शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

आपल्या नावात आईचे नाव लावण्याची प्रथा पौराणिक काळापासून!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 15, 2020 9:58 PM

आई हि आपली जन्मदात्री, आपल्या कर्तृत्वाने तिच्या नावाचा केलेला गौरव, हीच खरी मातृवंदना.

ज्योत्स्ना गाडगीळ 

गेल्या काही वर्षांपासून आपल्या प्रगती पुस्तकावर, प्रशस्तीपत्रकावर, जन्मदाखल्यावर वडिलांबरोबरच आईचेही नाव लिहिण्याचा कायदा सुरू झाला. परंतु, पौराणिक कथा शोधल्या, तर असे अनेक दाखले मिळतील, जिथे आईच्या नावावरून पुत्राला ओळख मिळत असे. अशीच एक कथा, सत्यकाम जाबालची...

एकदा गौतम ऋषी आपल्या आश्रमात शिष्यांना शिकवत होते. त्यावेळी फाटकी वस्त्रे नेसलेला एक मुलगा मोठ्या धैर्याने ऋषींना सामोरा गेला आणि म्हणाला, 'गुरुदेव, आपल्यासारख्या ज्ञानी व उदात्त गुरुदेवांचे शिष्य व्हावे, अशी माझी उत्कट इच्छा आहे.' 

त्याची उत्सुकता, ज्ञानार्जनाची ओढ आणि विनम्र भाव पाहून ऋषींनी त्याला सौम्यपणे विचारले, 'पुत्र, तुझे पूर्ण नाव काय? तुझे कुळ कोणते? तुझा पूर्वइतिहास काय? मला तुझा सविस्तर परिचय दे.'

हेही वाचा : ...त्याला जगातील कुणीही इजा करू शकत नाही; गौतम बुद्धांचा शिष्य 'पूर्णा'ची गोष्ट

यावर तो नम्रपणे म्हणाला, `गुरुदेव, माझ्याकडे तुमच्या एकही प्रश्नाचे उत्तर नाही. उलट स्वत:ची ओळख कमवावी, म्हणून तर मी आपल्याकडे आलो आहे.' 

स्वत:बद्दल ज्याला काही माहित नाही, असा मुलगा विश्वाचे ज्ञान करून घ्यायला गुरुदेवांकडे आला आहे, हे पाहून इतर शिष्य  तिरस्काराने त्याच्याकडे बघून हसू लागले. गौतम ऋषींनी त्यांच्यावर एक कटाक्ष टाकला आणि त्यांना गप केले. गुरुदेव म्हणाले, 'तू अनाथ आहेस का?' 

'नाही गुरुदेव, मला आई आहे. तीच मोठ्या कष्टाने माझा सांभाळ करते.' - मुलगा उत्तरला. 

गुरुदेव म्हणाले, `ठीक आहे. मग तुला मी जे प्रश्न विचारले, ते जाऊन तू तुझ्या आईला विचार. स्वत:ची ओळख करून घे, मग मला येऊन तुझी ओळख करून दे. मग आपण ज्ञानार्जनाला सुरुवात करू.'

छोटासा मुलगा वायूवेगाने धावत घरी आला. त्याने आपल्या आईला अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. आईने त्याला शांत केले. मुलगा किशोरवयीन होता. म्हटले तर समजूतदार आणि म्हटले तर अल्लड, असे त्याचे वय. परंतु आता त्याच्या प्रश्नांना उत्तर देणे भाग होते. म्हणून आईने त्याच्या बालबुद्धीला पटेल असे, परंतु सत्यपरिस्थितीवर आधारित उत्तर देऊन त्याचे कुतुहल शमवले. आई म्हणाली,

'बाळा, इतर मुलांना असतात, तसे तुला वडील नाहीत, कारण मी एक दासी आहे. तुझी जबाबदारी पूर्णपणे माझ्या एकटीवर येऊन पडली. त्यामुळे तुला वडील नाहीत, फक्त आई आहे, ही जाबाली. मात्र, यात वैशम्य वाटून घेण्याचे काहीच कारण नाही, कोणी विचारले, तर ठणकावून सांग, मी जाबालीपुत्र जाबाल आहे.'

आपली ओळख कळल्यावर, पटल्यावर जाबालला खूप आनंद झाला. त्याने आईला कडकडून मिठी मारली आणि म्हणाला, 'आई, सगळे जण वडिलांचे नाव लावतात, पण खरी ओळख देणारी तर आईच असते ना आणि माझे भाग्य असे की मला तुझे नाव लावण्याची संधी मिळाली. तुझे नाव मी खूप मोठे करेन.' 

जाबालने पण केला आणि तो आश्रमात परत आला. गुरुंसमोर त्याने सर्व हकिकत कथन केली. बाकीच्या मुलांना टिंगल टवाळी करायला नवा विषय मिळाला. गौतम ऋषींनी पुन्हा एकदा मुलांना गप्प केले आणि जाबालकडे बघत म्हणाले, 

'जाबाल, तू धन्य आहेस, तुझी माताही धन्य आहे. आपल्या आयुष्याचे सत्य स्वीकारण्याची तू तयारी दाखवलीस. यामुळे तुझा नक्कीच उत्कर्ष होईल. तू मोठा ऋषी होशील. आपल्या कर्तृत्त्वाने तू आईचेही नाव मोठे करशील. तुझे सत्यावरील प्रेम पाहून तुला मी 'सत्यकाम जाबाल' असे नाव प्रदान करतो.'

गुरुमुखातून निघालेले आशीर्वाद आणि आईने दाखवलेला विश्वास जाबालने खरा करून दाखवला आणि इतिहासात त्याने जबालीपुत्र जाबाल याच नावाने, थोर ऋषी होऊन महत्त्वपूर्ण योगदान दिले.

हेही वाचा: प्रेम म्हणजे काय, सांगताहेत संत सेना महाराज