शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

अंत:करणातील सामर्थ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 8:47 AM

अंत:करणातील करुणेचा आणि दयेचा सागर म्हणजे राम! या दृष्टीने श्रीरामाच्या चैतन्याशी जेव्हा खरी एकरूपता साधते, तेव्हाच अंतर्यामी असणारा हा चैतन्यघन राम अंत:करणातील वृत्तीचे जागरण घडवितो.

- मोहनबुवा रामदासीरघुवीर भजनाची मानसी प्रीती लागो।रघुवीर भजनाची अंतरी वृत्ती जागो।श्री समर्थांचा अत्यंत लाडका शब्द म्हणजे रघुवीर. समर्थ रामासाठी रघुवीर शब्द उच्चारतात. जय जय रघुवीर समर्थ ही गर्जना तर चारशे वर्षांपूर्वी आळशावरी गंगा आली, याप्रमाणे महाराष्ट्राला संजीवनीचा महामंत्र देणारी ठरली. मृतप्राय झालेला समाज या एका गर्जनेने जागा होतो. किती ताकद असेल समर्थांच्या सामर्थ्याची, याची कल्पना येते. समर्थांचा रघुवीर म्हणजे श्रीराम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वसामान्य भक्त हा मूर्ती, प्रतिमा किंवा प्रतीकात्मक कशाचा तरी आधार घेऊनच देवाच्या देवत्वावर श्रद्धा आणि विश्वास ठेवतो. जगाच्या दृष्टीने हे योग्य असते; पण समर्थांसारखे आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांप्रमाणे ते भाव, भक्ती आणि ईश्वराबद्दलच्या प्रेमाचे अधिष्ठान अबाधित ठेवूनच केवळ मूर्ती, प्रतिमांच्या पलीकडे ते विश्वात्मक चैतन्य असतं. त्याच्यावर प्रेम करायला सांगतात. रघुनाथदासा कल्याण व्हावे किंवा आता विश्वात्मके देवे या देवत्वाबद्दलच्या उदात्त कल्पना समर्थांनी तब्बल चारशे वर्षांपूर्वी तत्कालीन समाजासमोर मांडल्या. विश्वात्मक चैतन्य आणि प्रत्येकाच्या अंत:करणात अधिष्ठान रूपाने बसलेला अंतरात्मा हेच खरं चैतन्यात्मक रामाचे स्वरूप आहे. ज्या रघुवीराचे समर्थ चिंतन करायला सांगतात, असा हा सर्वव्यापी सर्वांतर्यामी असणारा रघुवीर म्हणजे श्रीराम आहे. त्या चैतन्याच्या सत्तेवरच हे जग चालले आहे. अंत:करणातील सामर्थ्य म्हणजे राम. अंत:करणातील ऊर्जाशक्ती म्हणजे राम. अंत:करणातील प्रेरणाशक्ती म्हणजे राम. अंत:करणातील प्रेम, वात्सल्य आणि स्फूर्ती म्हणजे राम. अंत:करणातील करुणेचा आणि दयेचा सागर म्हणजे राम! या दृष्टीने श्रीरामाच्या चैतन्याशी जेव्हा खरी एकरूपता साधते, तेव्हाच अंतर्यामी असणारा हा चैतन्यघन राम अंत:करणातील वृत्तीचे जागरण घडवितो. जय जय रघुवीर समर्थ!!