शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

फार काळ सुखी कोणीच राहू शकत नाही, म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात... 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 6:24 PM

स्वानुभवाचे बोल सर्वांना पटतात. संतांनीदेखील समाजाला उपदेश करताना `आधी केले मग सांगितले.' अशाच अनुभवाचे कथन करताना तुकाराम महाराजांनी एका ...

स्वानुभवाचे बोल सर्वांना पटतात. संतांनीदेखील समाजाला उपदेश करताना `आधी केले मग सांगितले.' अशाच अनुभवाचे कथन करताना तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटले आहे, `सुख पाहता जवापाडे, दु:खं पर्वताएवढे!' भल्या मोठ्या पर्वतासमोर जवाचा दाणा केवढासा. परंतु, महाराजांनी मुद्दामहून ही उपमा दिली, कारण, व्यक्तिगत आयुष्यात आपण ते नेहमीच अनुभवतो, फक्त मान्य करत नाही. दु:खाचा डोंगर केवळ आपल्याच आयुष्यात नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. त्रयस्थ म्हणून पाहताना, आपल्याला स्वत:चे दु:खं पर्वताएवढे आणि दुसऱ्याचे दु:खं जवाएवढे वाटत असते. मात्र, हीच परिस्थिती समोरच्याला आपल्याबाबत वाटत असते. परंतु, संत तटस्थपणे समाजाकडे पाहतात आणि अभ्यासाअंती भाष्य करतात. म्हणून त्याला संतवचन म्हणतात. त्यातून शिकण्याऐवजी ते चुकीचे ठरवले, तर काय होते, वाचा.

एक श्रीमंत गृहस्थ होता. त्याच्या वयाला पन्नास वर्षे झाली, पण त्याला कधी दु:खाची झळ लागली नव्हती. कोणी त्याच्यापुढे आपले दु:ख सांगितले, तर त्याला ते पटत नसे. त्या गावात एक साधू होता. तो अभंग किंवा श्लोक म्हणत दारोदार फिरे. कोणी भिक्षा घातली, तर घेई नाहीतर तसाच पुढे निघून जाई. 

एके दिवशी तो साधू त्या श्रीमंताच्या दारात उभे राहून `सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे' असे म्हणाला. ते ऐकताच तो श्रीमंत बाहेर गेला आणि बाहेर जाऊन साधूला म्हणाला, `हे बुवा माझा अनुभव वेगळा आहे, `दु:ख पाहता जवापाडे, सुख पर्वताएवढे' असे म्हणा. 

त्यावर साधू म्हणाला, `हे काही माझ्या पदरचे वाक्य मी म्हणत नाही, तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी हे म्हटले आहे.'

त्यावर श्रीमंत म्हणाला, `हे वाक्य कोणी लिहिले, हे जाणून घ्यायची माझी इच्छा नाही. मी सांगतोय तसे जर तुम्ही म्हणणार नसाल, तर उद्यापासून माझ्या दारासमोर येत जाऊ नका.' 

साधूने मान डोलावली आणि तो निघून गेला. त्यानंतर अनेक दिवस साधू त्या दिशेने फिरकलादेखील नाही. 

एक दिवस श्रीमंत माणूस नदीवर फेरफटका मारायला गेला. तिथे त्याचे लक्ष नसताना एका विंचवाने नांगी मारली. श्रीमंत माणूस जोरात कळवळला. काही केल्या त्याच्या वेदना कमी होईना.  तो वैद्यराजांकडे गेला, औषधपाणी केले, तरी त्याचे दु:ख कमी होईना. 

तेव्हा अचानक श्रीमंत माणसाच्या मनात विचार आला, की साधूला आपण म्हटले होते, की दु:ख पाहता जवापाडे, सुख पर्वताएवढे. माझ्या याच बोलण्याचा, साधू महाराजांना दुखावल्याचा आणि संतवचन खोटे पाडण्याचा देवाला राग आला असावा, म्हणून देवाने मला ही शिक्षा दिली असावी. हे आठवून श्रीमंत माणसाने साधूचा शोध घेत त्याला बोलावणे पाठवले. त्याची माफी मागितली. आणि त्याला सांगितले, `आपण म्हटले, तेच बरोबर आहे. सुख पाहता जवापाडे आणि दु:ख पर्वताएवढे!

आयुष्य क्षणभंगुर आहे. त्यातला बराचसा वेळ झोपण्यात, रुसवे फुगवे काढण्यात, चिडण्यात, ओरडण्यात वाया जातो. यातून उर्वरित आयुष्याचे क्षण आपण कसे वापरतो, यावर आपल्या सुख दुःखाचे पारडे अवलंबून असते, असे सांगताना तुकाराम महाराज जव आणि पर्वताचे उदाहरण वापरले.