शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

युद्धाची तयारी शांततेत करावी म्हणतात; तुम्ही तशी कधी केली आहे का?

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: April 16, 2021 8:00 AM

तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा तहान लागेल म्हणून विहीर खोदून ठेवणे केव्हाही चांगले!

आपल्या सगळ्या गोष्टी अगदी ऐन वेळेवर सुचतात. एवढेच काय, तर परीक्षेत पेपरचे तीन तास संपत आले की शेवटच्या पाच मिनीटात आपली ज्ञानगंगा दुथडी भरून वाहू लागते. पण तेव्हा फार उशीर झालेला असता़े बरेच काही येऊनसुद्धा, आठवूनसुद्धा पेपर हिसकावून घेतला जातो. परंतु, शालेय परीक्षा परत देता येईलही, मात्र आयुष्यातल्या परीक्षेत नापास झालो, तर वारंवार संधी मिलत नाही. म्हणून युद्ध सुरू झाले, की तयारी करू ही वृत्ती सोडून शांततेच्या काळात युद्ध कधीही झाले तरी आपण शस्त्रसज्ज कसे असू यावर भर दिला पाहिजे. अर्थात संकटांशी लढण्याची सर्वतोपरी तयारी केली पाहिजे. 

एक शेतकरी होता. तो वयोवृद्ध होता. त्याला शेतकामासाठी मजूर हवे होते. तो त्यांना चांगला पगार द्यायलाही कबूल होता. परंतु त्याचे शेत अशा ठिकाणी होते, जिथे सतत वादळसदृश्य परिस्थिती असे. त्यामुळे कितीही मेहनत केली, तरी त्यावर पाणी फिरत असे. ही बाब लक्षात घेऊन अनेक मजूरांनी तिथले काम अर्धवट सोडले होते.

शेतकऱ्याला मात्र जमीन वाऱ्यावर टाकून चालणार नव्हते. त्याने वर्तमानपत्रात बातमी दिली आणि कामासाठी होतकरू तरुण हवा आहे, योग्य मोबदला दिला जाईल असे म्हटले. बातमी वाचून एक गरजू तरुण शेतकऱ्याला येऊन भेटला. शेतकऱ्याने आधीच परिस्थितीचे वर्णन करून सांगितले. यावर तरुण म्हणाला, `हरकत नाही, मी काम करायला तयार आहे. फक्त माझी एक अडचण आहे. वाऱ्याची झुळूक आली, की मला गाढ झोप लागते. एरव्ही मी सतर्क असतो. तुमच्या कामात मी अडचण येऊ देणार नाही, तुम्ही माझ्या झोपेत अडचण येऊ देऊ नका.'

शेतकऱ्याने त्याला संधी द्यायचे ठरवले. तरुण मुलगा मन लावून काम करत होता. एक दिवस वादळ आले. शेतकरी लगबगीने तरुणाला बोलवायला गेला. तर तरुण गाढ झोपला होता. शेतकरी त्याला गदागदा हलवून उठवत होता. तरुण म्हणाला, माझी अट विसरलात का बुवा?'

`याला नंतर बघून घेतो, आधी माझे शेत पाहतो' असे म्हणत शेतकरी रागारागात शेतावर गेला. तिथे जाऊन पाहतो तर काय, सगळ्या पिकांची व्यवस्थित बांधणी केली होती. कोंबड्यांना नीट झाकून ठेवले होते. कोठाराचे दार घट्ट बंद केले होते. ते पाहून शेतकऱ्याला तरुणाचे बोल आठवले, `वारा आला की झोप लागते' याचा अर्थ त्याला परिस्थितीची जाणीव असल्याने त्याने संकटाआधीच बचावाची पूर्वतयारी करून ठेवली होती. शेतकरी त्याच्यावर खुष झाला आणि त्याला दुप्पट पगार बक्षीस म्हणून दिला. 

आपणही आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांसाठी, बचावकार्य आधीच करून ठेवले, तर संकटाला तोंड देणे किती सोपे होईल नाही? तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा तहान लागेल म्हणून विहीर खोदून ठेवणे केव्हाही चांगले!