंहाचा वाटा होता, त्या हनुमंताला आपण काहीच भेट दिली नाही. सीतामाईने रामरायाला ही बाब सांगितली व हनुमंताला काय भेट द्यावी अशी विचारणा केली. त्यावर रामराय निरुत्तर झाले. ते म्हणाले, `हनुमंताचे आपल्यावर एवढे उपकार आहेत, की आपल्या प्राणांची कुडी जरी दिली, तरी त्याचे उपकार फिटणार नाहीत. सीतामाईलाही ती बाब पटली. तरीदेखील, सीतामाईला भेटवस्तू देण्याचा मोह आवरला नाही. तिने हनुमंताला बोलावून घेतले. 

आज्ञा मिळताच, पुढच्याच क्षणी हनुमंत समोर हजर. त्यांनी सीतामाई आणि रामरायाला वंदन केले आणि 'काय आज्ञा' अशी विचारणा केली. सीतामाईने थेट मुद्द्याचे बोलून आपल्या गळ्यातला, माहेरहून मिळालेला, अतिशय मौलिक असा नवरत्नांचा हार हनुमंताला भेट म्हणून दिला. `या हाराचे मी काय करणार?' असा विचार येत हनुमंताने रामरायाकडे पाहिले. सीतेचा आग्रह मोडू नकोस, या भेटीचा स्वीकार कर, असे रामरायाने नजरेतूनच सांगितले. हनुमंताने तसे केलेही. 

भेटवस्तू स्वीकारून हनुमंत पुन्हा झाडावर जाऊन बसले. त्यांनी पुनश्च हाराकडे निरखून पाहिले. हारातली रत्ने चमचमत होती. आकर्षक दिसत होती. परंतु, त्या रत्नांमध्ये मारुतीरायाला आपलीच प्रतिमा दिसत होती. कदाचित रत्नाच्या आतमध्ये रामराय असतील, अशा विचाराने हनुमंताने एक एक रत्न दाताने फोडून बघायला सुरुवात केली. सीतामाईने कुतुहलाने कटाक्ष टाकला. तिला वाटले होते, हनुमंत आपण दिलेल्या भेटवस्तूचा स्वीकार करून, सर्वत्र मिरवेल. मात्र, चित्र काही भलतेच होते. 

केवळ नवरत्न फोडल्याचे दु:ख नव्हते. तो हार माहेरून मिळालेला असल्याने, स्वाभाविकच हाराची किंमत चौपट होती. त्याची अशी विल्हेवाट लागत असताना पाहून सीतामाईने थोडं रागात आणि थोडं नाराजीत हनुमंताला प्रश्न विचारला, `हनुमंता भेटवस्तू आवडली नव्हती, तर तसे सांगायचे ना. दुसरे काहीतरी दिले असते. पण तू, हे असे वागलेले मला अजिबात आवडले नाही. 

मातेची क्षमा मागून हनुमंत म्हणाले, `रावणाविरुद्ध लढणे, त्याचा पराभव करणे आणि आपल्या स्वामींच्या कार्याला हातभार लावणे, ही सेवक म्हणून माझी जबाबदारीच होती. ते काही उपकार नव्हेत. म्हणून मी समारंभात असूनही अलिप्त बसून होतो. आपण मला भेटवस्तू देऊ केली. ती खरोखरीच अपूर्व होती. परंतु, ती नीट निरखून पाहिल्यावर लक्षात आले, की त्यात माझे रामराय नाहीत. त्यांच्या शोधार्थ मी प्रत्येक रत्न फोडून माझे नररत्न आढळते का, याचा शोध घेत होतो. 

हेही वाचाः भगवान विष्णूंना आवडणारी आठ फुले कोणती?; सांगताहेत सुधा मूर्ती

हनुमंताच्या स्पष्टीकरणावर प्रतिप्रश्न करत मातेने विचारले, 'तुला त्या हारात रामराय दिसले नाहीत, म्हणून ती तोडून टाकलीस. मात्र, तू  एवढा रामनाम घेत असतोस, मग तुझ्या हृदयात तरी राम आहे का?'

त्याक्षणी हनुमंताने उठून मातेला वंदन केले, रघुरायाचे स्मरण केले आणि आपली छाती फाडून हृदयस्थ परमेश्वर असलेले रामपंचायतनाचे दर्शन घडवले. ते पाहून सीतामाईला आश्चर्य वाटले आणि कुतुहलही. हनुमंताच्या रामभक्तीची तिला जाणीव झाली. सीतामाई आणि रामरायाने हनुमंताला `चिरंजीवी भव' असा आशीर्वाद दिला. तेव्हापासून आजतागायत चिरंजीवी हनुमंतांच्या रामभक्तीचे दाखले दिले जातात. त्यांच्या रामभक्तीचा अंश आपल्यातही उतरावा, अशी प्रार्थना करूया आणि म्हणूया,

सीयावर रामचंद्र की जय।पवनसुत हनुमान की जय।बोलो रे भाई, सब संतन की जय।

हेही वाचाः अधिक मास म्हणजे काय?... या 'बोनस' महिन्यात काय करावं, काय टाळावं?... जाणून घ्या