शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

आपली प्रगती 'या' चार प्रश्नांमुळे अडकून राहिली आहे!- गौर गोपाल दास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 12:08 IST

विचारपूर्वक निर्णय घ्या, पण निर्णय घेताना अति विचार किंवा नकारात्मक विचारांनी स्वत:ची प्रगती थांबवू नका. 

प्रख्यात व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू यांनी आपल्या एका व्याख्यानात सांगितले- आपली प्रगती कधी थांबते माहितीये? जेव्हा आपण चार गोष्टींचा अकारण विचार करतो. ते चार प्रश्न म्हणजे- मी अपयशी झालो तर? मी काही गमावून बसलो तर? माझा निर्णय चुकला तर? लोक काय म्हणतील? जेव्हा आपण या चारही प्रश्नांवर मात करायला शिकू, तेव्हा आपण प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकलेले असेल. यासाठी मी तुम्हाला माझे उदाहरण देतो.

एकदा मला माझ्या एका पायलट मित्राने त्याच्या खाजगी विमानातून सफर घडवायची असे ठरवले. विमानात याआधी देखील मी अनेकदा बसलो होतो, तरीदेखील तो विमान चालवत असताना त्याच्या बाजूला बसून सफर करणे हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता. ज्या दिवशी आम्हाला सफारीवर जायचे होते, त्याच्या आदल्या दिवशी मी अकारण बेचैन होतो. जणू काही विमान मलाच उडवायचे होते! दुसऱ्या दिवशी त्याच अस्वस्थतेत विमानात बसलो. मात्र, माझ्या मनातले भाव मी चेहऱ्यावर येऊ दिले नाही, अन्यथा माझ्या मित्राचा हिरमोड झाला असता. तो आनंदात होता. आम्ही दोघे उडालो. काही क्षणात माझी भीती पळाली. जवळपास वीस मीनिटे आकाशात सैर करून जमिनीवर लँडींग करताना मला पुन्हा त्याच अस्वस्थतेने ग्रासले. मात्र माझ्या मित्राने अगदी शांतपणे लँडिंग केले आणि आमचा प्रवास पूर्ण झाला. माझी अस्वस्थता पूर्ण दूर झाली होती. 

असाच आणखी एक अनुभव होता स्काय डायव्हिंगचा! आकाशात उंचावर पोहोचल्यावर विमानातून उडी मारायची, अशा वेळी नेमके आपले पॅराशूट उघडले नाही तर? माझ्या प्रशिक्षकाकडून काही चूक झाली तर? माझा अपघात होऊन मी मेलो तर? जमिनीवर सुरक्षित उतरण्याऐवजी कुठे आदळलो तर? अशा सगळ्या नकारात्मक विचारांनी डोक्यात गर्दी केली. शेवटी एका क्षणी मीच मला समजावले, 'आपल्याबरोबर असणाऱ्या प्रशिक्षकाने आजवर हजारो लोकांना हा आनंददायी अनुभव दिलेला आहे. तो माझ्या सोबत असणार आहे. माझ्या पाठीला पॅराशूट असणार आहे. हा अनुभव सुखद व्हावा यासाठी एक यंत्रणा सुसज्ज असणार आहे. एवढे सगळे असूनही जर मी घाबरत राहिलो, तर मी एक सुंदर अनुभव घेण्यापासून स्वत:ला दूर ठेवण्याची चूक करणार आहे.' 

असा सारासार विचार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी स्काय डायव्हिंग केले आणि यशस्वीपणे विमानातून बाहेर झेप घेतली. माझ्या प्रशिक्षकाने मला व्यवस्थित सांभाळले. पॅराशूट वेळेत उघडले आणि आम्ही सुखरूप जमिनीवर आलो. माझ्या मनातले चारही प्रश्न मिटले. याचाच अर्थ मी अकारण काळजी करत होतो.

मित्रांनो, विचारपूर्वक निर्णय घ्या, पण निर्णय घेताना अति विचार किंवा नकारात्मक विचारांनी स्वत:ची प्रगती थांबवू नका.